शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चिमणपाडा परिसरात उजाड रानावर फुलविले नंदनवन....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:33 IST

दिंडोरी, पेठ तालुक्याचा सीमाभाग म्हणजे पूर्वीचे घनदाट जंगल गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत सारे रान उजाड होत असताना अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करत या परिसराचे अक्षरश: नंदनवन केले आहे. वृक्षसंवर्धन होऊन पुन्हा वनसंपत्ती उभी राहून निसर्गसंपदा जोपासली जाऊ शकते हे चिमणपाड्याच्या गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

ठळक मुद्देसंत तुकाराम वनग्राम योजना अधिकारी अन् ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी जगविली वनसंपत्ती

भगवान गायकवाड ।दिंडोरी : दिंडोरी, पेठ तालुक्याचा सीमाभाग म्हणजे पूर्वीचे घनदाट जंगल गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत सारे रान उजाड होत असताना अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करत या परिसराचे अक्षरश: नंदनवन केले आहे. वृक्षसंवर्धन होऊन पुन्हा वनसंपत्ती उभी राहून निसर्गसंपदा जोपासली जाऊ शकते हे चिमणपाड्याच्या गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे कार्यरत असलेले तत्कालीन वनाधिकारी आर. डी. सुद्रीक यांच्यासह सहकारी वनपाल आर. व्ही. देवकर, विष्णू राऊत आदींनी गावोगावी जाऊन नागरिकांना वनसंवर्धनाचे फायदे सांगत वनसंवर्धन करण्यास प्रोत्साहन दिले. यासाठी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.वनपरिक्षेत्रात संत तुकाराम वनग्राम योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये वनविभाग व वनव्यवस्थापन यांच्यामार्फत समिती स्थापन करण्यात आली आहे. चिमणपाडा येथे वनसंरक्षण संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव आर. व्ही. देवकर व सदस्यांची नियुक्ती करत कामकाज सुरू केले. त्यात सरपंच, पोलीसपाटील व सर्व गावकऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले.ननाशी वनपरिक्षेत्रातील दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा (कवडासर) २५३.३५४ हेक्टर वनक्षेत्रात वनसंवर्धनाचे काम हाती घेण्यात आले. कुºहाडबंदी, चराईबंदीची बंधने घालण्यात आली. सदर क्षेत्र उत्कृष्टरीत्या सांभाळण्यासोबतच सदर समितीमार्फत सन २०११-१२ मध्ये कम्मा या योजनेंतर्गत ३० हेक्टर क्षेत्रावर रोपवन करण्यात आले.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जल व मृद संधारणाची कामे करण्यात आली. साग व विविध औषधी वृक्षांचे संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यात आले. समितीने वनसंरक्षण, संवर्धन, विकास यासाठी उत्कृष्ट काम केल्याने संत तुकाराम वन योजनेमध्ये गावाची निवड होत जिल्ह्यात अव्वल होण्याचा मान मिळवला असून, चिमणपाडा आता राज्यस्तरीय स्पर्धेत पोहचले आहे.गावकºयांनी विझवला वणवाएकेरात्री अचानक या जंगलात वणवा लागला ही बाब गावकºयांना समजताच आबालवृद्ध, महिला-पुरु षांनी जंगलाकडे धाव घेत काही वेळात वणवा विझवत वनाचे संवर्धन केले. पूरक कामातून मिळालेले एक लाख रुपयांतून गावकºयांनी सोलर बसवले. वनविभागाने प्रोत्साहन देण्यासाठी काही कामे हाती घेतली. ती ग्रामस्थांनी केली त्यातून एक लाख निधी जमा झाला. गावकºयांनी त्यातून गावात सोलर दिवे बसविले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकforestजंगलStudentविद्यार्थी