शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

परीक्षा रद्दच करा; छात्रभारतीची मागणी, सोशल मिडियावर राज्यपाल हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 13:52 IST

परीक्षांसाठी आग्रही असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधातही छात्रभारतीने सोशल मिडियात मोहीम उघडली आहे. या मोहीमेंतर्गत परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवीताची काळजी कोण घेणार असा सवाल उपस्थीत करीत छात्रभारतीने राज्यपाल हटाव, विद्यार्थी बचाव आंदोलन सुरू केले आहे

ठळक मुद्देछात्रभारतीची परीक्षा रद्ध करण्याची मागणी कोरोनापासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी भूमिकासोशल मिडियावर राज्यपाल हटाव मोहीम

नाशिक : महाराष्ट्रासह देशभरातील कोरोना बाधितांची परिस्थिती बघता राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करणे हाच मार्ग उपलब्ध असल्याचे नमूद करीत संपूर्ण राज्यातील अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे परीक्षांसाठी आग्रही असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधातही छात्रभारतीने सोशल मिडियात मोहीम उघडली आहे. या मोहीमेंतर्गत परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवीताची काळजी कोण घेणार असा सवाल उपस्थीत करीत छात्रभारतीने राज्यपाल हटाव, विद्यार्थी बचाव आंदोलन सुरू केले आहे.  लॉकडाऊनमुळे विद्यार्थी दोन-अडीच महिण्यापासून घरातच बसून आहेत. त्यामुळे विद्यार्थी आधीच मानसिक तणावाखाली असून नैराश्याने ग्रासलेले आहेत. त्यातच राज्यसरकार, राज्यपाल आणि विरोधी पक्षात कलगीतुरा चाललेला असताना अंतीम वर्षाच्या परीक्षांसदर्भात कोणताही ठोस निर्णय होत नाही. सरकारच्या निर्णयाला राज्यपाल व  विरोधक  आडकाठी घालत असल्याचा आरोप करीत सरकार आणि राज्यपाल यांच्या संघर्षात सामान्य विद्यार्थी कोंडीत सापडल्याचेही छात्रभारतीने नमूद केले आहे.

सध्याची कोरोना विषाणू प्रादुभार्वाची व्यावहारिक परिस्थिती लक्षात घेता परीक्षा रद्द करणे हाच मार्ग दिसत असताना त्यावर राजकारण न करता संपूर्ण विचारांती निर्णय घेण्याची मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे  राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील मतभेदांमुळे परीक्षेविषयी निर्णाण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणाविषयी निषेध नोंदविण्यासाठी छात्रभारतीतर्फे सोशल मिडियावर  #राज्यपाल हटवा, विद्यार्थी वाचवा. # परीक्षा रद्द झाल्याच पाहिजेत. अशा स्वरुपाच्या घोषणांच्या माध्यमातून मोहीम सुरू केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमत: प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा न घेता केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात, अशी स्पष्ट भूमिका छात्र भारतीने सुरुवातीला घेतली होती, तसे निवेदनही संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. परंतु ज्या पद्धतीने शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत  कोरोनाचा फैलाव झाला आहे या परिस्थितीत कोणत्याही पद्धतीने परीक्षेचे आयोजन करणे शक्य नाही. छात्रभारतीने परीक्षा रद्द करण्याची भूमिका घेण्याआगोदर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे मतं जाणून घेतले, यामध्ये परीक्षा न घेण्याबाबतच कल दिसून आला. -प्रा.रविंद्र मेढे - प्रदेशाध्यक्ष, छात्रभारती, महाराष्ट्र.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीexamपरीक्षाuniversityविद्यापीठ