शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

एकत्रित श्रमदानातून दुष्काळावर मात शक्य : भटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:05 IST

राज्यातील ४५ हजार गावांंमधील ग्रामस्थांनी राळेगणसिद्धी व हिवरे बाजारमध्ये श्रमदानातून झालेला कायापालट डोळ्यासमोर ठेवत एकत्रित श्रमदान केल्यास पुढील दहा ते पंधरा दुष्काळावर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पानी फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले आहे.

नाशिक : राज्यातील ४५ हजार गावांंमधील ग्रामस्थांनी राळेगणसिद्धी व हिवरे बाजारमध्ये श्रमदानातून झालेला कायापालट डोळ्यासमोर ठेवत एकत्रित श्रमदान केल्यास पुढील दहा ते पंधरा दुष्काळावर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पानी फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले आहे.  महाराष्ट्र सेवा समाज संघातर्फे रचना विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परशुराम साइखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि. २८) शांता लिमये स्मृती व्याख्यानमालेत जलसाक्षरता विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे होते. व्यासपीठावर विजय डोंगरे, डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. विनायक नेर्लीकर, ना. सी. पाटील उपस्थित होते.सत्यजित भटकळ म्हणाले, स्त्री-भ्रूण हत्या, घनकचरा व्यवस्थापन यांसारखे अनेक प्रश्न सर्वसामान्यांपुढे असून, या प्रश्नांची उत्तरेही शोधणारही आपल्याकडे आहेत. राज्यातील सर्व गावांसोबतच शहरवासीयांनीही श्रमदानाचे आणि ज्ञान विद्याप्रसाराचे महत्त्व लक्षात घेऊन राळेगण सिद्धी व हिवरे बाजार यांसारख्या गावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. दुष्काळावर मात करण्यासाठी कितीही योजना आणल्या त्यावर अब्जावधी रुपये खर्च केले तरीही आजही पाणीप्रश्न संपुष्टात आलेला नाही. हा प्रश्न सोडविण्यासठी पानी फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू आहे. दरम्यान, रचना विद्यालयातील विद्यार्थिनींनी पाणी वाचविण्याचा संदेश देणारे गीत सादर केले. सुधाकर साळी यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शांताराम आहिरे यांनी आभार मानले.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी