शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भेसळप्रश्नी जन्मठेपेसाठी कायद्यात बदल : बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 1:46 AM

भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात काही राज्यांनी कायद्यात दुरुस्ती सुचवून थेट जन्मठेपेची तरतूद केली आहे. महाराष्टÑात भेसळमुक्त करण्यासाठी लवकरच कायद्यात बदल करून त्याला राष्टÑपतींची मंजुरी घेण्यात येणार असून, त्यावर शिक्कामोर्तब झाल्यास राज्यातही भेसळ करणाºयांच्या विरोधात मोक्का, एमपीडीए कायद्यांन्वये कारवाई करता येणार असल्याचे सांगून, अशाप्रकारे गुटख्याला प्रतिबंध करण्यासाठी कलम ३२८ मध्ये बदल सुचविण्यात येणार असून, गुटखा विक्री, साठवणूक या संदर्भात किमान तीन वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.

नाशिक : भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात काही राज्यांनी कायद्यात दुरुस्ती सुचवून थेट जन्मठेपेची तरतूद केली आहे. महाराष्टÑात भेसळमुक्त करण्यासाठी लवकरच कायद्यात बदल करून त्याला राष्टÑपतींची मंजुरी घेण्यात येणार असून, त्यावर शिक्कामोर्तब झाल्यास राज्यातही भेसळ करणाºयांच्या विरोधात मोक्का, एमपीडीए कायद्यांन्वये कारवाई करता येणार असल्याचे सांगून, अशाप्रकारे गुटख्याला प्रतिबंध करण्यासाठी कलम ३२८ मध्ये बदल सुचविण्यात येणार असून, गुटखा विक्री, साठवणूक या संदर्भात किमान तीन वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. नागरी पुरवठा मंत्रालयाशी संबंधित प्रकरणांची सुनावणी व अधिकाºयांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बापट यांनी गेल्या दोन वर्षांत चार हजार प्रकरणांची जिल्हा पातळीवर सुनावण्या घेऊन निपटारा केल्याचे सांगितले. राज्यातील ९८ टक्के रेशन दुकानांमध्ये पॉस यंत्राच्या सहाय्याने धान्य वाटप केले जात असून, प्रत्येक दुकान, व्यक्तीला किती धान्य दिले याची सारी माहिती आपल्याकडे आॅनलाइन पोहोचत आहे. त्यामाुळे संपूर्ण राज्यात दहा लाख बोगस शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या, तर ३८५ मेट्रिक टन धान्याची बचत होऊ शकली आहे. घासलेटबाबतही असाच निर्णय घेण्यात आल्यामुळे राज्यातील घासलेटचा कोटा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. राज्यातील ९३ टक्के शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक सिडिंग करण्यात आले आहे तसेच धान्याच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आगामी काळात धान्य वाहतूक करणाºया वाहनांवर, गुदामांवर शंभर टक्के जीपीएस लवकरच लावण्यात येणार असल्याचे सांगितले. गुटखा बंदीबाबत भादवि कलम ३२८ अन्वये कारवाई केली जात असल्यामुळे अटक केल्यानंतर लगेचच आरोपींना जामीन मिळतो त्यामुळे गुटखा विक्रीवर प्रभावी कारवाई करता येत नाही. या संदर्भातील कायद्यातच दुरुस्ती करून किमान तीन वर्षे शिक्षा होईल अशी तरतूद करण्यात येणार असल्याचेही बापट यांनी सांगितले.दिवाळीसाठी साखर देणारकेंद्र सरकारने साखर देणे बंद केले असले तरी, यंदा दिवाळी सणात सर्वसामान्यांना गोडधोड करून खाता यावे यासाठी रेशनमधून प्रत्येक कार्डधारकाला एक किलो साखर देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला १८ कोटी रुपये अतिरिक्तखर्च करावा लागेल. उपसमितीने या संदर्भात निर्णय घेतला असून, लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात येईल, असेही गिरीश बापट यांनी सांगितले.

टॅग्स :foodअन्नgirish bapatगिरीष बापट