शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अवकाश संशोधन कार्यासाठी ‘चांद्रयान-२’ मोहीम उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:32 IST

चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लॅँडर या उपग्रहाचा इस्त्रो संस्थेशी पुरेसा संपर्क होऊ शकला नाही, तरीही या उपग्रहाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या उपग्रहावरून विविध छायाचित्रेदेखील आतापर्यंत मिळाली असून, त्याचा वेगवेगळ्या संशोधन कार्यासाठी उपयोग होऊ शकतो.

चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लॅँडर या उपग्रहाचा इस्त्रो संस्थेशी पुरेसा संपर्क होऊ शकला नाही, तरीही या उपग्रहाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या उपग्रहावरून विविध छायाचित्रेदेखील आतापर्यंत मिळाली असून, त्याचा वेगवेगळ्या संशोधन कार्यासाठी उपयोग होऊ शकतो. विशेषत: या उपग्रहावर लावलेल्या कॅमेऱ्याने हवी तशी छायाचित्रे पाठविण्यास विक्रम लॅण्डर आॅरफीट यशस्वी झालेले दिसते. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर उपग्रम मोहीम आखणारा भारत हा जगातील पहिलाच देश असून, या ठिकाणी असलेली माती, खडक, हवामान यांचा अभ्यास यातून होणार आहे. इस्त्रोची ही मोहीम सुमारे ९0 टक्के यशस्वी झाली, असे मत जगभरातील शास्त्राज्ञांनी व्यक्त केले आहे. विक्रम लॅँडर या उपग्रहाचे कार्य आणखी सुमारे सात वर्ष सुरू राहणार असून, त्याचा कार्य कालावधी वाढविण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. या मोहिमेतून संशोधनासाठी तसेच शास्त्रज्ञांना अभ्यास करण्यासाठी चांगली माहिती मिळत असल्याने अमेरिकेतील नासा आणि युरोपातील अन्य अवकाश संशोधन संस्थांनी या मोहिमेचे कौतुक केले आहे. भारतातील शास्त्रज्ञांचे आणि इस्त्रोचे देशभरातील शास्त्रज्ञांनी अभिनंदन केले असून, हा चांगला प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. सदर उपग्रह हा पूर्वीच्या नियोजनानुसार दि. ७ सप्टेंबरला चंद्रावर उतरणे अपेक्षित होते, परंतु तांत्रिक कारणांनी ते शक्य झाले नाही. तरी याला अपयश म्हणता येणार नाही. नासाने पुढील काळात म्हणजे इ. स. २0१४ मध्ये अर्टेमीस मिशन ही मोहीम आखली आहे. यात मन मिशन ही मोहीम असल्याने सध्या छायाचित्राचा उपयोग होणार आहे, असेही नासाने म्हटले आहे. इस्त्रोने मिशन चांद्रयान- २ या मोहिमेनंतर आता चंद्रयान- ३ ही मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. दि. २१ सप्टेंबरपासून हा उपग्रह काळोखात जाणार आहे. साधारणत: १४ दिवसांचा हा कालावधी असणार आहे. त्यानंतर पुन्हा या उपग्रहावरून वेगवेगळी छायाचित्रे मिळू शकतील. चंद्राच्या जवळ अनुकूल वातावरण नसल्याने उपग्रहाचे लॅँडिंग होऊ शकले नाही. ही मोहीम १00 टक्के यशस्वी होऊ शकली नाही, याबद्दल शास्त्रज्ञ डॉ. सिवेन यांच्यासह सर्वच भारतीय जनता भावनिक झाली होती. परंतु आतापर्यंत चांद्रयानची कोणतीही मोहीम ४0 टक्केपेक्षा जास्त यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे भारताची मोहीम त्यामानाने खूपच यशस्वी ठरली आहे. आगामी काळात चंद्रावर पाणी, बर्फ आणि अन्य गोष्टींच्या संशोधनासाठी ही मोहीम यशस्वी ठरणारी आहे. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2Nashikनाशिक