शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

राज्यातील ग्रामपंचायतींच्या मिळकत करातील उत्पन्नावर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 15:06 IST

नाशिक- ग्रामीण भागातील ग्राम पंचायतींना आपल्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीमुळे मिळणाऱ्या पन्नास टक्के उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. ग्राम पंचायत क्षेत्रात औद्योगिक वसाहती असल्यास तेथील कारखाने आणि मिळकतींची वसुली थेट आता एमआयडीसीकडून करण्यात येणार असून त्यापोटी त्यांना ५० टक्के रक्कम देण्याची तरतूद शासनाने नव्या शासन निर्णयात केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामंपचायतींना आर्थिक फटका बसणार आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाचा नवा निर्णयएमआयडीसी वसुली करणार५० टक्के उत्पन्नातील वाटा एमआयडीसीला

नाशिक- ग्रामीण भागातील ग्राम पंचायतींना आपल्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीमुळे मिळणाऱ्या पन्नास टक्के उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. ग्राम पंचायत क्षेत्रात औद्योगिक वसाहती असल्यास तेथील कारखाने आणि मिळकतींची वसुली थेट आता एमआयडीसीकडूनकरण्यात येणार असून त्यापोटी त्यांना ५० टक्के रक्कम देण्याची तरतूद शासनाने नव्या शासन निर्णयात केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामंपचायतींना आर्थिक फटका बसणार आहे.

      नाशिक जिल्ह्यात ओझर, जानोरी, नागापूर, पिंपळगाव बसवंत, विंचुर, लासलगाव, सायने यासह अनेक ग्राम पंचायत हद्दीत अनेक एमआयडीसीच्या माध्यमातून कारखाने उभारण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रातील मिळकत करांमुळे बºयाच ग्राम पंचायती सधन आहेत. मात्र आता ग्राम पंचायत क्षेत्रातच औद्योगिक क्षेत्र असेल तर तेथील सामान्य आरोग्य रक्षण उपकर (स्वच्छता कर), दिवाबत्ती कर यासह मालमत्ता कराची वसुली या ग्राम पंचायतींकडून होणार नाही तर राज्य शासनाच्या महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील मिळकतींकडून करांची वसुली ही महामंडळ म्हणजेच एमआयडीसीच करणार आहे. महामंडळाने वसुल केलेल्या कराच्या एकुण रकमेपैकी ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीने स्वत:च्या ताब्यात ठेवून उर्वरीत ५० टक्के रक्कम ग्राम पंचायतीस अदा करावीत असे स्पष्ट आदेशच शासनाने १३ सप्टेंबर रोजी दिले आहेत. त्यासाठी ग्राम पंचायतीने आपला खाते क्रमांक संबंधीत गट विकास अधिकारी पंचायत समितीकडून प्रमाणित करून महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाला कळावयचे आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत मागील महिन्यात वसुल झालेल्या कराच्या एकुण रकमेपैकी ५० टक्के रक्कम महामंडळाने ग्राम पंंचायतीच्या खात्यात हस्तांतरीत करण्ण्याचे निर्णयात नमुद करण्यात आले आहे.

सदरची वसुली करण्यासाठी महामंडळाने स्वत:च्या साधन पर्यायांचा वापर करून ही वसुली करून द्यायची आहे. परंतु त्याच बरोबर औद्योगिक क्षेत्रात रस्ते, दिवा बत्ती, कचरा, घन कचरा व्यवस्थापन, गटारी, पाणी पुरवठा, अग्निशमन सेवा या सेवा ग्राम पंचायतीला पुरवण्याची जबाबदारी महामंडळावर सोपवण्यात आली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकMIDCएमआयडीसीgram panchayatग्राम पंचायतTaxकर