कांद्याच्या दरातील घसरणीमुळे चिंतेचे वातावरण
By Admin | Updated: September 25, 2016 23:28 IST2016-09-25T23:28:05+5:302016-09-25T23:28:45+5:30
कांद्याच्या दरातील घसरणीमुळे चिंतेचे वातावरण

कांद्याच्या दरातील घसरणीमुळे चिंतेचे वातावरण
वणी: कांद्याच्या दरातील घसरणीमुळे कांदा उत्पादकांमधे चिंतेचे वातावरण असुन परतीच्या पावसामुळे कांदा साठवण करणे शक्य नसल्याने उत्पादक काळजीत पडले आहेत वणीच्या उपबाजारात आज तीनशे वाहनामधुन उत्पादकांनी कांदे विक्र ीसाठी आणले होते कळवण, चांदवड, देवळा व दिंडोरी भागातील शेतकर्यांनी विक्र ीसाठी आणलेल्या कांद्यास अपेक्षीत दर मिळाले नाहीत.
कमाल 580 रु पये किमान 100 रु पये तर सरासरी 250 रु पये क्कीटल दराने कांदा खरेदी विक्र ीचे व्यवहार पार पडले मागे व्यापारी वर्गाच्या संपामुळे कांदा चाळीत ठेवावा लागला होता तेव्हा काही ठिकाणी पावसामुळे कांदा
विक्रीस्थीतीत राहिला नव्हता अशा स्थितीत काही उत्पादकांनी पोटच्या मुलाप्रमाणे कांदयाची निगा ठेवली होती दरम्यान त्याही कांदयाला समाधानकारक दर मिळाला नव्हता व दरातील घसरण सुरूच राहिली.
दरम्यान कांदा खरेदीदार देशांतर्गत मागणी वाढली तरच कांदा खरेदीस अनुकुलता दर्शवितात कारण सद्यस्थीतीत शेतकरी वर्गाला कांदा चाळीत ठेवणे धोक्याचे आहे तीच स्थीती व्यापारी वर्गाची आहे कारण गुदामात कांदे साठविले व पर्जन्याचा जोर वाढला तर कांदे फेकावे लागतील व तो खर्चही सोसण्याची तयारी व्यापारी वर्गाला ठेवावी लागेल त्यामुळे तीहिम्मत आर्थिक द्दष्ट्या परवडणारी नसल्याची व्यापारी वर्गाची भावना आहे. (वार्ताहर)