शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

पानी फाउंडेशन स्पर्धेत कोनांबे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 18:55 IST

सिन्नर : पानी फाऊंडेशने आयोजित वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्याने बाजी मारली आहे. तालुक्यातील कोनांबे गावाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर वडझिरे आणि धोंडबार ग्रामपंचायतीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात या तीनही गावांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनिकाल : वडझिरे व धोंडबार ठरले यशाचे मानकरी; पुरस्कार प्रदान.

सिन्नर : पानी फाऊंडेशने आयोजित वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्याने बाजी मारली आहे. तालुक्यातील कोनांबे गावाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर वडझिरे आणि धोंडबार ग्रामपंचायतीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात या तीनही गावांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला आहे.सिन्नर तालुक्यात पाणी फाऊंडेशनसोबत हजारो हातांनी श्रमदान केले. सर्वात उत्कृष्ट कामाचा नमुना म्हणून सिन्नर तालुक्यात कोनांबे, वडझिरे आणि धोंडबार या गावांनी वॉटरकप स्पर्धेत बाजी मारली.विशेष म्हणजे पुरस्कारासाठी शासनाने मुख्यमंत्री निधीतून प्रथम, द्वितीय यांना प्रत्येकी ५ लाख रुपये व तृतीय क्रमांकाच्या गावासाठी ३ लाख रुपये अतिरिक्त निधी देण्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत अमीर खानच्या पाणी फाऊंडेशनकडून नाशिक जिल्'ात ठिकठिकाणी श्रमदान करण्यात आले होते. विशेष म्हणजे, अमीर खानची पत्नी किरण राव हिनेदेखील सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथे सहा हजार नागरिकांसोबत श्रमदान केले होते. पळणारे पाणी चालते, चालणारे पाणी थांबते करणे व थांबलेले पाणी जमिनीत मुरवणे, अशा जलप्रकल्पातून गावाचा विकास होतो, याचे महत्त्व कोनांबेकरांना पटले आणि अभिनेता आमिर खानच्या ‘पानी फाऊंडेशन’च्या सहकार्याने कोनांबेत साकारला बरड जमिनीवर महाश्रमदान करण्यात आले. ३ हजार श्रमदात्यांच्या ६ हजार हातांनी किमया करत अवघ्या तीन तासांत ११ लाख लिटर पाणी साठवणारे सलग समतल चर तयार करण्यात आले होते.तर द्वितीय क्रमांक मिळवलेल्या वडझिरे गावाने जलसंधारणाच्या माध्यमातून जलक्रांती केली असून पूर्वीचे दुष्काळी गाव ही ओळख पुसण्यात येथील ग्रामस्थांना यश आले. गेल्या तीन वर्षांत वडझिरेसह परिसरातील गावे जलयुक्त झाली आहेत. वडझिरे गावाचे एकूण १२८५ क्षेत्र आहे. पिण्यासाठी ३.५५५ कोटी लिटर पिण्याच्या पाण्याची गरज असते. तसेच जनावरांसाठी १ कोटी लिटर पाणी लागते. गावाला एकूण ३.५५५ कोटी लिटर पाण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, यावर्षीच्या कामाचा एकूण व्याप बघता दुप्पटीने पाणी साठवण क्षमता तसेच एकूण पाणी गावासाठी मिळाले आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्र मात येथील जनतेने सहभाग घेतला. गेल्या ४५ दिवसांपासून या गावात एकजुटीने रात्रंदिवस श्रमदान केले होते. गावकऱ्यांच्या या उपक्र माला नाशिक जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था, प्रशासकीय अधिकारी, त्यांची कार्यालये यांनी एकत्र येत हातभार लावला होता.तृतीय क्र मांक मिळालेल्या धोंडबार हे गाव कोनांबे गावाच्या पुढेच असून पाणी फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाने याठिकाणी नाला बर्डींग, समतल चर खोदण्यात आले. या कामामुळे पाणी टंचाईवर मात करण्यात यश आले आहे. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, कोनांब्याचे सरपंच संजय डावरे, उपसरपंच रंजना भागवत, प्रकाश डावरे, ग्रामसेवक संदीप देवरे, वडझिरेचे उपसरपंच छाया नागरे, अलका बोडके, अर्जुन बोडके, जयराम गिते, गोरख ठोंबरे, ग्रामसेवक पांडुरंग सोळंके, धोंडबारचे सरपंच चंद्रभान साबळे, हरि खेताडे, भाऊराव जाधव, चांगुणा खेताडे, ग्रामसेवक हेमंत पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.