शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

वसाका करारात सभासदांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:43 AM

राज्य सहकारी बँक व धाराशिव कारखाना यांच्या त्रिपक्षीय करारदरम्यान वसाका ऊस उत्पादक, कामगार व इतर देणी यांच्या संदर्भात करारात कोणतेही प्रायोजन नाही, करार संपल्यानंतर २५ वर्षांनी इतर देण्यांचा विचार होणार असल्याने करार करून ऊस उत्पादक सभासद व कामगारांची फसवणूक थांबवावी यासाठी एकत्र यावे, असे आवाहन वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांनी कळवण येथे पत्रकार परिषदेत ऊस उत्पादक व सभासद बांधवांना केले आहे.

कळवण : राज्य सहकारी बँक व धाराशिव कारखाना यांच्या त्रिपक्षीय करारदरम्यान वसाका ऊस उत्पादक, कामगार व इतर देणी यांच्या संदर्भात करारात कोणतेही प्रायोजन नाही, करार संपल्यानंतर २५ वर्षांनी इतर देण्यांचा विचार होणार असल्याने करार करून ऊस उत्पादक सभासद व कामगारांची फसवणूक थांबवावी यासाठी एकत्र यावे, असे आवाहन वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांनी कळवण येथे पत्रकार परिषदेत ऊस उत्पादक व सभासद बांधवांना केले आहे.  कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड कार्यक्षेत्र व अर्थकारण असलेल्या विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना खासगी उद्योगास २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यामागे राज्य सहकारी र्बंक व प्राधिकृत मंडळ यांचे छुपे कट-कारस्थान व षड्यंत्र असून, करारनाम्यातील गृहीतांनुसार हिशेब केला तर हा कार्यकाळ किमान ३०० वर्षांचा होणार असल्याचे देवरे यांनी म्हटले आहे.  सदर करारानुसार केवळ एक कोटी रु पये प्राथमिक खर्च करून सुमारे २५ वर्ष भाडे करार दाखविण्यात येणार आहे. ३५ हजार लिटर्स क्षमतेचा आसवनी व १७ मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी प्रतिटन ३०० रु पये दर अपेक्षित असताना केवळ ७५ रु पये टन या दराने हे प्रकल्प घश्यात घालण्यात येत आहेत. प्रतिवर्षी केवळ एक कोटी रु पये कर्जात जमा करण्याच्या धोरणामुळे २६५ कोटींची परतफेड करण्यासाठी किमान ३०० वर्षे लागणार असल्याचे वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.  ऊस उत्पादक कामगार व इतर देणी यांचा सदर करार दरम्यान कोणतेही प्रयोजन नाही, करार सरतेवेळी २५ वर्षांनी इतर देण्यांच्या विचार होणार असल्याने ही ऊस उत्पादक सभासद व कामगारांची फसवणूक होणार आहे. वसाका कारखान्याचे आद्य संस्थापक कर्मवीर ग्यानदेवदादा देवरे , माजी अध्यक्ष कै. डॉ. दौलतराव अहेर यांच्या ऊस उत्पादक सभासद व कामगार हिताला प्राधान्य देण्याचे धोरण प्राधिकृत मंडळाचे नियुक्त अध्यक्ष व मंडळ पायदळी तुडवीत सुलतानी पद्धतीने विनामोबदला कारखाना गिळंकृत करीत असल्याने सभासदांनी जागरूकपणे हा डाव उधळून लावावा, असे आवाहन सुनील देवरे यांनी यावेळी केले.  सन २००७ ते २०१६ च्या कार्यकाळात किमान १५० कोटींहून अधिक रकमेची अनियमितता आहे. सदर प्रश्न गंभीर असताना नवीन करारातून ३०० कोटींची शेतकरी मालमत्ता गिळंकृत होत असेल तर करार करणे थांबवा अन्यथा न्यायालयात धाव घेण्याचा इशारा यावेळी देवरे यांनी दिला आहे.  कळवण येथे वसाकासंदर्भात पत्रकार परिषदेत देवरे यांनी सांगितले की, या प्रश्नी राज्य सहकारी बँकेने व वसाका प्राधिकृत मंडळाने खासगी उद्योगाशी करारासंदर्भात वसाका ऊस उत्पादक सभासदांना स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी वसाका बचाव परिषदेने राज्य सहकारी बँकेच्या कार्यकारी मंडळ व वसाका प्राधिकृत मंडळाकडे केली आहे, त्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. वसाका कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी राज्य सहकारी बँकेने अतिशय गुप्तपणे मागवलेली धाराशीव कारखान्याची निविदा बँकेच्या दि. २३ आॅगस्ट २०१८ च्या सभेत विषय क्र . १८ नुसार मान्य करण्यात आली असून, त्रिपक्षीय करार करण्याचे सूचित केले आहे.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेbankबँक