शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

चौगाव बर्डी परिसरातील नागरिक कचरा डेपोमुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:57 IST

सटाणा : शहरातील चौगाव रोड परिसरातील नववसाहतीसह चौगाव बर्डी परिसरातील रहिवाशी कचरा डेपोमुळे त्रस्त झाले आहेत. आम्ही गरीब आदिवाशी, मातंग समाजाचे असल्यामुळेच आमच्या दाराशेजारी कचरा डेपो तयार केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही आम्हाला अशा मरणयातना सोसाव्या लागत आहेत. प्रचंड प्रमाणात दुर्गंधी ,अस्वच्छता ,गटारींचा अभाव ,गटारी आहेत तर त्याही तुंबलेल्या असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला एकप्रकारे हरताळ फासण्याचे काम दस्तुरखुद्द पालिका प्रशासनाने केल्याच्या संतप्त भावना स्थानिक नागरिकात व्यक्त होत आहेत.

शहरातील चौगाव रस्ता परिसरातील नववसाहती ,चौगाव बर्डी परिसर या भागात शेतकरी ,नोकरदार ,व्यापारी ,कष्टकरी वर्गाचा रहिवास आहे. या भागात गटारींचा अभाव असल्यामुळे ठिकठिकाणी साचलेले सांडपाण्याचे खड्डे ,रस्त्यांची झालेली दुरवस्था ,तीस तीस नळांना पाणी नाही अशा गंभीर समस्यांच्या फेऱ्यात हा परिसर सापडला आहे. या भागातील मुख्य डोकेदुखी आहे ती कचरा डेपो. चौगावबर्डी या मोलमजुरी करणाºया आदिवासी ,मातंग समाजाच्या रहिवाशांच्या वस्तीलगत संपूर्ण गावातील घनकचरा टाकल्यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधीयुक्त परिसर म्हणून याकडे बघितले जाते. प्रचंड प्रमाणात दुर्गंधी असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दुर्गंधीमुळे या रस्त्यावरून जातांना नागरिकांना अक्षरश: नाक-तोंड दाबून पुढे जावे लागते .त्यांची ही अवस्था असताना स्थानिक नागरिकांचे काय हाल असतील त्याची कल्पना न केलेलीच बरे. कच-यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव असून यामुळे साथीचे आजारही झपाट्याने वाढत आहेत. मलेरिया,डेंग्यू सदृश्य आदी साथींची लागण झालेले सर्वाधिक रु ग्ण याच भागातील असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या कचरा डेपोपासून अर्धा किलोमीटर अंतरावर चौगाव रस्त्यावरील नववसाहती आहेत. त्यांनादेखील दुर्गंधीची मोठी समस्या भेडसावत आहे. शहरातील साठफुटी रस्त्याच्या गटारीचीही मोठी समस्या असून याठिकाणी लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांनी अतिक्र मण केल्यामुळे गटार बंद होऊन ती तुंबली आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरून या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या या अतिक्र मणमुळे साठफुटी रस्त्याचे काम पंधरा वर्षांपासून रखडले आहे. यामुळे शहराचा पूर्णपणे विकास खुंटला असल्याच्या तक्र ारी आहेत. त्यातच गटार बंद झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अतिक्र मण काढावे अशी मागणीदेखील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGarbage Disposal Issueकचरा प्रश्न