शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांमधून वाहते दूषित रासायनिक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:51 IST

कुठे थेट नाल्यात सोडलेले सांडपाणी, तर कुठे घातक रसायनांचे वाहते पाणी बघितल्यानंतर गोदावरी प्रदूषण रोखणार कसे? असा प्रश्न उच्चाधिकार समितीच्या सदस्यांना पडला. नाशिकच्या उपनद्यांमध्ये प्रदूषण होत नाही असे म्हणणाऱ्या आणि प्रसंगी एकमेकांवर जबाबदारी लोटणाऱ्या महापालिका आणि एमआयडीसीचे पितळ उघडे पडले.

ठळक मुद्देगोदापात्र शुद्धीकरणासाठी पाहणी महापालिका, एमआयडीसीचे पितळ उघडे

नाशिक : कुठे थेट नाल्यात सोडलेले सांडपाणी, तर कुठे घातक रसायनांचे वाहते पाणी बघितल्यानंतर गोदावरीप्रदूषण रोखणार कसे? असा प्रश्न उच्चाधिकार समितीच्या सदस्यांना पडला. नाशिकच्या उपनद्यांमध्ये प्रदूषण होत नाही असे म्हणणाऱ्या आणि प्रसंगी एकमेकांवर जबाबदारी लोटणाऱ्या महापालिका आणि एमआयडीसीचे पितळ उघडे पडले.गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी निरी या संस्थेने केलेल्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी समितीवर आहे. त्या पार्श्वभूमीवर समितीने पूर्व नियोजनानुसार सोमवारी (दि. ११) औद्योगिक क्षेत्रातील कारखाने आणि नाल्यांची तपासणी केली असता सांडपाण्याच्या निचºयाचा पत्ताच नाही आणि रासायनिक पाणी नाल्यांमधून सर्रास वाहून उपनद्या किंवा महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जात असल्याचे आढळले. मुळातच अशा पाण्यावर संबंधित कारखान्यांनी प्रक्रिया करणे गरजेचे आहे, परंतु ते होत नसल्याचे समिती सदस्यांना आढळले.नीलव मेटल्सकडून केली जाणारी प्रक्रिया असमाधानकारक असल्याचे निरीच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले, तर सदगुरू नगर येथील नाल्यात चक्क काळे पाणी आढळले. हे पाणी रासायनिक असावे, असा संशय असून त्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अंबड येथील आर्मस्ट्रॉँगच्या नंदिनी नदीस मिसळणारा नाला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात पिवळे पाणी मिसळले जाते. या रासायनिक सांडपाण्याचेदेखील नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्वरित सदरचे पाणी सोडणाºया कारखान्यावर कारवाई करावी, असे उपसमितीने निदर्शनास आणले. याच नाल्यात महापालिकेच्या चेंबरमधून पाणी ओव्हर फ्लो होत असल्याचे आढळल्याने महापालिकेचेही पितळ उघडे पडले. महापालिकेने ते २४ तासांत दुरुस्त करण्याचे मान्य केले. महापालिकेने यापूर्वी आयटीआय पुलाजवळ पुराच्या पाइपातून वाहणारे पाणी थांबवले असले तरी प्रवाह कायम असल्याचे आढळले. महापालिकेने त्वरित त्यावर उपाययोजना करावी, असे ठरविण्यात आले.पाहणी करणाºया समितीत निरीच्या प्रतिनिधी श्रीमती कोमल कलवापुडी, कृतिका दळवी, महापालिकेचे उपअभियंता नितीन पाटील, अभियंता सुरेश वाणी, एमआयडीसीच्या सहायक अभियंते मोनाली भुसारे, याचिकाकर्ता राजेश पंडित व निशिकांत पगारे सदस्य सचिव ए. एम. कारे आदीउपस्थित होते.एमआयडीसी क्षेत्रात सांडपाण्यासाठी गटारच नसल्याने त्याबाबत महापालिका आणि एमआयडीसी यांच्यात जबाबदारीची टोलवाटोलवी सुरू आहे. महापालिका ही क्षेत्र एमआयडीसीवर तर करवसुली महापालिका करीत असल्याने एमआयडीसी ही जबाबदारी आपली नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे उभय यंत्रणांनी हा प्रश्न आपसात सोडावावा, असा सल्ला उपसमितीने दिला.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीpollutionप्रदूषण