शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अठरा वर्षांपासून रखडली ओबीसींची जनगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:43 IST

श्रावण देवरे : मुक्त विद्यापीठातील कार्यक्रमात प्रतिपादननाशिक : ओबीसींनी टिकविलेली संस्कृती, जडणघडण समाजातील सर्व घटकांना जोडून ठेवणारी आणि समतावादी अशी आहे. संपूर्ण देशभर विखुरलेला हा समाज देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी योगदान देत आहे. समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या एकजूट ठेवण्याचे काम या समाजाने केले. मात्र, वारंवार मागणी करूनही गेल्या अठरा वर्षांपासून ...

ठळक मुद्देज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक श्रावण देवरे यांचे व्याख्यान सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळाले तरच प्रगती

श्रावण देवरे : मुक्त विद्यापीठातील कार्यक्रमात प्रतिपादननाशिक : ओबीसींनी टिकविलेली संस्कृती, जडणघडण समाजातील सर्व घटकांना जोडून ठेवणारी आणि समतावादी अशी आहे. संपूर्ण देशभर विखुरलेला हा समाज देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी योगदान देत आहे. समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या एकजूट ठेवण्याचे काम या समाजाने केले. मात्र, वारंवार मागणी करूनही गेल्या अठरा वर्षांपासून अद्यापपर्यंत ओबीसींची जनगणना करण्यात आली नसल्याची खंत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक श्रावण देवरे यांनी व्यक्त केली.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ओबीसींसाठी योगदान’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन होते. याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. नागार्जुन वाडेकर उपस्थित होते.देवरे पुढे म्हणाले, देशातील विचारवंत आणि महापुरुषांनी समाजाच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केला आहे. समाजातील जातीव्यवस्थेत ज्या घटकांचे शोषण झाले, त्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करण्यात आली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ओबीसींच्या विकासासाठी कालेलकर आयोगाची स्थापनाही करण्यात आली होती. मात्र, दुर्दैवाने तो स्वीकारला गेला नाही. पुढे मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. परंतु ओबीसी घटकास त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे प्रतिनिधित्व मिळाल्याचे चित्र पहायला मिळत नाही. सन २०१० मध्ये ओबीसींची जनगणना करण्यासंदर्भात कायदा होऊनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ओबीसींच्या आर्थिक सर्वेक्षणाला २०१२ मध्ये सुरुवात करूनही आजपर्यंत ओबीसींची जनगणना झाली नसून ती तातडीने करण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. देवरे यांनी यावेळी स्पष्ट केले.कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन म्हणाले, कुठल्याही रचनेत वा संस्थेत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळाले तर समाजाची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधली जाईल. प्रास्ताविक प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी केले. दयानंदन हत्तीअंबरे यांनी सूत्रसंचालन केले. कविता सोनवणे यांनी परिचय करून दिला. राहुल ढेरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ