चांदवडला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी
By Admin | Updated: June 25, 2014 00:09 IST2014-06-24T21:11:37+5:302014-06-25T00:09:41+5:30
चांदवडला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी

चांदवडला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी
चांदवड : चांदवडला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी शिवसंग्राम युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार अहेर यांनी पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका कायम दुष्काळी तालुका आहे. पाण्यावाचून शेती उद्योग मोडकळीस आला आहे. तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे. परंतु बेरोजगारीमुळे तरुणाई हतबल झाली आहे. तालुक्यात उद्योगाचे एकही मोठे साधन नाही. त्यामुळे बेकारी वाढली आहे. चांदवड तालुक्याला ऐतिहासिक वारसा असून, पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांच्या वास्तवाने हा तालुका पुनित झाला आहे. चांदवड शहरातील रंगमहाल ही पुरातन वास्तू आजही मोठ्या दिमाखाने इतिहासाची साक्ष देत आहे. राहुड घाटात असलेले रेणुका मंदिर हे आराध्य दैवत आहे. जैन समाजाची श्री नेमिनाथ जैन संस्था चांदवडच्या वैभवातील शिरपेचाचा तुरा आहे.
मुंबई-आग्रा महामार्ग चांदवडला छेदून गेला आहे. जवळच मनमाड रेल्वे जंक्शन आहे. यामुळे पर्यटकांना पोहचणे सहज शक्य आहे . तरी चांदवडला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी उदय अहेर यांनी ेकेली आहे. (वार्ताहर)