शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यासाठी वटहुकूम काढावा : अशोक ढवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:00 IST

आदिवासींच्या जमिनी कार्पोरेटच्या घशात घालण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत, त्यामुळे सुप्रीम कोर्टात सरकारने बाजू मांडली नाही. किसान सभेने केला थेट आरोप

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवादअतिक्रमण केलेल्या वनजमिनींचा कायदेशीर पुरावा सादर न केल्यामुळे वनहक्काचे दावे निकाली काढलेल्या व वनजमिनींवर अतिक्रमण करून राहिलेल्या आदिवासींना २४ जुलैपर्यंत हुसकावून लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. वनजमिनींच्या प्रश्नावरील किसान सभेचा नाशिक ते मुंबई असा लॉँग मार्च निघताना सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन निकालामुळे देशभरातील नऊ कोटींहून अधिक आदिवासी विस्थापित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर किसान सभेची भूमिका राष्टÑीय अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे यांनी मांडली आहे.प्रश्न : निकाली काढलेल्या वनहक्क दाव्याच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या सर्र्र्वाेच्च न्यायालयाच्या निकालावर काय सांगाल?उत्तर : सर्वाेच्च न्यायालयाचा हा निर्णय अत्ंयत दुर्दैवी व संवेदनहीनतेचा कळस आहे. असे वक्तव्य केल्याने कदाचित कारवाई होईल किंवा न्यायालयावर टिकाटिप्पणी केल्याचा ठपका माझ्यावर ठेवला जाईल हे खरे असले तरी, या निकालाला केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे. या खटल्याच्या अंतिम सुनावणीदरम्यान सरकारचा वकीलच न्यायालयात गैरहजर राहिला किंबहुना त्याला गैरहजर ठेवले गेल्याने न्यायालयाने एकतर्फी निकाल दिला आहे.प्रश्न : सर्वाेच्च न्यायालयात सरकारने बाजू न मांडण्याचे कारण काय?उत्तर : केंद्रातील मोदी सरकार आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी कार्पोरेट कंपन्यांच्या घशात घालायला निघाले आहे. त्यामुळेच न्यायालय असा काही निर्णय देईल याची सरकारला कल्पना असावी म्हणूनच सरकारने तशी तजवीज करून आदिवासींची बाजू न्यायालयात मांडली नाही.प्रश्न : पण न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी तर सरकारला करावीच लागेल?उत्तर : आदिवासींना हुसकावून लावण्याचा आदेश दिला असला तरी, त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करणार आहे. किसानसभा गेल्या दहा वर्षांपासून वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लढा देत आहे. त्यामुळे लॉँग मार्चच्या मागण्या मान्य करीत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या या नवीन निर्णयाच्या अंमलबजावणीचाही विषय चर्चेत आला व तशी स्पष्ट कल्पना राज्य सरकारच्या प्रतिनिधींना देण्यात आली आहे.अध्यादेश काढण्याशिवाय पर्याय नाहीसर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमल-बजावणी सुरू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने तातडीने आदिवासींच्या जमिनी वाचविण्यासाठी अध्यादेश काढावा ही आमची प्रमुख मागणी आहे. तसे न झाल्यास देशपातळीवर आंदोलन केले जाईल व त्याची रूपरेषा लवकरच ठरेल.आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न२० फेब्रुवारी रोजी लाँग मार्च काढण्याचा निर्णय राज्य कमिटीने घेतला होता. सरकारने या निर्र्णयाला सकारात्मक घेण्याऐवजी नकारात्मक पद्धतीने मोर्चा चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला होता.देशपातळीवर आंदोलन होईलआदिवासींच्या वन जमिनींच्या प्रश्नावर सरकारने सकारात्मक विचार करावा. हा प्रश्न एकट्या महाराष्टचा नाही, तर नऊ कोटी आदिवासी जनतेचा आहे. महाराष्टत साडेतीन लाख वन हक्कासाठी दावे दाखल करण्यात आले होते. त्यातील जेमतेम एक लाख दावे शासकीय यंत्रणेने मान्य केले व अडीच लाख दावे अमान्य केले. त्यामुळे या विषयावर देशपातळीवर आंदोलनाची रूपरेषा लवकरच ठरेल.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चNashikनाशिक