शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

चौगाव बर्डी परिसरातील नागरिक कचरा डेपोमुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:57 IST

सटाणा : शहरातील चौगाव रोड परिसरातील नववसाहतीसह चौगाव बर्डी परिसरातील रहिवाशी कचरा डेपोमुळे त्रस्त झाले आहेत. आम्ही गरीब आदिवाशी, मातंग समाजाचे असल्यामुळेच आमच्या दाराशेजारी कचरा डेपो तयार केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही आम्हाला अशा मरणयातना सोसाव्या लागत आहेत. प्रचंड प्रमाणात दुर्गंधी ,अस्वच्छता ,गटारींचा अभाव ,गटारी आहेत तर त्याही तुंबलेल्या असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला एकप्रकारे हरताळ फासण्याचे काम दस्तुरखुद्द पालिका प्रशासनाने केल्याच्या संतप्त भावना स्थानिक नागरिकात व्यक्त होत आहेत.

शहरातील चौगाव रस्ता परिसरातील नववसाहती ,चौगाव बर्डी परिसर या भागात शेतकरी ,नोकरदार ,व्यापारी ,कष्टकरी वर्गाचा रहिवास आहे. या भागात गटारींचा अभाव असल्यामुळे ठिकठिकाणी साचलेले सांडपाण्याचे खड्डे ,रस्त्यांची झालेली दुरवस्था ,तीस तीस नळांना पाणी नाही अशा गंभीर समस्यांच्या फेऱ्यात हा परिसर सापडला आहे. या भागातील मुख्य डोकेदुखी आहे ती कचरा डेपो. चौगावबर्डी या मोलमजुरी करणाºया आदिवासी ,मातंग समाजाच्या रहिवाशांच्या वस्तीलगत संपूर्ण गावातील घनकचरा टाकल्यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधीयुक्त परिसर म्हणून याकडे बघितले जाते. प्रचंड प्रमाणात दुर्गंधी असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दुर्गंधीमुळे या रस्त्यावरून जातांना नागरिकांना अक्षरश: नाक-तोंड दाबून पुढे जावे लागते .त्यांची ही अवस्था असताना स्थानिक नागरिकांचे काय हाल असतील त्याची कल्पना न केलेलीच बरे. कच-यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव असून यामुळे साथीचे आजारही झपाट्याने वाढत आहेत. मलेरिया,डेंग्यू सदृश्य आदी साथींची लागण झालेले सर्वाधिक रु ग्ण याच भागातील असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या कचरा डेपोपासून अर्धा किलोमीटर अंतरावर चौगाव रस्त्यावरील नववसाहती आहेत. त्यांनादेखील दुर्गंधीची मोठी समस्या भेडसावत आहे. शहरातील साठफुटी रस्त्याच्या गटारीचीही मोठी समस्या असून याठिकाणी लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांनी अतिक्र मण केल्यामुळे गटार बंद होऊन ती तुंबली आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरून या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या या अतिक्र मणमुळे साठफुटी रस्त्याचे काम पंधरा वर्षांपासून रखडले आहे. यामुळे शहराचा पूर्णपणे विकास खुंटला असल्याच्या तक्र ारी आहेत. त्यातच गटार बंद झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अतिक्र मण काढावे अशी मागणीदेखील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGarbage Disposal Issueकचरा प्रश्न