कादवा कारखाना सुरु राहण्यासाठी एकत्र या

By Admin | Updated: September 25, 2016 23:24 IST2016-09-25T23:23:31+5:302016-09-25T23:24:13+5:30

वार्षिक सभा : अडथळे आणून संस्थेचे नुकसान न करण्याचे श्रीराम शेटे यांचे विरोधकांना आवाहन

Come together to stay on the Kadwa factory | कादवा कारखाना सुरु राहण्यासाठी एकत्र या

कादवा कारखाना सुरु राहण्यासाठी एकत्र या

दिंडोरी : राज्यात साखर कारखाने बंद पडत असताना कादवा सहकारी साखर कारखाना काटकसर व पारदर्शी कारभार करत सुस्थितीत आणून दिमाखात सुरू ठेवला आहे. मात्र असे असतानाही विरोधक अर्जफाटे करत संस्थेला अडचणीत आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. हे योग्य नसून काय प्रश्न विचारायचे ते वार्षिक सभेत विचारावे व कारखाना सुरू ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. अडथळे आणून संस्थेचे नुकसान करू नका, असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून शेटे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, व्हा. चेअरमन उत्तम भालेराव, माजी चेअरमन अ‍ॅड. बाजीराव कावळे, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, उपसभापती अनिल देशमुख, जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सुरेश डोखळे, संचालक बापूराव पडोळ, त्रंबक संधान, सुनील केदार, बाळकृष्ण जाधव, मधुकर गटकळ, दिनकर जाधव, शहाजी सोमवंशी, विश्वनाथ देशमुख, शिवाजी बस्ते, सुकदेव जाधव, सुभाष शिंदे, शांताबाई पिंगळ, चंद्रकला घडवजे, संदीप शार्दुल, सोमनाथ कावळे, कार्यकारी संचालक बाळासाहेब उगले आदि मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी प्रास्ताविकात कामकाजाचा आढावा घेत शासन धोरण व विरोधकांच्या अर्जफाट्यामुळे कामकाजात अडचण होत असल्याचे सांगितले. नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम वाढीव खर्च, झालेला नफा-तोटा, नव्याने केलेले सभासद, शैक्षणिक संस्था कामकाज आदि विषयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
यावेळी माजी चेअरमन अ‍ॅड. बाजीराव कावळे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. तसेच माजी आमदार धनराज महाले, नरेंद्र जाधव, संजय कावळे, विलास निरगुडे, राजेंद्र उफाडे यांनीही प्रश्न विचारले. त्यास श्रीराम शेटे यांनी उत्तरे दिली.
करोडो रु पये कर कारखान्यांच्या माध्यमातून मिळत असताना सरकार मदतीऐवजी अडचणी निर्माण करत आहे. साखर विक्रीबाबतही शासनाचे जाचक नियम झाले असून, साखर विक्रीची सक्ती करत आहे. शासनाच्या नियमानुसार विक्र ी केली नाही तर ती साखर जप्त होईल व संचालक मंडळाला तुरु ंगाची हवा खावी लागेल हे सारे अजब असून, उत्पादकांवर विक्रीची सक्ती हे प्रथमच घडत आहे. या चुकीच्या धोरणामुळे कारखाने अडचणीत आले असल्याचे शेटे यांनी सांगितले. कारखाना सुरळीत ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते आभार जिल्हा बॅँक संचालक गणपतराव पाटील संचालक शहाजी सोमवंशी यांनी मानले. (वार्ताहर)
 

Web Title: Come together to stay on the Kadwa factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.