शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विवाहीतेच्या आत्महत्या प्रकरणात पतीसह पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:28 IST

नाशिकच्या सिडको परिसरातील पाटील नगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देविवाहिता आत्महत्या प्रकरणात सासरचे अडचणीतमाहेरच्यांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

नाशिक : परिसरातील पाटील नगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  वर्षा सचिन अहिरे (२४,  रा. पाटील नगर, सिडको) या विवाहित महिलेने गुरुवारी (दि.२५) राहत्या घरी किचन मध्ये पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  या  महिलेला त्रिमूर्ती चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित करत जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. यावेळी तिच्या जवळ चिठ्ठी सापडल्याने तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. तसेच मिळालेल्या चिठीच्या आधारे मयत महिलेचा भाऊ कमलेश जाधव याने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत वर्षाच्या सासरच्या लोकांनी वर्णभेद करातनाच तुला स्वयंपाक बनवता येत नाही अशा विविध कारणांनी मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला असून  घर बांधण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी केली जात होती. या सर्व प्रकारामुळे वर्षा हिने आत्महत्या केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  पुढील तपास अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात महिलेचा घातपात झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी करत अंत्यविधीनंतर या संदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी (दि.२६) या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसWomenमहिला