शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शेतकऱ्यांना पिकविम्याचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:37 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. मात्र नुकसान भरपाई देताना पीकविमा कंपनीने आखडता हात घेतल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर व संतापाची लाट उसळली आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्तांचे कृषी मंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे

घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. मात्र नुकसान भरपाई देताना पीकविमा कंपनीने आखडता हात घेतल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर व संतापाची लाट उसळली आहे.याबाबत पीकविमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ करत असल्याने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. सोमवारी (दि.२१) राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन देवून साकडे घातले आहे. दरम्यान याबाबत पीकविमा कंपनीकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही भुसे यांनी दिली.इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०२०/२१ या वर्षासाठी खरीप हंगामाचा पीकविमा भरलेला होता. या खरीप हंगामात अतिवृष्टी होऊन भातशेतीसह अन्य पिके उध्वस्त झाली, अवकाळी पाऊस बेमोसमी पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडून पिकांबरोबर शेतकरीही उध्वस्त झाला आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने व पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याबाबत तालुक्यातील शेतकरी उत्तम शिंदे, नामदेव शिंदे, ज्ञानेश्वर कोकणे, पांडुरंग कोकणे, बाळासाहेब शिंदे, दत्तू कापसे आदींनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे याबाबतची व्यथा नमूद केली.इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाने नेमून दिलेल्या भारती एक्स ! विमा कंपनी, पुणे यांच्याकडे पीकविमा काढून पिकविम्याची रक्कम भरली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे तालुक्यातील बहुतांश गावातील ७० ते ८० टक्के पिकांचे नुकसान झाले. मात्र काही गावातील अवघ्या चार पाच शेतकऱ्यांना मोबदला मिळाला. त्यामुळे गावगावात शेतकऱ्यांकडून ओरड होत असून स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाकडे विचारणा केली जात आहे. 

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीFarmerशेतकरी