शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

नवीबेज शिवारात कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST

शेतीपिकांचे नुकसान/ शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी कळवण : पूनद प्रकल्प अंतर्गत चणकापूर उजवा कालवा पोखऱ्या डोंगराजवळ २३ किमी ...

शेतीपिकांचे नुकसान/ शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

कळवण : पूनद प्रकल्प अंतर्गत चणकापूर उजवा कालवा पोखऱ्या डोंगराजवळ २३ किमी अंतरावर नवीबेज शिवारात फुटल्यामुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. नाल्याद्वारे वाहणारे पाणी शेतात घुसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची तक्रार शेतकरी बांधवानी केली असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रगतिशील शेतकरी राजेंद्र शिंदे यांनी केली आहे

बेज शिवारातील नितीन पगार व बापू आहेर यांच्या घराजवळच ३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कालव्याच्या आतील बाजूने सिमेंट काँक्रिटीकरणच्या आतील भागाला मोठे भगदाड पडल्याने परिसरातील ४० ते ५० हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकाचे नुकसान झाले. रात्री अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अनेकांच्या घरात पाणी शिरले. चणकापूर धरणातून उजव्या कालव्यास पूर पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यास भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आले . या पाण्यामुळे पाटाखालच्या शेकडो एकर शेतातील उभी पिके, अति पाण्यामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कांदाचाळीत व घरात पाणी शिरले. पाणी वाहत असलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली. कालव्या पलीकडचे डोंगर उतारावरील पाणी वाहून जाण्यासाठी पाटाखालून सिमेंट पाईप टाकण्यात आले आहेत . या पाइपच्या ठिकाणीच भगदाड पडून कालवा फुटल्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची तत्काळ पाहणी करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राजेंद्र शिंदे, गोपाळ शिंदे, दत्तू पगार, अशोक शिंदे, जयेश शिंदे, कल्पना शिंदे, गौरव शिंदे, रत्नाबाई शिंदे, महादू आहेर, रामदास दशपुते, सुरेश शिंदे आदींनी केली आहे.

कोट....

नवीबेज शिवारातील माझ्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका, कोबी, सोयाबीन, तुवर, द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले आहे, तर काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी घुसले आहे . शासनाने या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तत्काळ भरपाई द्यावी .

- रामकृष्ण पगार, शेतकरी

कोट....

तीन दिवसांपूर्वी कालव्याला गळती लागली होती. ३ सप्टेंबर रोजी दुपारी सिमेंट गोणी टाकून दुरुस्ती केली होती. मात्र तरीही पाणी न थांबल्याने भगदाड पडले आहे. पाणी बंद करण्यात आले आहे. माती भर टाकून दुरुस्ती करून पुन्हा पाणी सोडण्यात येईल.

- व्ही. ए. टिळे, उपकार्यकारी अभियंता, चणकापूर उजवा कालवा

फोटो- ०४ कळवण कालवा

040921\04nsk_43_04092021_13.jpg

फोटो- ०४ कळवण कालवा