शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

राज्यातील ग्रामपंचायतींच्या मिळकत करातील उत्पन्नावर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 15:06 IST

नाशिक- ग्रामीण भागातील ग्राम पंचायतींना आपल्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीमुळे मिळणाऱ्या पन्नास टक्के उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. ग्राम पंचायत क्षेत्रात औद्योगिक वसाहती असल्यास तेथील कारखाने आणि मिळकतींची वसुली थेट आता एमआयडीसीकडून करण्यात येणार असून त्यापोटी त्यांना ५० टक्के रक्कम देण्याची तरतूद शासनाने नव्या शासन निर्णयात केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामंपचायतींना आर्थिक फटका बसणार आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाचा नवा निर्णयएमआयडीसी वसुली करणार५० टक्के उत्पन्नातील वाटा एमआयडीसीला

नाशिक- ग्रामीण भागातील ग्राम पंचायतींना आपल्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीमुळे मिळणाऱ्या पन्नास टक्के उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. ग्राम पंचायत क्षेत्रात औद्योगिक वसाहती असल्यास तेथील कारखाने आणि मिळकतींची वसुली थेट आता एमआयडीसीकडूनकरण्यात येणार असून त्यापोटी त्यांना ५० टक्के रक्कम देण्याची तरतूद शासनाने नव्या शासन निर्णयात केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामंपचायतींना आर्थिक फटका बसणार आहे.

      नाशिक जिल्ह्यात ओझर, जानोरी, नागापूर, पिंपळगाव बसवंत, विंचुर, लासलगाव, सायने यासह अनेक ग्राम पंचायत हद्दीत अनेक एमआयडीसीच्या माध्यमातून कारखाने उभारण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रातील मिळकत करांमुळे बºयाच ग्राम पंचायती सधन आहेत. मात्र आता ग्राम पंचायत क्षेत्रातच औद्योगिक क्षेत्र असेल तर तेथील सामान्य आरोग्य रक्षण उपकर (स्वच्छता कर), दिवाबत्ती कर यासह मालमत्ता कराची वसुली या ग्राम पंचायतींकडून होणार नाही तर राज्य शासनाच्या महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील मिळकतींकडून करांची वसुली ही महामंडळ म्हणजेच एमआयडीसीच करणार आहे. महामंडळाने वसुल केलेल्या कराच्या एकुण रकमेपैकी ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीने स्वत:च्या ताब्यात ठेवून उर्वरीत ५० टक्के रक्कम ग्राम पंचायतीस अदा करावीत असे स्पष्ट आदेशच शासनाने १३ सप्टेंबर रोजी दिले आहेत. त्यासाठी ग्राम पंचायतीने आपला खाते क्रमांक संबंधीत गट विकास अधिकारी पंचायत समितीकडून प्रमाणित करून महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाला कळावयचे आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत मागील महिन्यात वसुल झालेल्या कराच्या एकुण रकमेपैकी ५० टक्के रक्कम महामंडळाने ग्राम पंंचायतीच्या खात्यात हस्तांतरीत करण्ण्याचे निर्णयात नमुद करण्यात आले आहे.

सदरची वसुली करण्यासाठी महामंडळाने स्वत:च्या साधन पर्यायांचा वापर करून ही वसुली करून द्यायची आहे. परंतु त्याच बरोबर औद्योगिक क्षेत्रात रस्ते, दिवा बत्ती, कचरा, घन कचरा व्यवस्थापन, गटारी, पाणी पुरवठा, अग्निशमन सेवा या सेवा ग्राम पंचायतीला पुरवण्याची जबाबदारी महामंडळावर सोपवण्यात आली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकMIDCएमआयडीसीgram panchayatग्राम पंचायतTaxकर