शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:35 IST

मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अद्याप जिल्ह्यात समाधानकारक हजेरी न लागल्याने बळीराजा धास्तावला आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत दिले असले तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २२ जूनपर्यंत जिल्ह्णात ५.२७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान दुपटीने पाऊस नोंदविला गेला होता. शुक्रवारी दुपारी जिल्ह्णातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली.

नाशिक : मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अद्याप जिल्ह्यात समाधानकारक हजेरी न लागल्याने बळीराजा धास्तावला आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत दिले असले तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २२ जूनपर्यंत जिल्ह्णात ५.२७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान दुपटीने पाऊस नोंदविला गेला होता. शुक्रवारी दुपारी जिल्ह्णातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. मालेगाव शहरात एका तासात अतिवृष्टी झाली.  जिल्ह्यात अद्यापही दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, कळवण, सुरगाणा, देवळा व निफाड या तालुक्यांमध्ये सरासरी २३ टक्के पाऊस झाला असून, त्यामुळे मे महिन्यातच लागवडीसाठी शेतीची मशागत करून बसलेल्या शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विशेष म्हणजे, जून महिन्याच्या दमदार पावसाच्या भरवशावर भाताच्या आवणीला सुरुवात केली जाते. परंतु जूनचा शेवटचा आठवडा उजाडूनही पावसाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतील शेतकरी चिंतातुर झाले आहेत. १ जूनपासून जिल्ह्णात ८०१.७ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला असून, त्यात सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात १७० व त्यानंतर येवला येथे ११२ मिलिमीटर झाली आहे. येवला येथे गुरुवारी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने तालुक्यात एका दिवसातच ४४ मिलिमीटरची नोंद करण्यात आली. त्यामानाने निफाड तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे फक्त ११ मिलिमीटर पाऊस गेल्या २० दिवसांत नोंदविला गेला आहे. १ ते २२ जून यादरम्यान पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ५३ टक्के दिसत असला तरी, गेल्या वर्षी याच दरम्यान जिल्ह्णात १६२१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती व त्याची टक्केवारी १०.७ इतकी होती. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्माच पाऊस झाला आहे.  शुक्रवारी जिल्ह्णातील नाशिकसह मालेगाव, सटाणा, दिंडोरी आदी भागांत पावसाने हजेरी लावली. मालेगाव शहरात दुपारी १ वाजेच्या सुमारास जोरदार वाºयासह कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. एका तासात शहरात ७४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली. पावसाळी वातावरणामुळे हवेतील उकाडा कमी होण्यास मात्र मदत झाली.

 

टॅग्स :Rainपाऊस