शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगा कायम प्रवाहित ठेवण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST

बिघडली होती. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याची परवानगी आता शाळांनाच द्यायला हवी आणि शाळा सुरू करायला ...

बिघडली होती. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याची परवानगी आता शाळांनाच द्यायला हवी आणि शाळा सुरू करायला हव्यात, अशी मागणी आता विविध शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांकडून होत आहे. यामागे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना निश्चितच आहे. परंतु, संगणकातून अवतरलेला हा डिजिटल शिक्षणाचा प्रवाह शाळा, शिक्षक आणि शिक्षक संघटनांना नामशेष करणार की काय? अशी भीती या मागे नाही असेही म्हणता येणार नाही. परंतु, यात कोणीही भीती बाळगण्याचे कारण निश्चितच नाही, कारण

संगणकाला बरे-वाईट समजत नाही, ते शिक्षकांना समजते. त्यामुळे येणाऱ्या काळात शिक्षकी पेशा केवळ नोकरी नाही, तर समाज घडविण्याची जबाबदारी असल्याचे समजून घेत ज्ञानगंगा अखंड प्रवाहित ठेवण्याचे आव्हान गुरुजनांना पेलावे लागणार आहे.

कोरोना संकटाने संपूर्ण जगाला घरात कोंडल्याचे भीषण दृश्य गेल्या काही दिवसांत अनुभवायला मिळाले. भारतासारख्या विकसनशील देशात तर अपुऱ्या सोयीसुविधांअभावी अशा परिस्थितीत दैनंदिन व्यवहार, दळण-वळण, शाळा, शिक्षण कसे चालणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. परंतु, संगणकाने यापूर्वीच घडवून आणलेली डिजिटल क्रांती ऑनलाईन तंत्रज्ञानाने याच काळात घराघरांत पोहोचवली.

त्यामुळेच घरातील आई-बाबा आणि अंगणवाडीतील शिक्षिकांऐवजी पूर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बोबड्या बोलांचा आधारही त्यांच्या हातात आलेला मोबाईल आणि त्यातून दिसणारे कार्टून बनले असे काहीसे चित्र अवतीभवती दिसत नसेल तरच नवल. मुलांचा वाढता वयोगट आणखीनच या प्रवाहात सामावल्याचे ओळखून वेगवेगळ्या मोबाईल ॲप कंपन्यांनी ऑनलाईन माध्यमातून काॅर्पोरेट एज्युकेशन प्रणाली विकसित करून छोट्या मोठ्या शिकवणी चालकांचे शटर डाऊन करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल येणाऱ्या काळात शाळा, महाविद्यालयांच्या दिशेने पडणारच नाही, असे नाही. ते रोखण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे येण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना केवळ माहिती इंटरनेट, मोबाईलच्या साहाय्याने कुठेही आणि केव्हाही मिळू शकते. परंतु, त्यातील सामाजिक व भावनिक बरे-वाईट दृष्टिकोन पडताळण्याचे कसब हे शिक्षकच देऊ शकतात, त्याच दिशने मार्गक्रमण करीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुढे येऊन काम करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.

- नामदेव भोर