शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांना पिकविम्याचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:37 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. मात्र नुकसान भरपाई देताना पीकविमा कंपनीने आखडता हात घेतल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर व संतापाची लाट उसळली आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्तांचे कृषी मंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे

घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. मात्र नुकसान भरपाई देताना पीकविमा कंपनीने आखडता हात घेतल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर व संतापाची लाट उसळली आहे.याबाबत पीकविमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ करत असल्याने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. सोमवारी (दि.२१) राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन देवून साकडे घातले आहे. दरम्यान याबाबत पीकविमा कंपनीकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही भुसे यांनी दिली.इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०२०/२१ या वर्षासाठी खरीप हंगामाचा पीकविमा भरलेला होता. या खरीप हंगामात अतिवृष्टी होऊन भातशेतीसह अन्य पिके उध्वस्त झाली, अवकाळी पाऊस बेमोसमी पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडून पिकांबरोबर शेतकरीही उध्वस्त झाला आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने व पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याबाबत तालुक्यातील शेतकरी उत्तम शिंदे, नामदेव शिंदे, ज्ञानेश्वर कोकणे, पांडुरंग कोकणे, बाळासाहेब शिंदे, दत्तू कापसे आदींनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे याबाबतची व्यथा नमूद केली.इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाने नेमून दिलेल्या भारती एक्स ! विमा कंपनी, पुणे यांच्याकडे पीकविमा काढून पिकविम्याची रक्कम भरली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे तालुक्यातील बहुतांश गावातील ७० ते ८० टक्के पिकांचे नुकसान झाले. मात्र काही गावातील अवघ्या चार पाच शेतकऱ्यांना मोबदला मिळाला. त्यामुळे गावगावात शेतकऱ्यांकडून ओरड होत असून स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाकडे विचारणा केली जात आहे. 

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीFarmerशेतकरी