शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

शिक्षणासाठी बालकांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: October 2, 2016 22:36 IST

दुर्लक्ष : सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांची महामार्गावर कसरत

ओझर : येथील महामार्गाच्या पलीकडे असलेल्या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याची दिवसातून दोनदा कसरत करावी लागत आहे. महामार्गावरील वाहनांच्या वेगामुळे बालकांचे जीवन धोक्यात आले असून, दररोज होणाऱ्या या त्रासापासून कधी सुटका होईल, असा सवाल विचारला जात आहे.रस्त्याच्या पलीकडे असलेले सुमारे २१०० विद्यार्थी हे माधवराव बोरस्ते विद्यालय तसेच अभिनव बालविकास मंदिर व आदर्श इंग्लिश मीडियम यांचे दोन हजार विद्यार्थी तसेच नवीन इंग्रजी शाळेतले सहाशे विद्यार्थी, मराठी शाळेतले दोनशे विद्यार्थी जीव मुठीत धरून ये-जा करतात. येथील नवीन इंग्रजी शाळेजवळील असलेला भुयारी मार्ग संपूर्ण हगणदारीसाठी वापरला जात होता. मुलांना तेथून ये-जा करणे अशक्य बनले होते. आता तेथे दोन्ही बाजूस गेट बसवून पेव्हर ब्लॉकचे कामदेखील केले आहे. येथील छोट्या पुलाला कठडे नाहीत. भुयारी मार्गदेखील निरु पयोगी आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी महामार्ग ओलांडणे हाच एकमेव पर्याय आहे. या ठिकाणी दोन पोलिस कर्मचारी शाळेच्या वेळेत उपलब्ध असतात. परंतू ही रहदारी या दोघांच्या आवाक्याबाहेरची आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाहतुकीला तोंड देत विद्यार्थी शाळेत पोहोचत आहेत. अनेक वेळा येथे अपघातदेखील झाले असून, मागे अनेक दिवस या संदर्भात निवेदन देऊन झाले, मोर्चे काढण्यात आले, पत्रव्यवहार झाले, यात अनेक राजकारणीदेखील सामील झाले परंतु परिस्थिती ‘जैसे थे’च असून, शासन अजून किती अपघातांची वाट पाहत आहे, प्रशासनास कधी जाग येईल, असा सवाल येथील पालकांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)