शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा रद्दच करा; छात्रभारतीची मागणी, सोशल मिडियावर राज्यपाल हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 13:52 IST

परीक्षांसाठी आग्रही असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधातही छात्रभारतीने सोशल मिडियात मोहीम उघडली आहे. या मोहीमेंतर्गत परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवीताची काळजी कोण घेणार असा सवाल उपस्थीत करीत छात्रभारतीने राज्यपाल हटाव, विद्यार्थी बचाव आंदोलन सुरू केले आहे

ठळक मुद्देछात्रभारतीची परीक्षा रद्ध करण्याची मागणी कोरोनापासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी भूमिकासोशल मिडियावर राज्यपाल हटाव मोहीम

नाशिक : महाराष्ट्रासह देशभरातील कोरोना बाधितांची परिस्थिती बघता राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करणे हाच मार्ग उपलब्ध असल्याचे नमूद करीत संपूर्ण राज्यातील अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे परीक्षांसाठी आग्रही असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधातही छात्रभारतीने सोशल मिडियात मोहीम उघडली आहे. या मोहीमेंतर्गत परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवीताची काळजी कोण घेणार असा सवाल उपस्थीत करीत छात्रभारतीने राज्यपाल हटाव, विद्यार्थी बचाव आंदोलन सुरू केले आहे.  लॉकडाऊनमुळे विद्यार्थी दोन-अडीच महिण्यापासून घरातच बसून आहेत. त्यामुळे विद्यार्थी आधीच मानसिक तणावाखाली असून नैराश्याने ग्रासलेले आहेत. त्यातच राज्यसरकार, राज्यपाल आणि विरोधी पक्षात कलगीतुरा चाललेला असताना अंतीम वर्षाच्या परीक्षांसदर्भात कोणताही ठोस निर्णय होत नाही. सरकारच्या निर्णयाला राज्यपाल व  विरोधक  आडकाठी घालत असल्याचा आरोप करीत सरकार आणि राज्यपाल यांच्या संघर्षात सामान्य विद्यार्थी कोंडीत सापडल्याचेही छात्रभारतीने नमूद केले आहे.

सध्याची कोरोना विषाणू प्रादुभार्वाची व्यावहारिक परिस्थिती लक्षात घेता परीक्षा रद्द करणे हाच मार्ग दिसत असताना त्यावर राजकारण न करता संपूर्ण विचारांती निर्णय घेण्याची मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे  राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील मतभेदांमुळे परीक्षेविषयी निर्णाण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणाविषयी निषेध नोंदविण्यासाठी छात्रभारतीतर्फे सोशल मिडियावर  #राज्यपाल हटवा, विद्यार्थी वाचवा. # परीक्षा रद्द झाल्याच पाहिजेत. अशा स्वरुपाच्या घोषणांच्या माध्यमातून मोहीम सुरू केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमत: प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा न घेता केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात, अशी स्पष्ट भूमिका छात्र भारतीने सुरुवातीला घेतली होती, तसे निवेदनही संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. परंतु ज्या पद्धतीने शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत  कोरोनाचा फैलाव झाला आहे या परिस्थितीत कोणत्याही पद्धतीने परीक्षेचे आयोजन करणे शक्य नाही. छात्रभारतीने परीक्षा रद्द करण्याची भूमिका घेण्याआगोदर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे मतं जाणून घेतले, यामध्ये परीक्षा न घेण्याबाबतच कल दिसून आला. -प्रा.रविंद्र मेढे - प्रदेशाध्यक्ष, छात्रभारती, महाराष्ट्र.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीexamपरीक्षाuniversityविद्यापीठ