शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अकरावी प्रवेशासाठी होणार सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 00:41 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून, शुक्रवारी (दि. २८) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या मूल्यांकनाचे धोरण स्पष्ट करतानाच अकरावीसाठी सीईटी परीक्षा घेऊन त्याआधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ठळक मुद्दे९९ हजार विद्यार्थ्यांची कसोटी : शहरात ६०, ग्रामीणमध्ये २५० काॅलेज

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून, शुक्रवारी (दि. २८) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या मूल्यांकनाचे धोरण स्पष्ट करतानाच अकरावीसाठी सीईटी परीक्षा घेऊन त्याआधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अकरावीच्या ७७ हजार ५० जागांसाठी सीईटी परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, दहावीच्या परीक्षेला मुकलेल्या जवळपास ९९ हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्या माध्यमातून कसोटी लागणार आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर अखेर राज्य शासनाने  दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची पद्धत निश्चित केली आहे.  त्याचप्रमाणे अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी  सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील ६० उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील २५ हजार २७० जागांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २५० कनिष्ठ महाविद्यालयांमधील ५१ हजार ८०० जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नाशिक जिल्ह्यातील २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात दहावीत ५२ हजार ८०३ मुले,  तर ४६ हजार १४६ हजार मुली असे एकूण ९८ हजार ९४९  विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ होणार होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे दहावीची परीक्षाच रद्द झाल्यामुळे आता या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाटी सीईटी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी दहावीचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेतलेले आहे. याच अभ्यासक्रमाच्या आधारे त्यांना अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. 

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण