शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

भीड चेपली !

By किरण अग्रवाल | Published: January 06, 2019 1:38 AM

कौटुंबिक वादातून नाते-संबंधात होणारे किंवा व्यवसायादिकारणातून मित्रांमध्ये घडून येणारे वाद व हल्ले अलीकडे वाढले आहेतच; परंतु सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्यांवर आणि अगदी पोलिसांवरही हात टाकण्याचे प्रकार वरचेवर घडून येत असल्याने यंत्रणांचा धाक ओसरत चालल्याचे स्पष्ट व्हावे.

ठळक मुद्देपोलिसांवरही हात टाकण्याचे प्रकार वरचेवर घडून येत असल्याने यंत्रणांचा धाक ओसरत आहेसामान्य नागरिकास कायद्याचा हिसका दाखवून जेरीस आणणारी यंत्रणा स्वत:वरील हल्ल्यांबाबत स्वस्थ का असते, असा प्रश्न उपस्थित होतो.

कौटुंबिक वादातून नाते-संबंधात होणारे किंवा व्यवसायादिकारणातून मित्रांमध्ये घडून येणारे वाद व हल्ले अलीकडे वाढले आहेतच; परंतु सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्यांवर आणि अगदी पोलिसांवरही हात टाकण्याचे प्रकार वरचेवर घडून येत असल्याने यंत्रणांचा धाक ओसरत चालल्याचे स्पष्ट व्हावे.मनमाड येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीचा पाठलाग करून त्यास जेरबंद करू पाहणाºया एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह त्यांच्या सहकारी पोलिसावर संबंधिताने कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे, तर नाशकात अतिक्रमण हटाव पथकात सेवा बजावत असताना वडाळा नाका परिसरात तीन पोलिसांना धक्काबुक्की व मारहाण केली गेली आहे. या अगदी काल-परवातील दोन घटनांचा उल्लेख येथे केला असला तरी, यापूर्वीच्या अशा घटनांची बेरीज थोडी थोडकी नाही. नाशकात गेल्या सहा महिन्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या दोन डझन एवढ्या घटना नोंदविल्या गेल्या आहेत. ग्रामीण भागात व विशेषत: मालेगावच्या गिरणा काठी अवैध वाळू उपसा करणारे लोक महसुली कर्मचाºयांच्या अंगावर सरळ सरळ गाड्या घालत असल्याचे प्रकार नेहमीच घडत असतात, तसे नाशकात वाहतूक नियंत्रित करणाºया पोलिसाला कानशिलात लगावून अनेकदा बेशिस्त रिक्षाचालक बेगुमानपणे पसार होत असतात. कायदा हातात घेण्याबद्दलची भीतीच उरली नसल्याने हे प्रकार वाढत आहेत. एरव्ही सामान्य नागरिकास कायद्याचा हिसका दाखवून जेरीस आणणारी यंत्रणा अशी स्वत:वरील हल्ल्यांबाबत स्वस्थ का असते, असा प्रश्न यातून उपस्थित व्हावा. यंत्रणेचा धाक ओसरल्याचे तर यातून दिसून येतेच; पण महत्त्वाचे म्हणजे तीत काम करणाºया नोकरदारांच्या मनोधैर्यावरही त्याचा परिणाम झाल्याखेरीज राहात नाही. तेव्हा सार्वजनिक स्वरूपात दहशत निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारे नाशिकरोडच्या नेहरूनगरमधील वाहने पेटवून देण्याचे प्रकार असोत, की सरकारी यंत्रणेत कर्तव्य बजावणाºयांवर हात उगारण्याचे; त्याबद्दल संबंधिताना हिसका दाखवणेच आवश्यक आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर ते अधिकच तातडीचे ठरावे.