कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण
By Admin | Updated: June 9, 2014 01:00 IST2014-06-09T00:55:00+5:302014-06-09T01:00:01+5:30
कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण

कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण
नाशिक : राज्यात नागपूर आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असताना नाशिकमध्ये मात्र पारा अजूनही चाळिशीच्या आत आहे. मात्र चटका वाढल्याने नागरिकांना तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत नाशिकचे तपमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले गेले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत तपमानाने चाळिशी गाठली नसली तरी उन्हाचा चांगलाच चटका बसत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक दुपारी घराबाहेर पडत नसल्याने रस्ते ओस पडत आहे. साधारणपणे १२ ते ४ वाजेपर्यंत तुरळकच गर्दी दिसते. शनिवार, रविवार असूनही घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमीच जाणवली.