शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

काँग्रेसला मराठा आरक्षण द्याचेच नव्हते - रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 18:01 IST

भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. याविरोधात मराठा समाजाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनेच १६ टक्के आरक्षण दिले होते, असा प्रचार केला जातो. मात्र, यात तथ्य नाही. काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, परंतु, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव पत्करावा लागल्याने तत्क ाळ राणे समिती नेमून काँग्रेसने आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही. मात्र भाजपा सरकारने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करून मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने आरक्षण मिळवून दिल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी देत राज्य सरकारला सामाजिक व आर्थिक परिस्थितीच्या आधारे आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मराठा आरक्षणावरून आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. 

ठळक मुद्देमराठा आरक्षणावरून श्रेयवादाला सुरुवात काँग्रेसला आरक्षण द्यायचेच नव्हते-दानवेभाजपने कायदेशीर आरक्षण दिले- दानवे

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. याविरोधात मराठा समाजाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनेच १६ टक्के आरक्षण दिले होते, असा प्रचार केला जातो. मात्र, यात तथ्य नाही. काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, परंतु, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव पत्करावा लागल्याने तत्क ाळ राणे समिती नेमून काँग्रेसने आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही. मात्र भाजपा सरकारने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करून मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने आरक्षण मिळवून दिल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी देत राज्य सरकारला सामाजिक व आर्थिक परिस्थितीच्या आधारे आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मराठा आरक्षणावरून आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीला शनिवारी (दि. २९) नाशिकमध्ये सुरुवात झाली. या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होेते. व्यासपीठावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक, प्रदेश प्रभारी उमा खापरे, पूजा मिश्रा, भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे उपस्थित होते. रावसाहेब दानवे म्हणाले, राज्यातील भाजपा सरकारने मराठा आक्षणाविषयी सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मंजूर करून घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयानेही त्याला मंजुरी दिल्याचे सांगतानाच महिलांना विधानसभेत व लोकसभेतही ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासोबतच नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्वृत्वातील राज्य सरकार लोकांसाठी आणलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लोकांपर्यंत शासकीय योजना पोहचत नसतील तर त्यास सरकार नव्हे तर त्या पक्षाचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले, तर भाजपाच्या महिला मोर्चाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली असून, आगामी दिवसात रक्षाबंधन आणि सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले.  

भाजपा महिला मोर्चाचे ‘रक्षाबंधन’ केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचे बहूमताचे सरकार स्थापन झाले आहे. त्याचपार्श्वभूमीवर राज्यातही पुन्हा भाजपाला यश मिळवून देण्यासाठी राज्यात भाजपाच्या महिला मोर्चाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रक्षाबंधन’उपक्रम राबवून त्या माध्यमातून पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठी मोहीम आकली आहे. त्यामाध्यमातून महिला मोर्चाच्या पदाधिकाºयांना राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी मागदर्शन करीत अधिकाधिक महिलांशी संपर्कसाधून सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे आवान केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपाWomenमहिलाraosaheb danveरावसाहेब दानवेVijaya Rahatkarविजया रहाटकर