आभाळात ढग दाटून येतात खरे; मात्र पावसाच्या धारा बरसत नसल्याने बळीराजा सध्या प्रचंड काळजीत आहे.
By Admin | Updated: July 14, 2014 00:29 IST2014-07-13T23:40:34+5:302014-07-14T00:29:19+5:30
आभाळात ढग दाटून येतात खरे; मात्र पावसाच्या धारा बरसत नसल्याने बळीराजा सध्या प्रचंड काळजीत आहे.

आभाळात ढग दाटून येतात खरे; मात्र पावसाच्या धारा बरसत नसल्याने बळीराजा सध्या प्रचंड काळजीत आहे.
आभाळात ढग दाटून येतात खरे; मात्र पावसाच्या धारा बरसत नसल्याने बळीराजा सध्या प्रचंड काळजीत आहे. नांगरणीनंतर पाऊस झाल्यावर शेतातील ढेकळे फुटतात. यानंतर वखरणी केल्यावर शेत पेरणीसाठी तयार होते. यंदा मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतांतील ढेकळेच फुटलेली नाहीत. त्यामुळे शेतात पुन: पुन्हा वखरणी करताना शहराजवळच्या परिसरातील बळीराजा. वखरणीला जुंपलेले बैलदेखील पावसाची कृपा होईल तरी कधी, याचा आभाळाकडे पाहून जणू अंदाज घेत आहेत!