शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

संविधान हा लोकशाहीचा धर्मग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST

नाशिक : भारतात संविधान हाच लोकशाहीचा धर्मग्रंथ असून, इथे कुणा एकाची सत्ता, पॉवर चालूच शकत नाही. म्हणूनच कितीही चढउतार ...

नाशिक : भारतात संविधान हाच लोकशाहीचा धर्मग्रंथ असून, इथे कुणा एकाची सत्ता, पॉवर चालूच शकत नाही. म्हणूनच कितीही चढउतार आले तरी देशात लोकशाही सार्वभौम आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे यांनी केले. डिजिटल वसंत व्याख्यानमालेत सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

स्व. द. तु. जायभावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित 'भारतीय घटना आणि नागरिक 'या विषयावर जायभावे यांनी संवाद साधला. देशाची निर्मिती, घटना, मसुदा समिती, घटनेतील अनुच्छेद, अनुसूचि या विषयांचा समूळ आढावा घेत जायभावे यांनी या देशातील,नागरिक,सत्ताधारी,न्यायव्यवस्था, संसद यावर आधारित भाष्य केले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील नागरिकांना समाजव्यवस्थेला समृद्ध आयुष्य देण्याचे काम घटनेच्या माध्यमातून केले. म्हणून, आजपर्यंत १२५ घटना दुरुस्त्या होऊनही देश प्रगतीच्या दिशेने झेपावतोय, समाजाचे हित या दुरुस्त्यांनी केल्याचे मत जायभावे यांनी व्यक्त केले. संविधानाचे स्वरूप काय ? त्याची मांडणी समाजासमोर गेली पाहिजे, सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी आपले हक्क काय आहेत हे नागरिकांना ज्ञात असावेत, असा मानस ॲड. जायभावे यांनी व्यक्त केला. या देशातील उत्पादनांची साधने जनतेची असून ती एका माणसाच्या हाती नाहीत,तर ती लोककल्याणासाठी वापरली जावीत असेही घटना अधोरेखित करते. म्हणूनच, आणीबाणीचा उल्लेख करून जायभावेंनी अशाही परिस्थितीत जनतेचे मूलभूत अधिकार स्थगित करता येणार नाहीत, अशी दुरुस्ती घटनेत केली गेली, हे भारतीय घटनेचे प्रगतिशील रूप असल्याचे जायभावे म्हणाले.

७० वर्षांत सामाजिक विषमता वाढत असून, घटनेने सांगितलेल्या बंधुत्वाकडे आपले दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट करून समाजाला मूलभूत कर्तव्याची जाणीव करून देण्याची गरज ॲड. जायभावे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले.

-----

आजचे व्याख्यान : सुरेश भटेवरा

विषय : पाच राज्यांतील निवडणूक निकालांचा अन्वयार्थ

------------------

फोटो

०६ॲड. जायभावे