शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

चौगाव बर्डी परिसरातील नागरिक कचरा डेपोमुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:57 IST

सटाणा : शहरातील चौगाव रोड परिसरातील नववसाहतीसह चौगाव बर्डी परिसरातील रहिवाशी कचरा डेपोमुळे त्रस्त झाले आहेत. आम्ही गरीब आदिवाशी, मातंग समाजाचे असल्यामुळेच आमच्या दाराशेजारी कचरा डेपो तयार केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही आम्हाला अशा मरणयातना सोसाव्या लागत आहेत. प्रचंड प्रमाणात दुर्गंधी ,अस्वच्छता ,गटारींचा अभाव ,गटारी आहेत तर त्याही तुंबलेल्या असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला एकप्रकारे हरताळ फासण्याचे काम दस्तुरखुद्द पालिका प्रशासनाने केल्याच्या संतप्त भावना स्थानिक नागरिकात व्यक्त होत आहेत.

शहरातील चौगाव रस्ता परिसरातील नववसाहती ,चौगाव बर्डी परिसर या भागात शेतकरी ,नोकरदार ,व्यापारी ,कष्टकरी वर्गाचा रहिवास आहे. या भागात गटारींचा अभाव असल्यामुळे ठिकठिकाणी साचलेले सांडपाण्याचे खड्डे ,रस्त्यांची झालेली दुरवस्था ,तीस तीस नळांना पाणी नाही अशा गंभीर समस्यांच्या फेऱ्यात हा परिसर सापडला आहे. या भागातील मुख्य डोकेदुखी आहे ती कचरा डेपो. चौगावबर्डी या मोलमजुरी करणाºया आदिवासी ,मातंग समाजाच्या रहिवाशांच्या वस्तीलगत संपूर्ण गावातील घनकचरा टाकल्यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधीयुक्त परिसर म्हणून याकडे बघितले जाते. प्रचंड प्रमाणात दुर्गंधी असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दुर्गंधीमुळे या रस्त्यावरून जातांना नागरिकांना अक्षरश: नाक-तोंड दाबून पुढे जावे लागते .त्यांची ही अवस्था असताना स्थानिक नागरिकांचे काय हाल असतील त्याची कल्पना न केलेलीच बरे. कच-यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव असून यामुळे साथीचे आजारही झपाट्याने वाढत आहेत. मलेरिया,डेंग्यू सदृश्य आदी साथींची लागण झालेले सर्वाधिक रु ग्ण याच भागातील असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या कचरा डेपोपासून अर्धा किलोमीटर अंतरावर चौगाव रस्त्यावरील नववसाहती आहेत. त्यांनादेखील दुर्गंधीची मोठी समस्या भेडसावत आहे. शहरातील साठफुटी रस्त्याच्या गटारीचीही मोठी समस्या असून याठिकाणी लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांनी अतिक्र मण केल्यामुळे गटार बंद होऊन ती तुंबली आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरून या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या या अतिक्र मणमुळे साठफुटी रस्त्याचे काम पंधरा वर्षांपासून रखडले आहे. यामुळे शहराचा पूर्णपणे विकास खुंटला असल्याच्या तक्र ारी आहेत. त्यातच गटार बंद झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अतिक्र मण काढावे अशी मागणीदेखील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGarbage Disposal Issueकचरा प्रश्न