शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

दिंडोरी तालुक्यात द्राक्षे छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 17:57 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला द्राक्षे पिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु मागील हंगामात कोरोनामुळे या द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. परंतु आता पुन्हा द्राक्षे उत्पादक नव्या जोमाने शेतीकामात व्यस्त झाले आहेतझ द्राक्षे पिकाला या हंगामात कशा पद्धतीने चांगले उत्पन्न घेता येईल यासाठी आॅक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करण्यात द्राक्ष उत्पादक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमजुर आणण्यासाठी बळीराजाची धावपळ होत आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला द्राक्षे पिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु मागील हंगामात कोरोनामुळे या द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. परंतु आता पुन्हा द्राक्षे उत्पादक नव्या जोमाने शेतीकामात व्यस्त झाले आहेतझ द्राक्षे पिकाला या हंगामात कशा पद्धतीने चांगले उत्पन्न घेता येईल यासाठी आॅक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करण्यात द्राक्ष उत्पादक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी द्राक्षे बागेत चांगले पिक घेऊन ही सुरु वातीचा काही कालखंड जर सोडला तर नंतर मात्र द्राक्षे पिकाला कुठल्याही प्रकाराचा हमी भाव मिळाला नाही. भरपूर भांडवल खर्च करूनही पदरात कुठलाही मोबदला हातात न पडल्यामुळे शेतकरी हतबल झाला होता.परंतु हे सर्व आलेले कटु अनुभव बाजुला सावरून बळीराजाने आॅक्टोबर छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ करून द्राक्षे पिकांची काडी तयार होण्यासाठी विविध बँका, सोसायटी, पतसंस्था व मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. तसेच छाटणीपुर्व मशागतीस प्रारंभ करून महागडे किंमतीचे औषधांची खरेदी करून वेळोवेळी नियोजन करून वेगवेगळ्या औषधांची फवारणी करण्यासाठी भर दिला आहे. तसेच संततधार पावसाने काही वेळेस तणनाशक फवारणी करण्यासाठी शेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणात अडचणी निर्माण झाल्याने द्राक्षे बागामध्ये मोठ्या प्रमाणात तण, वेगवेगळ्या स्वरु पाची गवत वाढल्याने ते काढण्यासाठी शेतकरी वर्गाला तारे वरची कसरत करावी लागते आहे.सध्या शेतकरी वर्ग द्राक्षे पिक घेण्यासाठी जे मजुर लागतात. त्याच्या शोधात आहे. त्यासाठी पेठ, सुरगाणा, येथील काही ठराविक ठिकाणाहून मजुर आणण्यासाठी बळीराजाची धावपळ होत आहे.तसेच द्राक्षे पिकावर फवारणीसाठी जवळजवळ 70 टक्के शेतकरी वर्गाने यंत्रिक साधनांचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे सध्या तरी कमी मजुरांमध्ये काम करून घेतले जात आहे.मागील हंगामात कोरोना मुळे द्राक्षे पिकांची वाताहत झाल्याने व कुठल्याही प्रकाराचा शेवटपर्यंत हमी भाव न मिळाल्याने प्रत्येक शेतकरी यंदा भांडवलावाचून तळमळाणार आहे. यामुळे विविध बँकांनी द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गासाठी विशेष स्वरु पाची पॅकेज पध्दती उपलब्ध करून द्यावी. त्यातून द्राक्षे हंगाम योग्य घेता येईल.- अजित कड, द्राक्ष उत्पादक, दहेगाव

टॅग्स :Farmerशेतकरीcultureसांस्कृतिक