शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

नवीबेज शिवारात कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST

शेतीपिकांचे नुकसान/ शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी कळवण : पूनद प्रकल्प अंतर्गत चणकापूर उजवा कालवा पोखऱ्या डोंगराजवळ २३ किमी ...

शेतीपिकांचे नुकसान/ शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

कळवण : पूनद प्रकल्प अंतर्गत चणकापूर उजवा कालवा पोखऱ्या डोंगराजवळ २३ किमी अंतरावर नवीबेज शिवारात फुटल्यामुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. नाल्याद्वारे वाहणारे पाणी शेतात घुसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची तक्रार शेतकरी बांधवानी केली असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रगतिशील शेतकरी राजेंद्र शिंदे यांनी केली आहे

बेज शिवारातील नितीन पगार व बापू आहेर यांच्या घराजवळच ३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कालव्याच्या आतील बाजूने सिमेंट काँक्रिटीकरणच्या आतील भागाला मोठे भगदाड पडल्याने परिसरातील ४० ते ५० हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकाचे नुकसान झाले. रात्री अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अनेकांच्या घरात पाणी शिरले. चणकापूर धरणातून उजव्या कालव्यास पूर पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यास भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आले . या पाण्यामुळे पाटाखालच्या शेकडो एकर शेतातील उभी पिके, अति पाण्यामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कांदाचाळीत व घरात पाणी शिरले. पाणी वाहत असलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली. कालव्या पलीकडचे डोंगर उतारावरील पाणी वाहून जाण्यासाठी पाटाखालून सिमेंट पाईप टाकण्यात आले आहेत . या पाइपच्या ठिकाणीच भगदाड पडून कालवा फुटल्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची तत्काळ पाहणी करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राजेंद्र शिंदे, गोपाळ शिंदे, दत्तू पगार, अशोक शिंदे, जयेश शिंदे, कल्पना शिंदे, गौरव शिंदे, रत्नाबाई शिंदे, महादू आहेर, रामदास दशपुते, सुरेश शिंदे आदींनी केली आहे.

कोट....

नवीबेज शिवारातील माझ्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका, कोबी, सोयाबीन, तुवर, द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले आहे, तर काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी घुसले आहे . शासनाने या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तत्काळ भरपाई द्यावी .

- रामकृष्ण पगार, शेतकरी

कोट....

तीन दिवसांपूर्वी कालव्याला गळती लागली होती. ३ सप्टेंबर रोजी दुपारी सिमेंट गोणी टाकून दुरुस्ती केली होती. मात्र तरीही पाणी न थांबल्याने भगदाड पडले आहे. पाणी बंद करण्यात आले आहे. माती भर टाकून दुरुस्ती करून पुन्हा पाणी सोडण्यात येईल.

- व्ही. ए. टिळे, उपकार्यकारी अभियंता, चणकापूर उजवा कालवा

फोटो- ०४ कळवण कालवा

040921\04nsk_43_04092021_13.jpg

फोटो- ०४ कळवण कालवा