शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दरच नसल्याने शेतातच सडतोय फ्लॉवर, कोबी, वांगी अन‌् टोमॅटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 01:19 IST

येवला / जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणजे कांदा. पण यावर्षी बुरशीजन्य रोगाने व पावसाने शेतकऱ्यांची कांदा रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो ही पिके घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असून, अनेक शेतकऱ्यांनी पिके शेतातच सोडून दिली आहे. या पिकांतून खर्चदेखील वसूल होत नसल्याने भाजीपाला पाळीव जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

येवला / जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणजे कांदा. पण यावर्षी बुरशीजन्य रोगाने व पावसाने शेतकऱ्यांची कांदा रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो ही पिके घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असून, अनेक शेतकऱ्यांनी पिके शेतातच सोडून दिली आहे. या पिकांतून खर्चदेखील वसूल होत नसल्याने भाजीपाला पाळीव जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.जळगाव नेऊर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे रोपे नसल्यामुळे फ्लॉवर, वांगी, कोबी, टोमॅटो पिकाला पसंती दिली. परंतु त्याचेही उत्पादन जास्त झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनाभाजीपाला कवडीमोल दराने विक्री करावा लागत आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने त्याचा परिणाम भाजीपाला पिकावर होत आहे. बारमाही भाजीपाला उत्पादन घेऊन आपल्या प्रपंचाचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबाचे जीवनमान अस्तव्यस्त झाले. हजारो रुपये भाजीपाल्यासाठी खर्च करून ती वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

कोरोनामुळे आठवडे बाजार बंद होण्याची भीतीकोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामीण भागातही आठवडे बाजार बंद ठेवण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यावर आधारित भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विक्री कसा करावा, हा प्रश्न उभा राहिला आहे. तोडून ठेवलेल्या भाजीपाल्याला मागणी नसल्यामुळे पाळीव जनावरांना खाऊ घालावा लागत आहे, तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतात सोडून दिला आहे. पर्यायाने भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, होत असलेल्या नुकसानीमुळे त्यांच्या प्रपंचाचा गाडा, कसा चालवावा व उधार, उसनवारी करून शेतीसाठी घेतलेला पैसा कसा फेडावा, असा प्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.मी एक एकर क्षेत्रावर फ्लॉवरची दहा हजार काडी लागवड करून साधारणपणे रोपांसह एकरासाठी ३० हजार खर्च केला. गेल्या पंधरा दिवसांपासून फ्लॉवर चालू झाले आहे. त्यातून खर्चदेखील वसूल होत नसल्याने फ्लॉवर शेतातच सोडून देण्याची वेळ आली असून, हजारो रुपये खर्च वाया गेला आहे.- उत्तम सोनवणे, उत्पादक शेतकरी जऊळकेयेवला तालुक्यातील जऊळके येथील शेतकरी उत्तम सोनवणे यांनी शेतातच सोडून दिलेले फ्लॉवर पीक, दुसऱ्या छायाचित्रात जनावरांच्या पुढ्यात टाकलेली वांगी. (०१ जळगाव नेऊर १/२)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी