शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कसमादेला डाळिंबाने फसविले, कांद्याने रडविले!

By admin | Updated: April 24, 2017 01:00 IST

जिल्ह्याचे मुख्य पीक व कसमादेचे महत्त्वाचे पीक अशी ओळख असलेल्या डाळिंबावर तेल्या रोग आल्याने डाळिंबाचे फळ आता दिसेनासे झाले आहे.

 शरद नेरकर नामपूरजिल्ह्याचे मुख्य पीक व कसमादेचे महत्त्वाचे पीक अशी ओळख असलेल्या डाळिंबावर तेल्या रोग आल्याने डाळिंबाचे फळ आता दिसेनासे झाले आहे. कसमाच्या शेतकऱ्यांची संजीवनी यामुळे लोप पावली असताना, कांद्यालाही उत्पादन खर्चावर आधारित भाव न मिळाल्याने ‘डाळिंबाने फसविले, तर कांद्याने रडविले’ अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. या पट्ट्यात तेल्यानेही आता आंबा व शेवग्यावर प्रादुर्भाव केला आहे. त्यामुळे आंबा व शेवगा उत्पादक धास्तावले आहेत.पंधरा वर्षांपूर्वी कसमा पट्ट्यातला शेतकरी तसा आर्थिक दुर्बल होता! कांदा, भुईमूग, बाजरी, गहू ही महत्त्वाची पिके होती, तर ऊस हे थोडा जास्त पैसा देणारे पीक होते. त्यावेळी या भागात पाणी पातळी स्थिर होती. मात्र साधारणत: १९९८-९९ सालापासून पाणी पातळी खालावल्याने उसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकाला डावलत शेतकरी डाळिंब पिकाकडे वळले.डाळिंब हे रांगडे पीक, दगडी वजनाचे पीक, कमी श्रमाचे पीक आणि भरपूर पैसा देणारे पीक म्हणून या पिकाने मोसम पट्ट्याला दहा वर्षांत श्रीमंत बनविले. उच्च जीवनमानाचा दर्जा मिळवून दिला. डाळिंबापासून मिळणाऱ्या पैशातून बळीराजाने चांगली घरे बांधली, महागडी वाहने खरेदी केली. एका आनंदी जीवनपर्वाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. मात्र काही महिन्यात नव्हे; दिवसात तेल्याने त्यांच्या आनंदावर विरजण टाकले. मांडवावरचा डाळिंब तेल्याने खाऊन टाकला. बळीराजाच्या नव्या पर्वाचा अस्त झाला. कसमा पट्ट्यातील समृद्ध जीवन तेल्याने भकास करून टाकले. अनेक तरुण शेतकऱ्यांना या तेल्याने आत्महत्येस प्रवृत्त केले. परिणामी अनेकांनी डाळिंबाच्या बागा उपटून फेकल्या.सध्या डाळिंबांची ही अवस्था असताना त्यात मार्ग काढत काही शेतकरी तेल्यावर मात करून डाळिंब पीक घेताना दिसत आहेत. मात्र भावातील प्रचंड घसरणीमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी पुरता धास्तावला आहे. यावर्षी डाळिंबाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारितही भाव मिळाला नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. तेल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी डाळिंब बागाच उपटून टाकल्या. मोसमपट्टाच नव्हे, तर कसमादे पट्ट्यातील शेतकरी पूर्वापार कांदा पिकाचे उत्पादन घेतो. कसमादेचा कांदा म्हटला तर डोळ्यात पाणी व नाकात झणझण्या आणणारा असतो. त्यामुळे या भागातील कांद्याची ही विशेष ओळख आहे. बाहेर राज्यातूनही येथील कांद्याला विशेष मागणी असते. यंदा कांद्याचे उत्पादन भरपूर आहे. उत्पादन जरी भरपूर असले तरी भाव मात्र खूपच कमी आहेत. यंदा दुष्काळी स्थिती आहे, उत्पादन कमी राहील असा अंदाज होता. मात्र हा अंदाज चुकला. मार्केटमध्ये प्रचंड आवक आहे व भाव मात्र खूपच कमी आहे. सध्या ४५० ते ६५० एवढा कांद्याचा भाव सुरू आहे. उत्पादन खर्चावर आधारित हा भाव नाही. हा भाव अत्यल्प आहे. आज उत्पादन खर्चावर आधारित कांद्याचा भाव साधारणत: ६०० रुपये आहे. मजूर मिळत नाही; मिळालेच तर त्यांच्या मजुरीचे दर मोठ्या प्रमाणावर आहेत. शेतातील पिकांना खते देणे आवश्यक असते. मात्र ही खते आज वाढलेल्या किमतीमुळे न परवडणारी झाली आहेत. कांदा पीक असे आहे की त्याला घट मोठ्या प्रमाणावर आहे. कांदा चाळीत टाकल्यापासून तर चाळीच्या बाहेर काढण्यापर्यंत ३० टक्के घट येते. म्हणून हमखास उत्पादनाचे मुख्य पीक कांदा हे आता शेतकऱ्यांना परवडत नाही. म्हणून आता शासनानेच कांद्याला १५०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी केली जात आहे.कांदा पिकाला मिळणाऱ्या कमी भावामुळे हे पीक घेणे शेतकऱ्याला परवडत नाही. कांद्याचा उत्पादन खर्च जर ५०० ते ६०० रुपये असेल आणि भाव जर ४०० रुपये मिळत असेल तर शेतकऱ्याला हे पीक परवडेल तरी कसे? उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. कर्जाचा डोंगर सतत वाढत राहतो व यात भविष्य धूसर होत असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्येस सामोरे जावे लागते. यामुळे सर्व कुटुंबच उद्ध्वस्त होते. कृषिप्रधान देशातल्या बळीराजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाच्या पिकांना हमीभाव देणे आवश्यक असल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.