शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

चिमणपाडा परिसरात उजाड रानावर फुलविले नंदनवन....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:33 IST

दिंडोरी, पेठ तालुक्याचा सीमाभाग म्हणजे पूर्वीचे घनदाट जंगल गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत सारे रान उजाड होत असताना अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करत या परिसराचे अक्षरश: नंदनवन केले आहे. वृक्षसंवर्धन होऊन पुन्हा वनसंपत्ती उभी राहून निसर्गसंपदा जोपासली जाऊ शकते हे चिमणपाड्याच्या गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

ठळक मुद्देसंत तुकाराम वनग्राम योजना अधिकारी अन् ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी जगविली वनसंपत्ती

भगवान गायकवाड ।दिंडोरी : दिंडोरी, पेठ तालुक्याचा सीमाभाग म्हणजे पूर्वीचे घनदाट जंगल गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत सारे रान उजाड होत असताना अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करत या परिसराचे अक्षरश: नंदनवन केले आहे. वृक्षसंवर्धन होऊन पुन्हा वनसंपत्ती उभी राहून निसर्गसंपदा जोपासली जाऊ शकते हे चिमणपाड्याच्या गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे कार्यरत असलेले तत्कालीन वनाधिकारी आर. डी. सुद्रीक यांच्यासह सहकारी वनपाल आर. व्ही. देवकर, विष्णू राऊत आदींनी गावोगावी जाऊन नागरिकांना वनसंवर्धनाचे फायदे सांगत वनसंवर्धन करण्यास प्रोत्साहन दिले. यासाठी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.वनपरिक्षेत्रात संत तुकाराम वनग्राम योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये वनविभाग व वनव्यवस्थापन यांच्यामार्फत समिती स्थापन करण्यात आली आहे. चिमणपाडा येथे वनसंरक्षण संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव आर. व्ही. देवकर व सदस्यांची नियुक्ती करत कामकाज सुरू केले. त्यात सरपंच, पोलीसपाटील व सर्व गावकऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले.ननाशी वनपरिक्षेत्रातील दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा (कवडासर) २५३.३५४ हेक्टर वनक्षेत्रात वनसंवर्धनाचे काम हाती घेण्यात आले. कुºहाडबंदी, चराईबंदीची बंधने घालण्यात आली. सदर क्षेत्र उत्कृष्टरीत्या सांभाळण्यासोबतच सदर समितीमार्फत सन २०११-१२ मध्ये कम्मा या योजनेंतर्गत ३० हेक्टर क्षेत्रावर रोपवन करण्यात आले.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जल व मृद संधारणाची कामे करण्यात आली. साग व विविध औषधी वृक्षांचे संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यात आले. समितीने वनसंरक्षण, संवर्धन, विकास यासाठी उत्कृष्ट काम केल्याने संत तुकाराम वन योजनेमध्ये गावाची निवड होत जिल्ह्यात अव्वल होण्याचा मान मिळवला असून, चिमणपाडा आता राज्यस्तरीय स्पर्धेत पोहचले आहे.गावकºयांनी विझवला वणवाएकेरात्री अचानक या जंगलात वणवा लागला ही बाब गावकºयांना समजताच आबालवृद्ध, महिला-पुरु षांनी जंगलाकडे धाव घेत काही वेळात वणवा विझवत वनाचे संवर्धन केले. पूरक कामातून मिळालेले एक लाख रुपयांतून गावकºयांनी सोलर बसवले. वनविभागाने प्रोत्साहन देण्यासाठी काही कामे हाती घेतली. ती ग्रामस्थांनी केली त्यातून एक लाख निधी जमा झाला. गावकºयांनी त्यातून गावात सोलर दिवे बसविले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकforestजंगलStudentविद्यार्थी