मोफत पाठ्यपुस्तके वाटपाचे काम पूर्ण
By Admin | Updated: June 15, 2016 00:06 IST2016-06-14T22:47:40+5:302016-06-15T00:06:58+5:30
बालभारती : ९८ टक्के पुस्तकांचा पुरवठा

मोफत पाठ्यपुस्तके वाटपाचे काम पूर्ण
नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तके योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जवळपास पाठ्यपुस्तके वाटपाचे काम पूर्णत्वास आले आहे. जिल्ह्यातील शाळांमधून सुमारे ३0 लाख ३६ हजार ११८ पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार बालभारतीने २९ लाख ९१ हजार इतक्या पाठ््यपुस्तकांचा पुरवठा केला असून, सुमारे ९८.५१ टक्के इतकी पुस्तके शाळांना रवाना करण्यात आली आहेत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करणे शक्य होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. उर्वरित पुस्तकांचा पुरवठा आठवडाभरात करण्यात येणार आहे.