शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

मांजरपाड्याच्या पाण्याने दुष्काळ हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:17 IST

येवला : गत वर्षी काम अपूर्ण असतानाही अडथळयांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत आले होते. यावर्षी हेच पाणी येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे.

ठळक मुद्देगतवर्षी पेक्षा जास्त पाणी मिळण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : गत वर्षी काम अपूर्ण असतानाही अडथळयांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत आले होते. यावर्षी हेच पाणी येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे.पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे काम १९७२ ला सुरू झाले. ४० ते ४५ वर्षांनंतर २०१९ ला पूर्ण झाले. पहिल्याच प्रयत्नात पुणेगाव ते दरसवाडी ६३ किमी आणि दरसवाडी ते बाळापूर ४२ किमी अशी १०५ किमी कालवा चाचणी पूर्ण झाली. शेतकऱ्यांच्या तिसºया पिढीला पाणी पाहण्याचा योग आला. पाणी आले अन सतत दुष्काळी असा शिक्का असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी दसºयालाच दिवाळी साजरी केली.मांजरपाडा प्रकल्पाचे काम अपूर्ण असूनही बाळापूर पर्यंत पाणी आले होते. जून२०२० अखेर पर्यंत मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पाणी डोंगरगाव पर्यंत जाईल असे नियोजित असताना दुर्दैवाने कोरोना संकटाने लॉकडाऊन सुरू झाला प्रकल्पाचे काम बंद पडले.मांजरपाडा काम अपुर्ण असले तरी मागील वर्षा प्रमाणे निश्चितच पाणी येवला तालुक्यात पोहचेल असा विश्वास होता. मात्र मांजरपाडा, पुणेगाव, ओझरखेड, दरसवाडी या लाभ क्षेत्रात कमी पाऊस असल्याने पाणी येणार की नाही या चिंतेत शेतकरी होता. मात्र गेल्या ५दिवसापासून या लाभक्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाल्याने धरणे चांगली भरली आहेत. त्यामुळे कालवा पुन्हा वाहणार अशी आशा निर्माण झाली आहे.लॉकडाऊन शिथिल होताच पुणेगाव ते बाळापूर पर्यंत कालवा दुरु स्ती, विस्तारीकरण, अडथळा दगड काढणे आदी कामे सुरू करण्यात आली होती. पुणेगाव ते दरसवाडी हे काम पूर्ण झाले असून दरसवाडी ते बाळापूर मधील काम अंतिम टप्प्यात आहे. विसापूर ते बाळापूर हे शेवटचे काम सुरू आहे. कालवा दुरु स्ती, रु ंदीकरण झाल्याने दरसवाडी येथून पाणी सुटल्यावर तीन दिवसात पाणी पोहचेल अशी अपेक्षा आहे.पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते बाळापूर कालवा दुरु स्ती झाली आहे. निसर्गकृपेने पाच-सहा दिवसापासून मांजरपाडा बोगदा चांगल्या क्षमतेने वाहतो आहे, पुणेगाव ५० टक्के भरले आहे. सुदैवाने पावसाने दरसवाडी ६० टक्के भरले आहे. मागील वर्षीप्रमाण यंदा निश्चितच पाणी येणार यात शंका नाही.- मोहन शेलार, आंदोलक

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी