पावसाचे माहेरघर पाण्यासाठंी कासाविस
By Admin | Updated: May 8, 2016 22:54 IST2016-05-08T22:45:19+5:302016-05-08T22:54:08+5:30
पावसाचे माहेरघर पाण्यासाठंी कासाविस

पावसाचे माहेरघर पाण्यासाठंी कासाविस
पेठ : एकेकाळी सलग चार महिने धोधो पडणाऱ्या पेठ तालुक्यातील पावसाला गत दहा वर्षांपासून उतरती कळा लागली असून, त्यातच गत तीन वर्षांपासून तर या तालुक्याला दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र जाणवू लागल्या आहेत़
पेठ तालुक्यात एकूण गाव व वाड्या मिळून दोनशे गावे असून, दरवर्षीच्या टंचाई कृती आराखड्यात जवळपास शंभराच्या वर गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत असतात़ त्याच त्या योजना राबवून शासकीय पैसा खर्च केला जात असला, तरी कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याने या पावसाच्या माहेरघराला दुष्काळाचा चटका सहन करावा लागत आहे़
जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या या तालुक्याची पावसाची सरासरी २२५० मिमीच्या घरात असताना, मागील तीन वर्षांपासून या तालुक्यात १५०० मिमीच्या वर पाऊस पडत नसल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे़ त्यातच पेठ तालुक्यातील भौगोलिक स्थिती खडकाळ असल्याने व जमिनीचा पोस नसल्याने पावसाचे पाणी तीव्र उतारामुळे वाहून जाते आणि पावसाच्या दिवसांत थैमान घालणाऱ्या या तालुक्यात उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना मैलोन्मैल वणवण भटकण्याची वेळ येते.
सावळघाट उतरल्यानंतर पेठ तालुक्याचा विस्तीर्ण प्रदेश पाहावयास मिळतो. डोंगरउतारांनी वेढलेल्या या तालुक्यात उंचसखल भाग असल्याने एकीकडे पाणीच पाणी, तर दुसरीकडे कोरडेठाक अशी परिस्थिती पाहावयास मिळते़ (वार्ताहर)