शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

देवगाव परिसरातील पिकांना ढगाळ हवामानाचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 15:52 IST

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरातही रिमझिम पावसाने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सलग तीन दिवसांपासून ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी सुरुच ठेवली असून मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने थंडीतही वाढ झाली आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कुळीद, बाजरी, तूर व भात आदी रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच खरिपाची मळणी करुन जागेवर ठेवण्यात आलेल्या चाऱ्याचा या पावसामुळे प्रश्न निर्माण झाल्याने नुकसान बाधित शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली आहे.

तीन दिवसांपासून हवामान बदलाने पडणाऱ्या बेमोसमी पावसामुळे देवगावसह वावीहर्ष, टाकेदेवगाव, श्रीघाट, येल्याचीमेंट, चंद्राचीमेंट,आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्ष आदी गावांत शेतकऱ्यांनी कापणी केलेले व खळ्यावर गंजी रचून ठेवलेल्या भाताची उडवी भिजल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या प्रारंभी पावसाची प्रतीक्षा व नंतरच्या काळात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेती नष्ट झाली. पावसापासून वाचवलेल्या पिकांची कापणी करून खळ्यावर मळणीसाठी तयार असलेल्या भातात आता पावसाचे पाणी शिरल्याने उरलेसुरले धान्यदेखील भिजून वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. खळ्यावर रचून ठेवलेल्या भाताच्या उडव्याची पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्लास्टिक ताडपत्रीच्या साहाय्याने झाकणी केली आहे. परंतु, प्लास्टिक ताडपत्री किंवा इतर काही साधन नसलेल्या शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी