शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

संविधान हा लोकशाहीचा धर्मग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST

नाशिक : भारतात संविधान हाच लोकशाहीचा धर्मग्रंथ असून, इथे कुणा एकाची सत्ता, पॉवर चालूच शकत नाही. म्हणूनच कितीही चढउतार ...

नाशिक : भारतात संविधान हाच लोकशाहीचा धर्मग्रंथ असून, इथे कुणा एकाची सत्ता, पॉवर चालूच शकत नाही. म्हणूनच कितीही चढउतार आले तरी देशात लोकशाही सार्वभौम आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे यांनी केले. डिजिटल वसंत व्याख्यानमालेत सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

स्व. द. तु. जायभावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित 'भारतीय घटना आणि नागरिक 'या विषयावर जायभावे यांनी संवाद साधला. देशाची निर्मिती, घटना, मसुदा समिती, घटनेतील अनुच्छेद, अनुसूचि या विषयांचा समूळ आढावा घेत जायभावे यांनी या देशातील,नागरिक,सत्ताधारी,न्यायव्यवस्था, संसद यावर आधारित भाष्य केले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील नागरिकांना समाजव्यवस्थेला समृद्ध आयुष्य देण्याचे काम घटनेच्या माध्यमातून केले. म्हणून, आजपर्यंत १२५ घटना दुरुस्त्या होऊनही देश प्रगतीच्या दिशेने झेपावतोय, समाजाचे हित या दुरुस्त्यांनी केल्याचे मत जायभावे यांनी व्यक्त केले. संविधानाचे स्वरूप काय ? त्याची मांडणी समाजासमोर गेली पाहिजे, सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी आपले हक्क काय आहेत हे नागरिकांना ज्ञात असावेत, असा मानस ॲड. जायभावे यांनी व्यक्त केला. या देशातील उत्पादनांची साधने जनतेची असून ती एका माणसाच्या हाती नाहीत,तर ती लोककल्याणासाठी वापरली जावीत असेही घटना अधोरेखित करते. म्हणूनच, आणीबाणीचा उल्लेख करून जायभावेंनी अशाही परिस्थितीत जनतेचे मूलभूत अधिकार स्थगित करता येणार नाहीत, अशी दुरुस्ती घटनेत केली गेली, हे भारतीय घटनेचे प्रगतिशील रूप असल्याचे जायभावे म्हणाले.

७० वर्षांत सामाजिक विषमता वाढत असून, घटनेने सांगितलेल्या बंधुत्वाकडे आपले दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट करून समाजाला मूलभूत कर्तव्याची जाणीव करून देण्याची गरज ॲड. जायभावे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले.

-----

आजचे व्याख्यान : सुरेश भटेवरा

विषय : पाच राज्यांतील निवडणूक निकालांचा अन्वयार्थ

------------------

फोटो

०६ॲड. जायभावे