शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

लासलगाव  बाजार समितीत  नाफेडच्या कांदा खरेदीने चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:12 IST

येथील बाजार समितीत नाफेडच्या कांदा खरेदीचा शुभारंभ नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बाजार समितीत खरेदी केलेल्या पहिल्या कांदा ट्रॅक्टरचे पूजन नाफेड संकुलात खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शांताराम नागरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

लासलगाव : येथील बाजार समितीत नाफेडच्या कांदा खरेदीचा शुभारंभ नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बाजार समितीत खरेदी केलेल्या पहिल्या कांदा ट्रॅक्टरचे पूजन नाफेड संकुलात खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शांताराम नागरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी संचालक जनार्दन जगताप, अनिल घोटेकर, सुरेश रायते, शंकरराव कुटे, प्रकाश कापडी, शिवाजी जाधव, धोंडीराम धाकराव, मधुकर दरेकर, राजाराम दरेकर, संघाचे व्यवस्थापक प्रकाश भालेराव, नाफेडचे वरिष्ठ सहायक पी. के. चौबे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या कांदा खरेदीसाठी लासलगाव खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून खरेदी-विक्रीची व्यवस्था पाहिली जाणार आहे. नाफेडच्या या कांदा खरेदीमुळे बाजारभावात सुमारे २०० ते २५० रुपये वाढ दिसून आली. दि. २० रोजी ६०० ते ६५० रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा नाफेडच्या आगमनाने ८०० रुपये क्विंटलवर पोहचला. शेतमालाचे भाव पडल्यावर केंद्र सरकारच्या वतीने किंमत स्थिरीकरण कोशातून शेतमाल खरेदी करण्याची योजना सरकार राबवत असते. सदरची कांदा खरेदी या योजनेंतर्गत होत असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी  दिली.  पुढील सहा महिन्यांच्या काळात कांद्याचा हंगाम नसल्याने हा कांदा साठवणूक करून आगामी काळात मोठ्या शहरांत विक्र ी करण्यात येणार आहे. उच्च प्रतीचा कांदा प्रचलित बाजारभावात सर्वोच्च दराने खरेदी करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून दिले गेले असल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी यावेळी दिली. सदर कांदा विक्र ीचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ धनादेशाद्वारे देण्यात येणार आहेत. आजच्या प्रारंभीचा ट्रॅक्टर महेश दामू घोरपडे (रा. पाटोदा) यांच्या मालकीचा कांदा ७७० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्यात आला.  सकाळच्या सत्रामध्ये ८१० रु पये प्रतिक्विंटल भावाने कांदा खरेदी केला गेला. दिलासाकांद्याला मिळणाºया अत्यल्प भावामुळे हैराण झालेल्या शेतकºयाला नाफेडच्या कांदा खरेदीने दिलासा मिळणार आहे. लासलगाव येथील नाफेड संकुलात सुमारे पंधरा हजार मेट्रिक टन कांदा साठवणुकीची व्यवस्था आहे. याशिवाय राष्ट्रीय बागवानी संघ यांच्याकडे सुमारे एक हजार मेट्रिक टन कांदा साठवला जाऊ शकतो. यावर्षी कांद्याचे उत्पादन भरपूर असल्यामुळे पिंपळगाव, कळवण आदी ठिकाणीही नाफेडच्या वतीने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. सरकारने कांद्याचे भाव सुधारावेत म्हणून हे पाऊल उचलले आहे. सध्या उन्हाळ कांद्याचा काढणी हंगाम सुरू आहे.

टॅग्स :onionकांदा