शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

प्रभारी तरीही फुल अधिकारी

By admin | Updated: January 10, 2017 01:24 IST

प्रशासकीय उदासीनता : विद्यापीठाचा कारभार तात्पुरत्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन

संदीप भालेराव नाशिकआरोग्य विज्ञान विद्यापीठातील महत्त्वाची पदे गेल्या काही वर्षांपासून प्रभारीच असून, संपूर्ण विद्यापीठाचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावरच सुरू आहे. विशेष म्हणजे प्रभारी पदांचे अधिकार मर्यादित असतानाही येथे मात्र प्रभारी अधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार बहाल करण्यात आले आहेत. कुलगुरू सोडले तर इतर महत्त्वाची पदे प्रभारी आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठातील मनुष्यबळ आणि येथील कामाचा ताण यामुळे विद्यापीठाच्या विभाजनासारखा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाही विद्यापीठाने यातून कोणताच धडा घेतला नसल्याचे दिसते. विद्यापीठाचा कारभार हा फंडातील कर्मचारी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांवरच सुरू असल्याचे खुद्द येथील अधिकारीच सांगत असताना महत्त्वाची पदेदेखील भरली जात नाही. प्रभारी अधिकाऱ्यांवरच कारभार करण्यास येथील प्रशासनाला रस असल्याचे दिसते. विद्यापीठात सध्या कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी, विद्यार्थी कल्याण विभाग, क्रीडा संचालक, यूजी फॅकल्टी ही सारी पदे प्रभारी अधिकारीच सांभाळत आहेत. परीक्षा नियंत्रकांकडे कुलसचिवपदाचा ‘महत्त्वाचा’ कारभार असल्याने परीक्षा विभागाचा कारभार त्या विभागातील सहायक कुलसचिव दर्जाचे अधिकारी पाहत आहेत. त्यामुळे परीक्षा नियंत्रक पदाचा कारभारही त्रयस्थ व्यक्तीच पाहत असल्याचे चित्र आहे. वित्त व लेखा अधिकाऱ्याचे पद हे तर पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रभारीच आहे. सक्षम उमेदवार मिळत नसल्याने सदर पद हे प्रभारी ठेवण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या पदासाठी जाहिरातच काढण्यात आलेली नाही. वास्तविक विद्यापीठ नियमाप्रमाणे कोणतेही पद हे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रभारी ठेवता येत नाही. असे असतानाही विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोरदेखील भरतीच्या जाहिरातीचा विषय काढण्यात आलेला नाही. याचाच अर्थ विद्यापीठाला सदर पदे ही प्रभारीच ठेवण्यात रस आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. गेल्या सात महिन्यांपासून कुलसचिवपदावर प्रभारी अधिकारी काम करीत आहेत, तर वित्त अधिकारीही प्रभारी असल्याने आर्थिक विषयांशी संबंधित महत्त्वाची कामे ही दोन्ही प्रभारी अधिकारी पाहत आहेत. पदांच्या बाबतीत शासनाशी लढा देऊन विद्यापीठासाठी पदे मंजूर करून आणल्याचे श्रेय कुलगुरूंसह कुलसचिव घेत आहेत. मात्र पदे भरण्याची तत्परता दाखविली जात नाही. शासन याबाबत नियमावली तयार करीत असून, शासनाकडूनच विलंब होत असल्याचे विद्यापीठाकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण विभागाकडूनच पदे भरण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे स्मरणपत्र विद्यापीठाला देण्यात आल्याचे समजते. वैद्यकीय शिक्षण विभागाने ९ जून २०१६ रोजी ८३ पदे भरण्यास मंजुरी दिलेली आहे. मात्र दहा गेल्या सात महिन्यांपासून विद्यापीठाने पदे भरण्यासाठीची जाहिरातच दिलेली नाही. (क्रमश:)