शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

ज्ञानगंगा कायम प्रवाहित ठेवण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST

बिघडली होती. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याची परवानगी आता शाळांनाच द्यायला हवी आणि शाळा सुरू करायला ...

बिघडली होती. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याची परवानगी आता शाळांनाच द्यायला हवी आणि शाळा सुरू करायला हव्यात, अशी मागणी आता विविध शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांकडून होत आहे. यामागे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना निश्चितच आहे. परंतु, संगणकातून अवतरलेला हा डिजिटल शिक्षणाचा प्रवाह शाळा, शिक्षक आणि शिक्षक संघटनांना नामशेष करणार की काय? अशी भीती या मागे नाही असेही म्हणता येणार नाही. परंतु, यात कोणीही भीती बाळगण्याचे कारण निश्चितच नाही, कारण

संगणकाला बरे-वाईट समजत नाही, ते शिक्षकांना समजते. त्यामुळे येणाऱ्या काळात शिक्षकी पेशा केवळ नोकरी नाही, तर समाज घडविण्याची जबाबदारी असल्याचे समजून घेत ज्ञानगंगा अखंड प्रवाहित ठेवण्याचे आव्हान गुरुजनांना पेलावे लागणार आहे.

कोरोना संकटाने संपूर्ण जगाला घरात कोंडल्याचे भीषण दृश्य गेल्या काही दिवसांत अनुभवायला मिळाले. भारतासारख्या विकसनशील देशात तर अपुऱ्या सोयीसुविधांअभावी अशा परिस्थितीत दैनंदिन व्यवहार, दळण-वळण, शाळा, शिक्षण कसे चालणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. परंतु, संगणकाने यापूर्वीच घडवून आणलेली डिजिटल क्रांती ऑनलाईन तंत्रज्ञानाने याच काळात घराघरांत पोहोचवली.

त्यामुळेच घरातील आई-बाबा आणि अंगणवाडीतील शिक्षिकांऐवजी पूर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बोबड्या बोलांचा आधारही त्यांच्या हातात आलेला मोबाईल आणि त्यातून दिसणारे कार्टून बनले असे काहीसे चित्र अवतीभवती दिसत नसेल तरच नवल. मुलांचा वाढता वयोगट आणखीनच या प्रवाहात सामावल्याचे ओळखून वेगवेगळ्या मोबाईल ॲप कंपन्यांनी ऑनलाईन माध्यमातून काॅर्पोरेट एज्युकेशन प्रणाली विकसित करून छोट्या मोठ्या शिकवणी चालकांचे शटर डाऊन करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल येणाऱ्या काळात शाळा, महाविद्यालयांच्या दिशेने पडणारच नाही, असे नाही. ते रोखण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे येण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना केवळ माहिती इंटरनेट, मोबाईलच्या साहाय्याने कुठेही आणि केव्हाही मिळू शकते. परंतु, त्यातील सामाजिक व भावनिक बरे-वाईट दृष्टिकोन पडताळण्याचे कसब हे शिक्षकच देऊ शकतात, त्याच दिशने मार्गक्रमण करीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुढे येऊन काम करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.

- नामदेव भोर