शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

अवकाश संशोधन कार्यासाठी ‘चांद्रयान-२’ मोहीम उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:32 IST

चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लॅँडर या उपग्रहाचा इस्त्रो संस्थेशी पुरेसा संपर्क होऊ शकला नाही, तरीही या उपग्रहाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या उपग्रहावरून विविध छायाचित्रेदेखील आतापर्यंत मिळाली असून, त्याचा वेगवेगळ्या संशोधन कार्यासाठी उपयोग होऊ शकतो.

चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लॅँडर या उपग्रहाचा इस्त्रो संस्थेशी पुरेसा संपर्क होऊ शकला नाही, तरीही या उपग्रहाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या उपग्रहावरून विविध छायाचित्रेदेखील आतापर्यंत मिळाली असून, त्याचा वेगवेगळ्या संशोधन कार्यासाठी उपयोग होऊ शकतो. विशेषत: या उपग्रहावर लावलेल्या कॅमेऱ्याने हवी तशी छायाचित्रे पाठविण्यास विक्रम लॅण्डर आॅरफीट यशस्वी झालेले दिसते. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर उपग्रम मोहीम आखणारा भारत हा जगातील पहिलाच देश असून, या ठिकाणी असलेली माती, खडक, हवामान यांचा अभ्यास यातून होणार आहे. इस्त्रोची ही मोहीम सुमारे ९0 टक्के यशस्वी झाली, असे मत जगभरातील शास्त्राज्ञांनी व्यक्त केले आहे. विक्रम लॅँडर या उपग्रहाचे कार्य आणखी सुमारे सात वर्ष सुरू राहणार असून, त्याचा कार्य कालावधी वाढविण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. या मोहिमेतून संशोधनासाठी तसेच शास्त्रज्ञांना अभ्यास करण्यासाठी चांगली माहिती मिळत असल्याने अमेरिकेतील नासा आणि युरोपातील अन्य अवकाश संशोधन संस्थांनी या मोहिमेचे कौतुक केले आहे. भारतातील शास्त्रज्ञांचे आणि इस्त्रोचे देशभरातील शास्त्रज्ञांनी अभिनंदन केले असून, हा चांगला प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. सदर उपग्रह हा पूर्वीच्या नियोजनानुसार दि. ७ सप्टेंबरला चंद्रावर उतरणे अपेक्षित होते, परंतु तांत्रिक कारणांनी ते शक्य झाले नाही. तरी याला अपयश म्हणता येणार नाही. नासाने पुढील काळात म्हणजे इ. स. २0१४ मध्ये अर्टेमीस मिशन ही मोहीम आखली आहे. यात मन मिशन ही मोहीम असल्याने सध्या छायाचित्राचा उपयोग होणार आहे, असेही नासाने म्हटले आहे. इस्त्रोने मिशन चांद्रयान- २ या मोहिमेनंतर आता चंद्रयान- ३ ही मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. दि. २१ सप्टेंबरपासून हा उपग्रह काळोखात जाणार आहे. साधारणत: १४ दिवसांचा हा कालावधी असणार आहे. त्यानंतर पुन्हा या उपग्रहावरून वेगवेगळी छायाचित्रे मिळू शकतील. चंद्राच्या जवळ अनुकूल वातावरण नसल्याने उपग्रहाचे लॅँडिंग होऊ शकले नाही. ही मोहीम १00 टक्के यशस्वी होऊ शकली नाही, याबद्दल शास्त्रज्ञ डॉ. सिवेन यांच्यासह सर्वच भारतीय जनता भावनिक झाली होती. परंतु आतापर्यंत चांद्रयानची कोणतीही मोहीम ४0 टक्केपेक्षा जास्त यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे भारताची मोहीम त्यामानाने खूपच यशस्वी ठरली आहे. आगामी काळात चंद्रावर पाणी, बर्फ आणि अन्य गोष्टींच्या संशोधनासाठी ही मोहीम यशस्वी ठरणारी आहे. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2Nashikनाशिक