शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

त्र्यंबकेश्वर येथे लवकरच होणार सीएनजी प्रकल्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 00:57 IST

भारत जेव्हा इंधन समृद्ध देश होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने महासत्ता बनेल, त्याकरिता प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणमुक्त राहाण्याचा सल्ला एमसीएल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कार्तिक रावल यांनी येथे श्री पंचायती निरंजनी आखाड्यातर्फे होणाऱ्या गॅस प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी दिला.

ठळक मुद्देपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणमुक्त राहा : कार्तिक रावल

त्र्यंबकेश्वर : भारत जेव्हा इंधन समृद्ध देश होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने महासत्ता बनेल, त्याकरिता प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणमुक्त राहाण्याचा सल्ला एमसीएल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कार्तिक रावल यांनी येथे श्री पंचायती निरंजनी आखाड्यातर्फे होणाऱ्या गॅस प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी दिला.

मंगळवारी (दि.२३) अंबोली येथील बुवाची वाडी येथील आखाड्याच्या मोकळ्या जागेत या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा श्री त्र्यंबकेश्वर षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती, शंकरानंद सरस्वती ऊर्फ भगवान बाबा, पंचायती श्रीनिरंजनी आखाड्याचे सचिव महंत दिनेशगिरी, बेझे येथील श्रीराम शक्तिपीठाचे प्रमुख निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर श्रीस्वामी सोमेश्वरानंद, धनंजय गिरी, महंत केशवपुरी आदी मान्यवर संत-महंत या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.

येथील श्री पंचायती आखाडा निरंजनीतर्फे मीरा क्लिनफ्युल्स लिमिटेडतर्फे पंचायती श्रीनिरंजनी आखाडा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, बुवाची वाडी येथे बायो-सीएनजी व बायो-पीएनजी प्रकल्प साकारत आहे. त्यासाठी १० रुपये भरून सभासद व्हावे. कंपनीने दिलेल्या हत्ती गवताची लागवड करून त्यापासून बायो सीएनजी, बायो पीएनजी गॅसचे निर्मिती होऊ शकेल. याबरोबरच नगरपरिषदेचा कचराही कंपनीत जमा करून बायोगॅसची निर्मिती होऊ शकेल. जेणेकरून त्र्यंबकेश्वर शहर प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक होईल, असे रावल म्हणाले.

 

यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम, सचिन कुऱ्हाडे, अरुण मेढे, समाधान बोडके, राजू घुले, स्वाती पवार, शारदा तुंगार, संजय चव्हाण, रामचंद्र बदादे, न. ग. डगळे, ऋषभ पवार, ज्ञानेश्वर मेढे, सुरेश मालुंजकर, सूरज बामणे, मनोहर उदार, सुशांत तुंगार, दीपक मिंदे, सचिन तिदमे, पोपट गुंबाडे, धनंजय महाले आदी उपस्थित होते.

दरम्यान, हा प्रकल्प सुरू झाल्यास दररोज एक लाख लिटर गॅसचे उत्पादन होऊ शकेल. तसेच सुमारे २००० लोकांना रोजगार मिळू शकेल, अशी माहिती देण्यात आली.

(२३ त्र्यंबक गॅस १,२,३)

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNashikनाशिकSocialसामाजिक