शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

आघाडीच्या काही मतदारसंघांत बदल शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:52 IST

काँग्रेस व राष्टवादी राज्यात प्रत्येकी सव्वाशे जागा लढविणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. आघाडीच्या या जागावाटपात राज्यातील पाच ते  दहा विधानसभा मतदारसंघांत  बदल केले जातील. त्याबाबतचा निर्णय दोन्ही कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष घेतील,

नाशिक : काँग्रेस व राष्टवादी राज्यात प्रत्येकी सव्वाशे जागा लढविणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. आघाडीच्या या जागावाटपात राज्यातील पाच ते  दहा विधानसभा मतदारसंघांत  बदल केले जातील. त्याबाबतचा निर्णय दोन्ही कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष घेतील, असे सांगून राष्ट वादीचे अध्यक्ष शरद  पवार यांनी, आघाडीत महाराष्ट नवनिर्माण सेनेचा सहभाग राहणार नसल्याचे स्पष्ट केले. आगामी  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे सोमवारी नाशकात आगमन झाले.विधानसभानिहाय पक्ष पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक येथे भेट झाल्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करेल, असा अंदाज आहे. त्यानंतर साधारणत: २५ ते ३० दिवसांच्या आत व दिवाळीपूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम आटोपलेला असेल असे सांगून ही निवडणूक दोन्ही कॉँग्रेस व मित्रपक्षांनी एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जागांचे वाटपही करण्यात आले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, पाच ते दहा मतदारसंघात बदल होतील व त्याबाबतचा निर्णय प्रदेशपातळीवर घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. काही मतदारसंघांमध्ये दोन्ही काँग्रेसचे एकत्रित कॅम्पेनिंग करण्याबाबत नियोजन सुरू असून, प्रत्येक विभागाच्या मुख्यालयात संयुक्त सभा घेण्याचा प्रयत्न आहे. येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीचा जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात येणार असून, राष्टÑवादी कॉँग्रेसने या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देऊन तरुण पिढीचे नेतृत्व उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही पवार यांनी दिली.सध्याच्या पक्षांतराबाबत बोलताना पवार म्हणाले, जे आमचा पक्ष सोडून तिकडे गेले त्यांना उमेदवारी द्यायची की नाही हा त्या त्या पक्षाचा अधिकार असून, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आमच्याही काही लोकांनी सत्तेच्या ओढीने पक्षांतर केले. विरोधी पक्षात राहण्याची त्यांची मानसिकता नसल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. आपण मात्र संसदीय कारकिर्दीच्या ५२ वर्षांपैकी २७ वर्षे विरोधी पक्षात होतो असे सांगून पवार यांनी, विरोधी पक्षात असलो की समाधान मिळते कारण सत्तेत असल्यावर आपण काय निर्णय घेतले व त्याची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे कळत नाही. विरोधी पक्षात असल्यावर कोणतीही जबाबदारी नसते. उलट विरोधी पक्षात असताना लोकांच्या संपर्कात राहून सरकार विषयीची वस्तूस्थिती समजत असते, अशी पुष्टीही जोडली.त्याचबरोबर भाजप-सेनेत सुरू असलेल्या बेबनावामुळे युती तुटणार काय? या प्रश्नावर बोलताना पवार यांनी, केंद्रात व राज्यात सत्तेची ऊब दोन्ही पक्षांना मिळाली असून, सत्तेची ऊब कोणी सहजासहजी सोडत नाही. या उपरही युती ठेवायची की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे सांगितले. वंचित आघाडीमुळे राज्यातील आठ मतदारसंघात परिणाम झाला आहे. परंतु आता वंचित आघाडीने त्यांची भूमिका जाहीर केल्यामुळे त्यांना कॉँग्रेस आघाडीत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे पवार यांनी सांगितले.लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे असून, लोकसभेला देशाचे नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचे, असा मतदार विचार करतो तर विधानसभेला मतदाराला त्याचे मतदारसंघातील प्रश्न, दैनंदिन समस्या लक्षात घेऊन कोण सक्षम उमेदवार त्यावर आपले मत तयार करीत असतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उद्योग-धंद्यांची मंदी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कांदा आयात आदी प्रश्नांवर लढविली जाणार असून, नोटबंदीचे परिणाम आता दिसू लागले असल्याचेही पवार यांनी सांगितले.ईडीच्या नोटिसांद्वारे राष्टवादी नेत्यांना धमकीईडीची नोटीस दाखवून माझ्या सहकाऱ्यांना धमकावण्यात आले. मी नावं उघड करणार नाही मात्र आमच्यातून गेलेल्या काहीजणांनी हे सांगितलं, असा दावा शरद पवार यांनी केला. उदयनराजेंच्या आरोपांवर काहीही बोलायचे नाही. त्यांना १५ वर्षांनंतर हे आरोप सुचले का?, इतकाच माझा प्रश्न आहे, असा टोलाही पवारांनी लगावला.आघाडीत मनसे नाहीच्ईव्हीएमच्या विरोधात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची राज ठाकरे यांची भूमिका मान्य नसून, मित्रपक्षांनीदेखील मनसेला सोबत घेण्यात सकारात्मकता दर्शविलेली नाही, त्यामुळे मनसेचा आघाडीत समावेश राहणार नाही, असेहीपवार यांनी सांगितले.जनतेला मेगाभरती पसंत नाहीच्१९६२ मध्ये निवडणूक झाल्यावर यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सत्तेत आली. त्यावेळी वर्ष, सहा महिन्यात जे संयुक्त महाराष्ट चळवळीतून निवडून आले होते अशा सर्वांनी पक्षांतर केले. त्यामुळे यापूर्वीही मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. परंतु सध्याचा पक्षांतराचा वेग त्यापेक्षा गतिमान असून, लोक शहाणे असतात. त्यांना ही ‘मेगा’भरती पसंत आहे असे वाटत नाही, असेही पवार म्हणाले.राजेंना समज यायला पंधरा वर्षे गेलीच्उदयनराजे भोसले यांनी पंधरा वर्षे राष्टवादीत वाया गेल्याची टीका केल्याच्या प्रश्नावर पवार यांनी, राष्ट्रवादीत अन्याय झाल्याचे समज यायला राजेंना पंधरा वर्षे लागली, अशी टिप्पणी पवार यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक