शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:35 IST

मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अद्याप जिल्ह्यात समाधानकारक हजेरी न लागल्याने बळीराजा धास्तावला आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत दिले असले तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २२ जूनपर्यंत जिल्ह्णात ५.२७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान दुपटीने पाऊस नोंदविला गेला होता. शुक्रवारी दुपारी जिल्ह्णातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली.

नाशिक : मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अद्याप जिल्ह्यात समाधानकारक हजेरी न लागल्याने बळीराजा धास्तावला आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत दिले असले तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २२ जूनपर्यंत जिल्ह्णात ५.२७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान दुपटीने पाऊस नोंदविला गेला होता. शुक्रवारी दुपारी जिल्ह्णातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. मालेगाव शहरात एका तासात अतिवृष्टी झाली.  जिल्ह्यात अद्यापही दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, कळवण, सुरगाणा, देवळा व निफाड या तालुक्यांमध्ये सरासरी २३ टक्के पाऊस झाला असून, त्यामुळे मे महिन्यातच लागवडीसाठी शेतीची मशागत करून बसलेल्या शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विशेष म्हणजे, जून महिन्याच्या दमदार पावसाच्या भरवशावर भाताच्या आवणीला सुरुवात केली जाते. परंतु जूनचा शेवटचा आठवडा उजाडूनही पावसाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतील शेतकरी चिंतातुर झाले आहेत. १ जूनपासून जिल्ह्णात ८०१.७ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला असून, त्यात सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात १७० व त्यानंतर येवला येथे ११२ मिलिमीटर झाली आहे. येवला येथे गुरुवारी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने तालुक्यात एका दिवसातच ४४ मिलिमीटरची नोंद करण्यात आली. त्यामानाने निफाड तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे फक्त ११ मिलिमीटर पाऊस गेल्या २० दिवसांत नोंदविला गेला आहे. १ ते २२ जून यादरम्यान पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ५३ टक्के दिसत असला तरी, गेल्या वर्षी याच दरम्यान जिल्ह्णात १६२१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती व त्याची टक्केवारी १०.७ इतकी होती. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्माच पाऊस झाला आहे.  शुक्रवारी जिल्ह्णातील नाशिकसह मालेगाव, सटाणा, दिंडोरी आदी भागांत पावसाने हजेरी लावली. मालेगाव शहरात दुपारी १ वाजेच्या सुमारास जोरदार वाºयासह कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. एका तासात शहरात ७४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली. पावसाळी वातावरणामुळे हवेतील उकाडा कमी होण्यास मात्र मदत झाली.

 

टॅग्स :Rainपाऊस