शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मांजरपाड्याच्या पाण्याने दुष्काळ हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:17 IST

येवला : गत वर्षी काम अपूर्ण असतानाही अडथळयांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत आले होते. यावर्षी हेच पाणी येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे.

ठळक मुद्देगतवर्षी पेक्षा जास्त पाणी मिळण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : गत वर्षी काम अपूर्ण असतानाही अडथळयांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत आले होते. यावर्षी हेच पाणी येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे.पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे काम १९७२ ला सुरू झाले. ४० ते ४५ वर्षांनंतर २०१९ ला पूर्ण झाले. पहिल्याच प्रयत्नात पुणेगाव ते दरसवाडी ६३ किमी आणि दरसवाडी ते बाळापूर ४२ किमी अशी १०५ किमी कालवा चाचणी पूर्ण झाली. शेतकऱ्यांच्या तिसºया पिढीला पाणी पाहण्याचा योग आला. पाणी आले अन सतत दुष्काळी असा शिक्का असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी दसºयालाच दिवाळी साजरी केली.मांजरपाडा प्रकल्पाचे काम अपूर्ण असूनही बाळापूर पर्यंत पाणी आले होते. जून२०२० अखेर पर्यंत मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पाणी डोंगरगाव पर्यंत जाईल असे नियोजित असताना दुर्दैवाने कोरोना संकटाने लॉकडाऊन सुरू झाला प्रकल्पाचे काम बंद पडले.मांजरपाडा काम अपुर्ण असले तरी मागील वर्षा प्रमाणे निश्चितच पाणी येवला तालुक्यात पोहचेल असा विश्वास होता. मात्र मांजरपाडा, पुणेगाव, ओझरखेड, दरसवाडी या लाभ क्षेत्रात कमी पाऊस असल्याने पाणी येणार की नाही या चिंतेत शेतकरी होता. मात्र गेल्या ५दिवसापासून या लाभक्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाल्याने धरणे चांगली भरली आहेत. त्यामुळे कालवा पुन्हा वाहणार अशी आशा निर्माण झाली आहे.लॉकडाऊन शिथिल होताच पुणेगाव ते बाळापूर पर्यंत कालवा दुरु स्ती, विस्तारीकरण, अडथळा दगड काढणे आदी कामे सुरू करण्यात आली होती. पुणेगाव ते दरसवाडी हे काम पूर्ण झाले असून दरसवाडी ते बाळापूर मधील काम अंतिम टप्प्यात आहे. विसापूर ते बाळापूर हे शेवटचे काम सुरू आहे. कालवा दुरु स्ती, रु ंदीकरण झाल्याने दरसवाडी येथून पाणी सुटल्यावर तीन दिवसात पाणी पोहचेल अशी अपेक्षा आहे.पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते बाळापूर कालवा दुरु स्ती झाली आहे. निसर्गकृपेने पाच-सहा दिवसापासून मांजरपाडा बोगदा चांगल्या क्षमतेने वाहतो आहे, पुणेगाव ५० टक्के भरले आहे. सुदैवाने पावसाने दरसवाडी ६० टक्के भरले आहे. मागील वर्षीप्रमाण यंदा निश्चितच पाणी येणार यात शंका नाही.- मोहन शेलार, आंदोलक

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी