शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

समान बांधकाम नियमावलीचा सामान्य नागरीकांना फटका : प्रा. दिलीप फडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:54 IST

नाशिक: राज्य शासनाने सर्व शहरांसाठी समान नियमावली तयार करण्याचे ठरविल्यानंतर त्याचे प्रारूप ८ मार्च रोजी प्रसिध्द केले आहे. आणि त्यावर हरकती तसेच सूचना मागवल्या आहेत. तथापि, यावरून बराच गदारोळ सुरू झाला असून नाशिकवर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यशासनाने शुध्दीपत्रक काढून एका प्रकरणात दिलासाही देण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, समान बांधकाम नियमावली अत्यंत अडाणीपणाची आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांना फटका बसणार नसून सर्वसामान्य नागरीकांना बसणार आहे, असे मत ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. दिलीप फडके यांनी केला आहे.

ठळक मुद्देसमान नियमावलीचा थेट नागरीकांशी संंबंधएखादा वाडा पडला तरी पुन्हा बांधता येणे कठीणसिडकोवासियांची अडचणशाळा इमारत बांधणेही अशक्य

नाशिक: राज्य शासनाने सर्व शहरांसाठी समान नियमावली तयार करण्याचे ठरविल्यानंतर त्याचे प्रारूप ८ मार्च रोजी प्रसिध्द केले आहे. आणि त्यावर हरकती तसेच सूचना मागवल्या आहेत. तथापि, यावरून बराच गदारोळ सुरू झाला असून नाशिकवर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यशासनाने शुध्दीपत्रक काढून एका प्रकरणात दिलासाही देण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, समान बांधकाम नियमावली अत्यंत अडाणीपणाची आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांना फटका बसणार नसून सर्वसामान्य नागरीकांना बसणार आहे, असे मत ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. दिलीप फडके यांनी केला आहे.प्रश्न: शासनाच्या समान बांधकाम नियमावली विषयी तुमचे काय मत आहे?प्रा. फडके: मुळात राज्यशासनाने तयार केलेल नियमावली ही बांधकामाशी संंंबंधीत आहे. म्हणजेच बिल्डर व्यवसायिकांशी संंबंधीत आहे, असा सर्वसामान्यांचा समज आहे. परंतु वस्तुस्त: हा सर्व सामान्य नागरीकांशी संबंधीत विषय आहे. शहरात बांधकामे करताना पार्कींगसाठी किती जागा सोडावी लागले आणि त्यामळे घर तरी आपल्याला बांधता येईल की नाही याच्याशी संबंधीत विषय आहे. अगदी जुन्या नाशिकमध्ये गेल्या पावसाळ्यात एक वाडा पडला. परंतु आता तो वाडा परत बांधायचे म्हंटले तर की त्याला या नियमावलीमुळे बांधकामच करता येणे शक्य नाही. शाळा किंवा रूग्णालयांसाठी सुध्दा अ‍ॅमेनिटीज स्पेससाठी इतकी जागा सोडावी लागणार आहे की त्यामुळे बांधकामच होणार नाही अशी अवस्था आहे. सिडको सारख्या वसाहतीत देखील भयंकर स्थिती होणार आहे. त्यामुळे हा विषय बिल्डर्स किंवा आर्किटेक्टचा नसून सामान्य नागरीकांचा आहे हेच मुळी नागरीकांपर्यंत पोहोचले पाहिजे.प्रश्न: परंतु राज्यशासनाने त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत ना..प्रा. फडके: राज्यशासनाने नियमावली तयार केली आहे. त्यावरून आरडाओरड झाल्यानंतर चटई क्षेत्रातील एक आक्षेप निकाली काढण्याचा प्रयत्न केला आहे. ८ मार्च रोजी अधिसूचना जारी झाली. आणि शुध्दीपत्रक त्याच दिवशीचे होते तर मग मुख्यमंत्र्यांकडे चर्चा झाल्यानंतर ते कसे काय बाहेर पडले. व्यवस्था म्हणा किंवा नेते अथवा नोकरशहा हे कुठे तरी फसवणूक करत आहेत असे वाटते. आता हरकती सूचना मागवून देखील निवडणूक आचारसंहितेमुळे त्यावर निर्णय होणार नाही.प्रश्न: तुमच्या मते नियमवली कशी करायला हवी होती?प्रा. फडके: नियमावलीतील त्रुटी हा खूप सविस्तर अभ्यासाने मांडण्याचा विषय आहे परंतु मुळात ही नियमावली केंद्रशासनाने तयार करण्यास सांगितली.त्यानंतर शासनाकडून कोणी तरी दोन निवृत्त अधिकारी नियुक्त झाले आणि त्यांनी घाईघाईने काही तरी नियमावली तयार करून प्रसिध्द केली आहे. खरोखरीच चांगली नियमावली तयार करायची असेल तर त्यासाठी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ, वास्तु विशारद, या क्षेत्रातील जाणकार वकील आणि ग्राहक प्रतिनिधी यांची एखादी समिती गठीत करायला हवी होती. नवे नियम कसे असावे याबाबत त्यांनी सूचना मागवायला हव्या होत्या आणि नंतर नियमावली करणे आवश्यक होते. परंतु येथे उलटे झाले असून आधी नियमावली आणि मग हरकती मागवल्या गेल्या आहेत त्यामुळे गोंधळाचे वातावरण आहे.मुलाखत: संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाconsumerग्राहकGovernmentसरकार