शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य वाढविल्याने कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:12 IST

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य वाढविल्याने भावात घसरण झाली असून, निर्यातमूल्य कमी करण्यात यावे, अशी मागणी खामखेडा परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकºयांत नाराजी व्यक्तलाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड महागडी बियाणे खरेदी केली

खामखेडा : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य वाढविल्याने भावात घसरण झाली असून, निर्यातमूल्य कमी करण्यात यावे, अशी मागणी खामखेडा परिसरातील शेतकºयांनी केली आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात-मूल्यावर अचानक दर ८५० डॉलर वाढ केल्याने कांद्याच्या भाव कमी झाल्याने शेतकºयांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातील कसमादे परिसरात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. लाल कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. या कांदा पिकाच्या येणाºया पैशातून शेतकºयांची मोठी उलाढाल केली जाते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय तोट्यात येत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीसह वादळी वारा व अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांदा व कांद्याच्या डोंगळ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे कांद्याच्या बियाणाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा शेतकºयाने जिल्ह्यासह परजिल्ह्यातून लाल कांदाची महागडी बियाणे खरेदी केली. चालूवर्षी सुरुवातीला पावसाळा उशिरा झाल्याने कांद्याचे बियाणे उशिरा टाकल्यामुळे लाल कांदाची लागवड उशिरा केली होती. कांदा ४ हजार ते ३५०० रुपयांपर्यंत विकला जाऊ लागला होता. परंतु पुन्हा कांद्याचा भाव कमी झाल्याने या कांद्याच्या मिळणाºया पैशातून त्याला सोसायटी, बॅँक व हात उसनवार पैसे परत करायचे होते. तेव्हा केंद्र सरकारने कांदा निर्यातमूल्यामध्ये वाढ केल्याने कांद्याच्या भावात घसरण होऊन कांदा २००० ते ३००० रुपये भावाने बाजारात विकला जात आहे. यामुळे शेतकºयाचे आर्थिक नियोजन ढासळले आहे. आता बँक, सहकार सोसायटी व उसनवार कर्ज कसे परत करावे या विवेचनात शेतकरी पडला आहे. तेव्हा केंद्र सरकारने निर्यातमूल्य कमी करावे, अशी मागणी खामखेडा परिसरातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.नांदगाव बाजार समितीमध्ये आठ हजार क्विंटल आवकनांदगाव येथील बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव पाचशे ते आठशे रुपयांनी एकीकडे कोसळले असतानादेखील कांद्याची आवक मात्र मोठी झाली. जवळपास आठ हजारांहून अधिक क्विंटल आवक झाली. सरासरीपेक्षादेखील आज मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली होती. रात्री उशिरापर्यंत जवळपास तीनशेहून अधिक वाहने बाजार समितीच्या आवारात दाखल झाली होती. एरवी तीनशे ते साडेतीनशे अशा प्रमाणात वाहने येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढू लागल्याचे दृश्य सायंकाळी आवारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या संख्येवरून जाणवत होते. सकाळच्या पहिल्या सत्रात जवळपास सातशेचाळीस वाहने दाखल झाली होती. लिलाव सुरू झाले तेव्हा हजार रुपयांपासून ३०३७ रुपयांपर्यंतचे भाव निघाले; मात्र सरासरी २६५० रुपये अशी राहिली. लाला कांद्याची घसरण अशी सुरू असतानादेखील दुसरीकडे मोठ्या संख्येने वाहने रात्री उशिरापर्यंत दाखल होत होती. तीनशे वाहने उभी असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. दरम्यान नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तालुक्यातील बोलठाण उपबाजार आवारात १४५ वाहने दाखल झाली होती. बोलठाणला ३४०५ रुपये भाव मिळाला असला तरी येथील सरासरी मात्र २६४५ रु पये अशी राहिली.

टॅग्स :onionकांदा