शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

संविधान हा लोकशाहीचा धर्मग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST

नाशिक : भारतात संविधान हाच लोकशाहीचा धर्मग्रंथ असून, इथे कुणा एकाची सत्ता, पॉवर चालूच शकत नाही. म्हणूनच कितीही चढउतार ...

नाशिक : भारतात संविधान हाच लोकशाहीचा धर्मग्रंथ असून, इथे कुणा एकाची सत्ता, पॉवर चालूच शकत नाही. म्हणूनच कितीही चढउतार आले तरी देशात लोकशाही सार्वभौम आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे यांनी केले. डिजिटल वसंत व्याख्यानमालेत सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

स्व. द. तु. जायभावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित 'भारतीय घटना आणि नागरिक 'या विषयावर जायभावे यांनी संवाद साधला. देशाची निर्मिती, घटना, मसुदा समिती, घटनेतील अनुच्छेद, अनुसूचि या विषयांचा समूळ आढावा घेत जायभावे यांनी या देशातील,नागरिक,सत्ताधारी,न्यायव्यवस्था, संसद यावर आधारित भाष्य केले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील नागरिकांना समाजव्यवस्थेला समृद्ध आयुष्य देण्याचे काम घटनेच्या माध्यमातून केले. म्हणून, आजपर्यंत १२५ घटना दुरुस्त्या होऊनही देश प्रगतीच्या दिशेने झेपावतोय, समाजाचे हित या दुरुस्त्यांनी केल्याचे मत जायभावे यांनी व्यक्त केले. संविधानाचे स्वरूप काय ? त्याची मांडणी समाजासमोर गेली पाहिजे, सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी आपले हक्क काय आहेत हे नागरिकांना ज्ञात असावेत, असा मानस ॲड. जायभावे यांनी व्यक्त केला. या देशातील उत्पादनांची साधने जनतेची असून ती एका माणसाच्या हाती नाहीत,तर ती लोककल्याणासाठी वापरली जावीत असेही घटना अधोरेखित करते. म्हणूनच, आणीबाणीचा उल्लेख करून जायभावेंनी अशाही परिस्थितीत जनतेचे मूलभूत अधिकार स्थगित करता येणार नाहीत, अशी दुरुस्ती घटनेत केली गेली, हे भारतीय घटनेचे प्रगतिशील रूप असल्याचे जायभावे म्हणाले.

७० वर्षांत सामाजिक विषमता वाढत असून, घटनेने सांगितलेल्या बंधुत्वाकडे आपले दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट करून समाजाला मूलभूत कर्तव्याची जाणीव करून देण्याची गरज ॲड. जायभावे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले.

-----

आजचे व्याख्यान : सुरेश भटेवरा

विषय : पाच राज्यांतील निवडणूक निकालांचा अन्वयार्थ

------------------

फोटो

०६ॲड. जायभावे