शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

४० फुटी रावणाचे गंगाघाटावर दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:35 IST

सियावर रामचंद्र की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो असा जयघोष करत विजयादशमी (दसरा) निमित्ताने चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने विजयाचे प्रतीक म्हणून गुरु वारी (दि.१८) रावणाचा ४० फूट उंचीचा पुतळा दहन करण्यात आला.

ठळक मुद्देविजयादशमी : श्रीरामाची सवाद्य मिरवणूक

पंचवटी: सियावर रामचंद्र की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो असा जयघोष करत विजयादशमी (दसरा) निमित्ताने चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने विजयाचे प्रतीक म्हणून गुरु वारी (दि.१८) रावणाचा ४० फूट उंचीचा पुतळा दहन करण्यात आला.रामकुंड येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने गेल्या दहा दिवसांपासून आयोजित करण्यात आलेल्या भगवान बालाजीचा नवरात्र उत्सव संपन्न झाला. सायंकाळी ७ वाजता प्रभू श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, वानरसेना यांची गंगाघाट परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.प्रभू रामाच्या भूमिकेत कौशल घोडके, भाग्येश देशपांडे (लक्ष्मण), विवेकानंद घोडके (हनुमान), छोटूराम आढळकर (रावण), आदित्य शिंदे, (विभिषण), (कुंभकर्ण) यश कोठावदे आदींनी भूमिका साकारल्या. कार्यक्र माला आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, विनिता सिंगल, सहायक पोलीस आयुक्त शांताराम पाटील, महंत कृष्णचरणदास, महंत भक्तिचरणदास, महंत राजारामदास, रामनारायण महाराज, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पांडुरंग बोडके, सचिन डोंगरे, देवांग जानी, किशोर गरड, भाविक उपस्थित होते.सियावर रामचंद्र की जयरामकुंडावर सवाद्य मिरवणुकीने आगमन झाल्यानंतर वानरसेना व राक्षससेना यांच्यात झालेल्या युद्धात राक्षसांचा वध करण्यात येऊन विजयाचे प्रतीक म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी सियावर रामचंद्र की जय अशी घोषणा दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमDasaraदसरा