शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

एकलहरेसह राज्यातील  वीज केंद्रांना कोळशाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:54 IST

सणासुदीत विजेची मागणी वाढलेली असतानाच राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर कोळशाचे संकट उभे ठाकल्यामुळे वीजनिर्मितीचे मोठे आव्हान महाजनको पुढे उभे ठाकले असून, सर्वच केंद्रांवर सरासरी दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा असल्यामुळे काळजीत भर पडली आहे.

एकलहरे : सणासुदीत विजेची मागणी वाढलेली असतानाच राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर कोळशाचे संकट उभे ठाकल्यामुळे वीजनिर्मितीचे मोठे आव्हान महाजनको पुढे उभे ठाकले असून, सर्वच केंद्रांवर सरासरी दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा असल्यामुळे काळजीत भर पडली आहे.  राज्यातील महानिर्मितीकडे सरासरी ३ लाख ४० हजार मेट्रिक टन इतका कोळसा उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कोळशाअभावी महानिर्मितीच्या संचांची निर्मिती क्षमता असूनही पुरेशी वीज निर्मिती होऊ शकत नाही. राज्यातील सर्वच ग्रिडमध्ये ५ हजार मेगावॉट विजेची उपलब्धता होईल, असे आश्वासन सरकार देत असले तरी, प्रत्यक्षात कोळशाअभावी पुरेशी वीज निर्मिती होऊ शकत नसल्याने हे आश्वासन महानिर्मिती कसे पुरे करणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या चंद्रपूरच्या केंद्रात १० हजार मेट्रिक टन, पारस व नाशिक केंद्रात ९ हजार मेट्रिक टन कोळसाचा साठा असून, हा साठा अवघ्या दीड ते दोन दिवस पुरेल, असे सांगण्यात येते.  राज्यात सध्या सणासुदीच्या दिवसात विजेची मागणी वाढली असून, त्याप्रमाणात मात्र वीज उत्पादन होत नसल्याने नागरिकांना भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात ८ ते १२ तास भारनियमन सुरू असून, येत्या दोन दिवसात पुरेसा कोळसा उपलब्ध झाला नाही तर वीज उत्पादनावर गंभीर परिणाम होऊन भारनियमन वाढण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या केंद्राजवळच कोळशाच्या खाणी असल्यामुळे त्यांचे संकट फारसे गंभीर नसले तरी, नाशिकच्या केंद्राचे अंतर पाहता कोळसा वेळेत मिळणे गरजेचे झाले आहे. अशातच सर्वच केंद्रांना टंचाई असेल तर नाशिकची गरज कशी पूर्ण होईल, असा प्रश्न येथील अधिकाऱ्यांना पडला आहे. सध्या नाशिकच्या केंद्रात दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा असून, संच क्रमांक ३ व ४ हे प्रत्येकी १५० मेगावॉट वीज निर्मिती करीत आहेत. संच क्रमांक ५ स्टँडबाय आहे.खासगी कंपनीच्या कोळशाचे काय झाले?नाशिकच्या तीन संचांपैकी एका संचाचा कोळसा खासगी कंपनीकडे आठ महिन्यांच्या कराराने वळविण्यात आला होता. तेव्हा वीज क्षेत्र बचाव कृती समितीने आंदोलन केले होते. मात्र आता तो आठ महिन्यांचा करार संपुष्टात आला असून, वळविलेला कोळसा कोठे गेला, असा प्रश्न अधिकारी व कर्मचारी करू लागले आहेत. स्थानिक पातळीवर याची कोणतीही माहिती नाही.

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन