शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

राफेल विमान प्रकरणी कॉँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:28 IST

राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करूनही पंतप्रधान मोदी यावर बोलत नाहीत़ नोटाबंदी, जीसएसटी, पेट्रोलचे भाव कमी करण्यात सरकारची हतबलता ही मोदी सरकारच्या काळात देशाचे अर्थकारण बिघडल्याचे सूचित करते़ अशा या हुकूमशाही, भ्रष्टाचारी व सर्वसामान्यांची पिळवणूक करणाºया मोदी सरकारला जाब विचारण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी

नाशिक : राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करूनही पंतप्रधान मोदी यावर बोलत नाहीत़ नोटाबंदी, जीसएसटी, पेट्रोलचे भाव कमी करण्यात सरकारची हतबलता ही मोदी सरकारच्या काळात देशाचे अर्थकारण बिघडल्याचे सूचित करते़ अशा या हुकूमशाही, भ्रष्टाचारी व सर्वसामान्यांची पिळवणूक करणाºया मोदी सरकारला जाब विचारण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारकडून जनतेची सुरू असलेली फसवणूक, राफेल खरेदीतील अनियमितता, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, भ्रष्टाचार या विरोधात शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि़ ११) शहरातून मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाच्या समारोपप्रसंगी चव्हाण बोलत होते,राफेल विमान खरेदी भ्रष्टाचाराबाबत बोलताना ते म्हणाले की, संरक्षणात महत्त्वाची भूमिका असलेल्या हवाई दलासाठी उच्च प्रतिची विमाने खरेदीचा मुद्दा २००० मध्ये चर्चेत आला़ यावर यूपीए सरकारने विविध देशांकडून निविदा मागवून ६३० ते ६५० कोटी रुपये किमतीची १२६ राफेल विमाने खरेदीचा निर्णय घेतला़ यापैकी १८ विमाने ही फ्रान्सकडून, तर १०८ विमाने ही एचएएच कंपनीत तयार केली जाणार होती़पंतप्रधान मोदी हे २०१५ मध्ये फ्रान्सच्या दौºयावर गेल्यानंतर त्यांनी हा करार रद्द केला व प्रत्येकी १६६० कोटी रुपये किमतीची ३६ विमाने खरेदी करण्याचा करार केला़ यातील प्रत्येक विमानासाठी १०५० ते १०६० कोटी रुपये अतिरिक्त देण्यात आले असून, यामध्ये ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे़ याबरोबरच विमान निर्मितीचे ३० हजार कोटी रुपयांचे काम एचएएल या अनुभवी कंपनीऐवजी काही दिवसांपूर्वीच तयार झालेल्या रिलायन्स कंपनीला देण्यात आले़ या विमान खरेदीतील भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान संसदेत उत्तरे देत नाही़ त्या घोटाळ्याची व्याप्ती जनतेपर्यंत पोहोचावी, यातील दोषींची चौकशी व्हावी यासाठी कॉँग्रेसतर्फे मोर्चा काढून जनजागृती केली जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़महात्मा गांधीरोडवरील काँग्रेस कार्यालयापासून या मोर्चास सुरुवात झाली़ मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, शालिमारमार्गे हा मोर्चा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप झाला़ यानंतर काँग्रसचे शहराध्यक्ष शरद अहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे व पदाधिकाºयांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी मोर्चेकºयांनी भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ या मोर्चामध्ये माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक हेमलता पाटील, शाहू खैरे, डॉ. तुषार शेवाळे, अश्विनी बोरस्ते, कल्पना पांडे, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडळे, वत्सला खैरे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़एमजी रोडवर वाहतूक कोंडीमहात्मा गांधी रोडवरील काँग्रेस कार्यालयापासून दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोर्चास सुुरुवात होणार असल्याने मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते जमले होते़ मात्र, जागा मिळेल तिथे वाहने उभी करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती़ या ठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मेहेर, शालिमार, रविवार कारंजा, मेनरोड, अशोकस्तंभ अशा सर्वच ठिकाणच्या वाहतुकीवर परिणाम झाला़ यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली़

टॅग्स :congressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण