शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नाशिक-पुणे रेल्वेमार्गाला केंद्र शासनाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 23:59 IST

नाशिकच्या विकासकासाठी महत्त्वाचा असणाऱ्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावास मध्य रेल्वे बोर्डानंतर आता केंद्र शासनाने काही अटी-शर्तींवर तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

नाशिकरोड : नाशिकच्या विकासकासाठी महत्त्वाचा असणाऱ्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावास मध्य रेल्वे बोर्डानंतर आता केंद्र शासनाने काही अटी-शर्तींवर तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.नाशिक, पुणे आणि मुंबई हा राज्यातील विकासाचा सुवर्ण त्रिकोण असल्याने नाशिक आणि पुणे ही शहरे रेल्वमार्गाने एकमेकांना जोडली जावीत यासाठी गोडसे यांनी राज्याबरोबरच केंद्राकडेही पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांनी संसदेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पात दोनशे कोटी रुपये मंजूर झाले होते. या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.यावेळी प्रस्तावाच्या डीपीआरमध्ये राज्य शासनाचे असलेले केवळ २० टक्के शेअर्स, राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्काची अपेक्षित शाश्वती, प्रकल्पाच्या व्यवहार्यतेसाठी विविध तांत्रिक विभागांची आवश्यकता व निरीक्षणे, प्रस्तावित रेल्वेमार्ग मालगाडी वाहतुकीसाठी सक्षम करण्यासाठीच्या उपाययोजना, प्रोजेक्टच्या यÞशस्वतेसाठी जे. व्ही. माडेल, एमसीए विभागाची मान्यता आदी मुद्द्यांवर प्रशासनाने निरीक्षणे नोंदवली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला होता. केंद्र शासनाने नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावास काही अटी-शर्ती व तत्त्वता मान्यता दिली असल्याचे गोडसे यांनी कळविले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेHemant Godseहेमंत गोडसे