शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 4:51 PM

खामखेडा : गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.

ठळक मुद्देमार्च महिन्याच्या सुरुवातीपासून वातावरणात बदल होऊन ऊन तापू लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून सूर्यदेवता आग ओकण्यात सुरुवात करत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवू लागला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही नागरिकांच्या दैनंदिन काम

खामखेडा : गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.सध्या सर्वत्र शेतीकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शिवारात सर्वत्र कांदा काढण्याचे काम जोमात आहे. परंतु कडक उन्हामुळे शेतीत काम करणारे शेतमजुरांनी कामाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. मजूर सकाळी आठ वाजता शेतात जाऊन अकरा वाजेपर्यंत काम करतात. आणि अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत शेतातील झाड्याच्या सावलीत आराम करताना दिसून येत आहे. चार वाजेनंतर पुन्हा सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतात काम करतात. गाय, बकऱ्या, मेंढ्या चारणारे गुराखीसुद्धा सकाळी लवकर आपली जनावरे चारण्यासाठी नेऊन दुपारी नदीकिनारी किंवा शेतातील झाडाच्या सावलीखाली आपली जनावरे उभी करून आराम करणे पसंत करत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळाच्या वेळेतही बदल केला आहे. दुपारी भरणारी शाळा सकाळ सत्रात केल्या आहेत. या कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेस कोणीही बाहेर फिरताना दिसून येत नाही. दुपारच्या वेळेस बाहेर फिरणारे नागरिक टोपी किंवा उपरणे डोक्यावर घेऊन बचाव करताना दिसत आहे. प्रचंड उखडा असल्याने दुपारच्या वेळेस पंखासुद्धा गरम हवा फेकत असल्याने लोक झाडाच्या सावलीखाली आराम करणे पसंत करीत आहेत. चालू वर्षी मार्च महिन्यातच उन्हाचा चटका बसत असल्याने एप्रिल-मे महिना कसा जाईल यांच्यावर नागरिकतिं चर्चा होत आहे.कडक उन्हामुळे अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शिवारातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. उन्हामुळे शेतातील पिकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासू लागली आहे. सकाळी पाणी भरूनही कडक उन्हामुळे सायंकाळी जमीन कोरडी दिसून येत आहे. तेव्हा पिके कशी जतन करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.