शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मांजरपाड्याच्या पाण्याने दुष्काळ हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:17 IST

येवला : गत वर्षी काम अपूर्ण असतानाही अडथळयांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत आले होते. यावर्षी हेच पाणी येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे.

ठळक मुद्देगतवर्षी पेक्षा जास्त पाणी मिळण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : गत वर्षी काम अपूर्ण असतानाही अडथळयांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत आले होते. यावर्षी हेच पाणी येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे.पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे काम १९७२ ला सुरू झाले. ४० ते ४५ वर्षांनंतर २०१९ ला पूर्ण झाले. पहिल्याच प्रयत्नात पुणेगाव ते दरसवाडी ६३ किमी आणि दरसवाडी ते बाळापूर ४२ किमी अशी १०५ किमी कालवा चाचणी पूर्ण झाली. शेतकऱ्यांच्या तिसºया पिढीला पाणी पाहण्याचा योग आला. पाणी आले अन सतत दुष्काळी असा शिक्का असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी दसºयालाच दिवाळी साजरी केली.मांजरपाडा प्रकल्पाचे काम अपूर्ण असूनही बाळापूर पर्यंत पाणी आले होते. जून२०२० अखेर पर्यंत मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पाणी डोंगरगाव पर्यंत जाईल असे नियोजित असताना दुर्दैवाने कोरोना संकटाने लॉकडाऊन सुरू झाला प्रकल्पाचे काम बंद पडले.मांजरपाडा काम अपुर्ण असले तरी मागील वर्षा प्रमाणे निश्चितच पाणी येवला तालुक्यात पोहचेल असा विश्वास होता. मात्र मांजरपाडा, पुणेगाव, ओझरखेड, दरसवाडी या लाभ क्षेत्रात कमी पाऊस असल्याने पाणी येणार की नाही या चिंतेत शेतकरी होता. मात्र गेल्या ५दिवसापासून या लाभक्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाल्याने धरणे चांगली भरली आहेत. त्यामुळे कालवा पुन्हा वाहणार अशी आशा निर्माण झाली आहे.लॉकडाऊन शिथिल होताच पुणेगाव ते बाळापूर पर्यंत कालवा दुरु स्ती, विस्तारीकरण, अडथळा दगड काढणे आदी कामे सुरू करण्यात आली होती. पुणेगाव ते दरसवाडी हे काम पूर्ण झाले असून दरसवाडी ते बाळापूर मधील काम अंतिम टप्प्यात आहे. विसापूर ते बाळापूर हे शेवटचे काम सुरू आहे. कालवा दुरु स्ती, रु ंदीकरण झाल्याने दरसवाडी येथून पाणी सुटल्यावर तीन दिवसात पाणी पोहचेल अशी अपेक्षा आहे.पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते बाळापूर कालवा दुरु स्ती झाली आहे. निसर्गकृपेने पाच-सहा दिवसापासून मांजरपाडा बोगदा चांगल्या क्षमतेने वाहतो आहे, पुणेगाव ५० टक्के भरले आहे. सुदैवाने पावसाने दरसवाडी ६० टक्के भरले आहे. मागील वर्षीप्रमाण यंदा निश्चितच पाणी येणार यात शंका नाही.- मोहन शेलार, आंदोलक

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी