जुळलेली नाळ खंडित झाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2015 23:01 IST2015-12-12T23:00:20+5:302015-12-12T23:01:45+5:30

येवला : सभा, आंदोलनाच्या आठवणींना उजाळा

The connecting tube was broken ... | जुळलेली नाळ खंडित झाली...

जुळलेली नाळ खंडित झाली...

येवला : शेतकरी संघटनेचे पंचप्राण शरद जोशी यांची जीवनयात्रा संपली असली तरी नाशिक जिल्ह्यासह येवल्याशी त्यांची जुळलेली नाळ मात्र कायमची स्मरणात राहील अशीच आहे.
१९८९ साली कांद्याचे अचानक भाव कोसळले आणि कांद्याला हमी भाव द्यावा, या मागणीसाठी येवल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी संघटनेचे उपोषण सुरू झाले. स्वर्गीय मोहनराव गुंजाळ, स्वर्गीय लहानू जेजूरकर, संतू पाटील झांबरे, कांतीलाल जगझाप, शिवाजी वाघ, साहेबराव मढवई, सुभाष सोनवणे,चंद्रकांत साबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले. या उपोषणाची वार्ता शेतकरी संघटनेचे स्वर्गीय मोहनराव गुंजाळ यांनी कानी घालताच शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी येवल्यात आले. कांद्याच्या जनजागृतीसाठी शेतकऱ्यांची येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठी सभा झाली. सुमारे १० हजार शेतकऱ्यांनी येवल्यातील या सभेला हजेरी लावली. त्या सभेत झालेल्या गगनभेदी घोषणा आजही येवल्याचा शेतकरी विसरलेला नाही. कांद्याला रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत येवल्यातील कार्यकर्त्यांचे उपोषण सुरूच राहणार असल्याची गर्जना जोशी यांनी येवल्यात केली. आणि ही गर्जना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कानावर गेली. त्यांनी तत्काळ शरद जोशी यांना चर्चेचे आमंत्रण दिले. या चर्चेत कांद्याला १०० रु पये प्रतिक्विंटल भाव देणार ही घोषणा शरद पवार यांनी केल्याची आठवण शेतकरी नेते संतू पाटील झांबरे यांनी सांगितली. दरम्यान, लासलगाव येथेही शिवाजी राजोळे, स्मिता गुरव व कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले होतेच. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेची मुळे घट्ट रोवली गेली.
बाजार हस्तक्षेप योजनेनंतर येवल्यात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कर्जमुक्ती आंदोलन झाले. मोहन गुंजाळ आणि संतू पाटील झांबरे यांनी येवल्यात पाटपाणीप्रश्नावर आंदोलन सुरू केले. यावेळी शरद जोशी यांची येवल्यात स्वतंत्र पाणी परिषद या विषयावर प्रचंड जाहीर सभा झाली. उच्चाधिकार समितीचे पदाधिकारी वामनराव चटप, सदाभाऊ खोत, रघुनाथदादा पाटील, लक्ष्मण वडेल या सभेसाठी हजर होते. या परिषदेत शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेऊन, पाणीप्रश्न सुटत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. कर्जमुक्ती,आणि लक्ष्मीमुक्ती हे दोन कार्यक्र म शरद जोशी यांनी चांदवड येथील जाहीरसभेतून शेतकऱ्यांना दिले. या घोषणेपूर्वी या कार्यक्र माला येवल्यातील बैठकीत अंतिम रूप दिले गेले. (वार्ताहर)

Web Title: The connecting tube was broken ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.