शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

दिंडोरी तालुक्यात द्राक्षे छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 17:57 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला द्राक्षे पिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु मागील हंगामात कोरोनामुळे या द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. परंतु आता पुन्हा द्राक्षे उत्पादक नव्या जोमाने शेतीकामात व्यस्त झाले आहेतझ द्राक्षे पिकाला या हंगामात कशा पद्धतीने चांगले उत्पन्न घेता येईल यासाठी आॅक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करण्यात द्राक्ष उत्पादक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमजुर आणण्यासाठी बळीराजाची धावपळ होत आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला द्राक्षे पिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु मागील हंगामात कोरोनामुळे या द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. परंतु आता पुन्हा द्राक्षे उत्पादक नव्या जोमाने शेतीकामात व्यस्त झाले आहेतझ द्राक्षे पिकाला या हंगामात कशा पद्धतीने चांगले उत्पन्न घेता येईल यासाठी आॅक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करण्यात द्राक्ष उत्पादक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी द्राक्षे बागेत चांगले पिक घेऊन ही सुरु वातीचा काही कालखंड जर सोडला तर नंतर मात्र द्राक्षे पिकाला कुठल्याही प्रकाराचा हमी भाव मिळाला नाही. भरपूर भांडवल खर्च करूनही पदरात कुठलाही मोबदला हातात न पडल्यामुळे शेतकरी हतबल झाला होता.परंतु हे सर्व आलेले कटु अनुभव बाजुला सावरून बळीराजाने आॅक्टोबर छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ करून द्राक्षे पिकांची काडी तयार होण्यासाठी विविध बँका, सोसायटी, पतसंस्था व मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. तसेच छाटणीपुर्व मशागतीस प्रारंभ करून महागडे किंमतीचे औषधांची खरेदी करून वेळोवेळी नियोजन करून वेगवेगळ्या औषधांची फवारणी करण्यासाठी भर दिला आहे. तसेच संततधार पावसाने काही वेळेस तणनाशक फवारणी करण्यासाठी शेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणात अडचणी निर्माण झाल्याने द्राक्षे बागामध्ये मोठ्या प्रमाणात तण, वेगवेगळ्या स्वरु पाची गवत वाढल्याने ते काढण्यासाठी शेतकरी वर्गाला तारे वरची कसरत करावी लागते आहे.सध्या शेतकरी वर्ग द्राक्षे पिक घेण्यासाठी जे मजुर लागतात. त्याच्या शोधात आहे. त्यासाठी पेठ, सुरगाणा, येथील काही ठराविक ठिकाणाहून मजुर आणण्यासाठी बळीराजाची धावपळ होत आहे.तसेच द्राक्षे पिकावर फवारणीसाठी जवळजवळ 70 टक्के शेतकरी वर्गाने यंत्रिक साधनांचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे सध्या तरी कमी मजुरांमध्ये काम करून घेतले जात आहे.मागील हंगामात कोरोना मुळे द्राक्षे पिकांची वाताहत झाल्याने व कुठल्याही प्रकाराचा शेवटपर्यंत हमी भाव न मिळाल्याने प्रत्येक शेतकरी यंदा भांडवलावाचून तळमळाणार आहे. यामुळे विविध बँकांनी द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गासाठी विशेष स्वरु पाची पॅकेज पध्दती उपलब्ध करून द्यावी. त्यातून द्राक्षे हंगाम योग्य घेता येईल.- अजित कड, द्राक्ष उत्पादक, दहेगाव

टॅग्स :Farmerशेतकरीcultureसांस्कृतिक