शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

जागांचा दावा करणे म्हणजे ईव्हीएम फिक्स : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:23 IST

विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकसभेपेक्षा विधानसभेचे चित्र वेगळे असेल असे सांगून राज्यात आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी चव्हाण आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीसाठी भाजप साम, दाम, दंड भेदनीतीचा अवलंब करीत असून, महाजन यांनी जागांबद्दल बोलण्याऐवजी बॅलेट पेपरचा वापर करणार का? यावर बोलावे, असेही चव्हाण म्हणाले. आगामी विधानसभेची निवडणूक कॉँग्रेससाठी महत्त्वाची निवडणूक असणार आहे. यासाठी कॉँग्रेसकडून जोरदार नियोजन सुरू आहे. राष्टवादीशी आघाडी करण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाने तत्त्वत: मान्यता दिली असून, येत्या आठ दिवसांमध्ये जागा वाटपासंदर्भातील बैठक होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.राष्टÑवादीबरोबरच अन्य समविचार पक्षांशीदेखील आघाडी करण्याची कॉँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. अर्थात तत्पूर्वी सर्व जिल्हाध्यक्षांशी चर्चा करूनच यावर निर्णय घेतला जाणार आहे. यंदा नवीन चेहरे आणि महिलांना संधी दिली जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. येत्या ६ जुलै रोजी देशभरातून इच्छुकांचे अर्ज मागविले जाणार असल्याचेही ते म्हणाले.या निवडणुकीत प्रभावी प्रचार राबविताना राज्यातील सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक कर्जमाफीचा प्रश्न, कर्जवाटप या विषयावर आंदोलने केली जाणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत, त्याचा परिणाम राज्यांवर होणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये राष्टÑपती राजवट लागू केली म्हणजे सर्व आलबेल आहे,असे नाही. भाजपला अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत जम्मू- काश्मीरमध्ये निवडणूक होणार नाही, असा दावाही चव्हाण यांनी केला.वंचित आघाडीशी चर्चालोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचा फॅक्टर ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यावर चर्चेची जबाबदारी सोपविली असून, मनसेला सोबत घेण्याबाबत मतभेद अद्याप कायम असल्याचा खुलासाही चव्हाण यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाElectionनिवडणूक