शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

अठरा वर्षांपासून रखडली ओबीसींची जनगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:43 IST

श्रावण देवरे : मुक्त विद्यापीठातील कार्यक्रमात प्रतिपादननाशिक : ओबीसींनी टिकविलेली संस्कृती, जडणघडण समाजातील सर्व घटकांना जोडून ठेवणारी आणि समतावादी अशी आहे. संपूर्ण देशभर विखुरलेला हा समाज देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी योगदान देत आहे. समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या एकजूट ठेवण्याचे काम या समाजाने केले. मात्र, वारंवार मागणी करूनही गेल्या अठरा वर्षांपासून ...

ठळक मुद्देज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक श्रावण देवरे यांचे व्याख्यान सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळाले तरच प्रगती

श्रावण देवरे : मुक्त विद्यापीठातील कार्यक्रमात प्रतिपादननाशिक : ओबीसींनी टिकविलेली संस्कृती, जडणघडण समाजातील सर्व घटकांना जोडून ठेवणारी आणि समतावादी अशी आहे. संपूर्ण देशभर विखुरलेला हा समाज देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी योगदान देत आहे. समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या एकजूट ठेवण्याचे काम या समाजाने केले. मात्र, वारंवार मागणी करूनही गेल्या अठरा वर्षांपासून अद्यापपर्यंत ओबीसींची जनगणना करण्यात आली नसल्याची खंत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक श्रावण देवरे यांनी व्यक्त केली.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ओबीसींसाठी योगदान’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन होते. याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. नागार्जुन वाडेकर उपस्थित होते.देवरे पुढे म्हणाले, देशातील विचारवंत आणि महापुरुषांनी समाजाच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केला आहे. समाजातील जातीव्यवस्थेत ज्या घटकांचे शोषण झाले, त्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करण्यात आली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ओबीसींच्या विकासासाठी कालेलकर आयोगाची स्थापनाही करण्यात आली होती. मात्र, दुर्दैवाने तो स्वीकारला गेला नाही. पुढे मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. परंतु ओबीसी घटकास त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे प्रतिनिधित्व मिळाल्याचे चित्र पहायला मिळत नाही. सन २०१० मध्ये ओबीसींची जनगणना करण्यासंदर्भात कायदा होऊनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ओबीसींच्या आर्थिक सर्वेक्षणाला २०१२ मध्ये सुरुवात करूनही आजपर्यंत ओबीसींची जनगणना झाली नसून ती तातडीने करण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. देवरे यांनी यावेळी स्पष्ट केले.कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन म्हणाले, कुठल्याही रचनेत वा संस्थेत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळाले तर समाजाची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधली जाईल. प्रास्ताविक प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी केले. दयानंदन हत्तीअंबरे यांनी सूत्रसंचालन केले. कविता सोनवणे यांनी परिचय करून दिला. राहुल ढेरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ