शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

शिक्षणासाठी बालकांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: October 2, 2016 22:36 IST

दुर्लक्ष : सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांची महामार्गावर कसरत

ओझर : येथील महामार्गाच्या पलीकडे असलेल्या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याची दिवसातून दोनदा कसरत करावी लागत आहे. महामार्गावरील वाहनांच्या वेगामुळे बालकांचे जीवन धोक्यात आले असून, दररोज होणाऱ्या या त्रासापासून कधी सुटका होईल, असा सवाल विचारला जात आहे.रस्त्याच्या पलीकडे असलेले सुमारे २१०० विद्यार्थी हे माधवराव बोरस्ते विद्यालय तसेच अभिनव बालविकास मंदिर व आदर्श इंग्लिश मीडियम यांचे दोन हजार विद्यार्थी तसेच नवीन इंग्रजी शाळेतले सहाशे विद्यार्थी, मराठी शाळेतले दोनशे विद्यार्थी जीव मुठीत धरून ये-जा करतात. येथील नवीन इंग्रजी शाळेजवळील असलेला भुयारी मार्ग संपूर्ण हगणदारीसाठी वापरला जात होता. मुलांना तेथून ये-जा करणे अशक्य बनले होते. आता तेथे दोन्ही बाजूस गेट बसवून पेव्हर ब्लॉकचे कामदेखील केले आहे. येथील छोट्या पुलाला कठडे नाहीत. भुयारी मार्गदेखील निरु पयोगी आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी महामार्ग ओलांडणे हाच एकमेव पर्याय आहे. या ठिकाणी दोन पोलिस कर्मचारी शाळेच्या वेळेत उपलब्ध असतात. परंतू ही रहदारी या दोघांच्या आवाक्याबाहेरची आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाहतुकीला तोंड देत विद्यार्थी शाळेत पोहोचत आहेत. अनेक वेळा येथे अपघातदेखील झाले असून, मागे अनेक दिवस या संदर्भात निवेदन देऊन झाले, मोर्चे काढण्यात आले, पत्रव्यवहार झाले, यात अनेक राजकारणीदेखील सामील झाले परंतु परिस्थिती ‘जैसे थे’च असून, शासन अजून किती अपघातांची वाट पाहत आहे, प्रशासनास कधी जाग येईल, असा सवाल येथील पालकांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)