शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

नागरिकांची नव्या नोटांसाठी धावाधाव

By admin | Updated: November 16, 2016 00:48 IST

नागरिकांची नव्या नोटांसाठी धावाधाव

विंचूर : नोटा रद्दच्या निर्णयाने गोरगरीब जनतेबरोबरच मध्यमवर्गीय जनतेचे गेल्या आठ दिवसांपासून हाल सुरू आहेत. काबाडकष्ट करून जमवून ठेवलेल्या नोटा बदलण्यासाठी लोकांची एकच धावपळ उडाली आहे. कामधंदा सोडून गेल्या काही दिवसांपासून बॅँकांच्या रांगेत लोकांना तिष्ठत उभे राहावे लागत आहे. बँकांसमोर लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. सर्वसामान्य जनतेची पैशासाठी अडवणूक होऊ नये यासाठी रविवारीदेखील बँका सुरू होत्या. यामध्ये बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. सोमवारी गुरू नानक जयंतीनिमित्त शासकीय सुटी असल्याने बॅँका बंद होत्या. मंगळवारी सकाळपासूनच बँकांसमोर पुन्हा तोबा गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले.  सुट्या पैशांअभावी दुकानदारांकडून दोन हजाराची नोट स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्र ार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुकानात गेल्यावर ग्राहक माल खरेदी केल्यानंतर दोन हजाराची नोट देतात. सध्याच्या परिस्थितीत ग्राहकाला एवढे सुटे पैसे कोठून आणायचे, असा रास्त सवाल दुकानदार करतानाचे चित्र आहे. दोन हजार रु पयांची नोट चलनात आणली असली तरीही नागरिकांना दिलासा मिळाला नसल्याचे दिसून आले. त्याऐवजी ५०० रुपयांच्या नोटा मुबलक प्रमाणात चलनात आणणे गरजेचे होते, अशा प्रतिक्रि या व्यावसायिकांकडून दिल्या जात आहेत. खात्यातून पैसे काढण्याची तसेच नोटा बदलून देण्याची मर्यादा वाढविल्याने जनतेला थोडाफार दिलासा मिळाला आहे. ग्राहकाने पाचशे व हजाराच्या नोटा दिल्यास नोटेवर ग्राहकाच्या सह्या घेण्याचा फंडा एका गॅस एजन्सीने अवलंबिला आहे.  जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्या असल्या तरी 30 डिसेंबरपर्यंत त्या बँकांत स्वीकारल्या जाणार आहेत. मात्र नोटा बंद झाल्याच्या निर्णयानंतर बहुतांशी दुकानदार जुन्या नोटा घेण्यास नकार देत आहेत. वास्तविक ग्राहकांकडून नोटा स्वीकारून दुकानदार त्या नोटा बॅँकेत आपल्या खात्यात जमा करू शकतात. मात्र अनेक दुकानदारांकडून नोटा स्वीकारल्या जात नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. नोटा बदलण्यासाठी बँकेत जावे तर बँकेत दोन दोन तास उभे राहूनही नंबर लागत नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. पाचशे हजारच्या नोटा बॅँकेत जमा करण्याची डिसेंबरच्या अखेरपर्यंत मुदत असूनही लोकांनी बॅँकेत एकाचवेळी गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.