शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जागांचा दावा करणे म्हणजे ईव्हीएम फिक्स : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:23 IST

विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकसभेपेक्षा विधानसभेचे चित्र वेगळे असेल असे सांगून राज्यात आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी चव्हाण आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीसाठी भाजप साम, दाम, दंड भेदनीतीचा अवलंब करीत असून, महाजन यांनी जागांबद्दल बोलण्याऐवजी बॅलेट पेपरचा वापर करणार का? यावर बोलावे, असेही चव्हाण म्हणाले. आगामी विधानसभेची निवडणूक कॉँग्रेससाठी महत्त्वाची निवडणूक असणार आहे. यासाठी कॉँग्रेसकडून जोरदार नियोजन सुरू आहे. राष्टवादीशी आघाडी करण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाने तत्त्वत: मान्यता दिली असून, येत्या आठ दिवसांमध्ये जागा वाटपासंदर्भातील बैठक होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.राष्टÑवादीबरोबरच अन्य समविचार पक्षांशीदेखील आघाडी करण्याची कॉँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. अर्थात तत्पूर्वी सर्व जिल्हाध्यक्षांशी चर्चा करूनच यावर निर्णय घेतला जाणार आहे. यंदा नवीन चेहरे आणि महिलांना संधी दिली जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. येत्या ६ जुलै रोजी देशभरातून इच्छुकांचे अर्ज मागविले जाणार असल्याचेही ते म्हणाले.या निवडणुकीत प्रभावी प्रचार राबविताना राज्यातील सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक कर्जमाफीचा प्रश्न, कर्जवाटप या विषयावर आंदोलने केली जाणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत, त्याचा परिणाम राज्यांवर होणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये राष्टÑपती राजवट लागू केली म्हणजे सर्व आलबेल आहे,असे नाही. भाजपला अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत जम्मू- काश्मीरमध्ये निवडणूक होणार नाही, असा दावाही चव्हाण यांनी केला.वंचित आघाडीशी चर्चालोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचा फॅक्टर ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यावर चर्चेची जबाबदारी सोपविली असून, मनसेला सोबत घेण्याबाबत मतभेद अद्याप कायम असल्याचा खुलासाही चव्हाण यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाElectionनिवडणूक