शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची नव्या नोटांसाठी धावाधाव

By admin | Updated: November 16, 2016 00:48 IST

नागरिकांची नव्या नोटांसाठी धावाधाव

विंचूर : नोटा रद्दच्या निर्णयाने गोरगरीब जनतेबरोबरच मध्यमवर्गीय जनतेचे गेल्या आठ दिवसांपासून हाल सुरू आहेत. काबाडकष्ट करून जमवून ठेवलेल्या नोटा बदलण्यासाठी लोकांची एकच धावपळ उडाली आहे. कामधंदा सोडून गेल्या काही दिवसांपासून बॅँकांच्या रांगेत लोकांना तिष्ठत उभे राहावे लागत आहे. बँकांसमोर लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. सर्वसामान्य जनतेची पैशासाठी अडवणूक होऊ नये यासाठी रविवारीदेखील बँका सुरू होत्या. यामध्ये बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. सोमवारी गुरू नानक जयंतीनिमित्त शासकीय सुटी असल्याने बॅँका बंद होत्या. मंगळवारी सकाळपासूनच बँकांसमोर पुन्हा तोबा गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले.  सुट्या पैशांअभावी दुकानदारांकडून दोन हजाराची नोट स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्र ार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुकानात गेल्यावर ग्राहक माल खरेदी केल्यानंतर दोन हजाराची नोट देतात. सध्याच्या परिस्थितीत ग्राहकाला एवढे सुटे पैसे कोठून आणायचे, असा रास्त सवाल दुकानदार करतानाचे चित्र आहे. दोन हजार रु पयांची नोट चलनात आणली असली तरीही नागरिकांना दिलासा मिळाला नसल्याचे दिसून आले. त्याऐवजी ५०० रुपयांच्या नोटा मुबलक प्रमाणात चलनात आणणे गरजेचे होते, अशा प्रतिक्रि या व्यावसायिकांकडून दिल्या जात आहेत. खात्यातून पैसे काढण्याची तसेच नोटा बदलून देण्याची मर्यादा वाढविल्याने जनतेला थोडाफार दिलासा मिळाला आहे. ग्राहकाने पाचशे व हजाराच्या नोटा दिल्यास नोटेवर ग्राहकाच्या सह्या घेण्याचा फंडा एका गॅस एजन्सीने अवलंबिला आहे.  जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्या असल्या तरी 30 डिसेंबरपर्यंत त्या बँकांत स्वीकारल्या जाणार आहेत. मात्र नोटा बंद झाल्याच्या निर्णयानंतर बहुतांशी दुकानदार जुन्या नोटा घेण्यास नकार देत आहेत. वास्तविक ग्राहकांकडून नोटा स्वीकारून दुकानदार त्या नोटा बॅँकेत आपल्या खात्यात जमा करू शकतात. मात्र अनेक दुकानदारांकडून नोटा स्वीकारल्या जात नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. नोटा बदलण्यासाठी बँकेत जावे तर बँकेत दोन दोन तास उभे राहूनही नंबर लागत नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. पाचशे हजारच्या नोटा बॅँकेत जमा करण्याची डिसेंबरच्या अखेरपर्यंत मुदत असूनही लोकांनी बॅँकेत एकाचवेळी गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.