शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

शेतकऱ्यांना पिकविम्याचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:37 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. मात्र नुकसान भरपाई देताना पीकविमा कंपनीने आखडता हात घेतल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर व संतापाची लाट उसळली आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्तांचे कृषी मंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे

घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. मात्र नुकसान भरपाई देताना पीकविमा कंपनीने आखडता हात घेतल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर व संतापाची लाट उसळली आहे.याबाबत पीकविमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ करत असल्याने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. सोमवारी (दि.२१) राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन देवून साकडे घातले आहे. दरम्यान याबाबत पीकविमा कंपनीकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही भुसे यांनी दिली.इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०२०/२१ या वर्षासाठी खरीप हंगामाचा पीकविमा भरलेला होता. या खरीप हंगामात अतिवृष्टी होऊन भातशेतीसह अन्य पिके उध्वस्त झाली, अवकाळी पाऊस बेमोसमी पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडून पिकांबरोबर शेतकरीही उध्वस्त झाला आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने व पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याबाबत तालुक्यातील शेतकरी उत्तम शिंदे, नामदेव शिंदे, ज्ञानेश्वर कोकणे, पांडुरंग कोकणे, बाळासाहेब शिंदे, दत्तू कापसे आदींनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे याबाबतची व्यथा नमूद केली.इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाने नेमून दिलेल्या भारती एक्स ! विमा कंपनी, पुणे यांच्याकडे पीकविमा काढून पिकविम्याची रक्कम भरली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे तालुक्यातील बहुतांश गावातील ७० ते ८० टक्के पिकांचे नुकसान झाले. मात्र काही गावातील अवघ्या चार पाच शेतकऱ्यांना मोबदला मिळाला. त्यामुळे गावगावात शेतकऱ्यांकडून ओरड होत असून स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाकडे विचारणा केली जात आहे. 

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीFarmerशेतकरी