शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

कोबीचा लिलाव ७०० अन् गाडीभाडे १३०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 23:35 IST

नाशिक : शहरातील किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर चढे असले तरी त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसून त्यांना भाजीपाला मातीमोल दराने विकावा लागत आहे. शनिवारी नाशिक बाजार समितीत एका शेतकºयाने आणलेल्या एक गाडी कोबीचा लिलाव ७०० रुपयांना झाला अन् या शेतकºयाला त्या गाडीचे भाडे १३०० रुपये द्यावे लागले असल्याची धक्कादायक स्थिती आहे. किरकोळ खरेदीदारांअभावी नाशिक बाजार समितीत येणाºया अनेक भाजीपाल्याचे लिलावच झाले नसल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट । खरेदीदार व्यापारीच नसल्याने शेतकऱ्यांचा माल मातीमोल

नाशिक : शहरातील किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर चढे असले तरी त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसून त्यांना भाजीपाला मातीमोल दराने विकावा लागत आहे. शनिवारी नाशिक बाजार समितीत एका शेतकºयाने आणलेल्या एक गाडी कोबीचा लिलाव ७०० रुपयांना झाला अन् या शेतकºयाला त्या गाडीचे भाडे १३०० रुपये द्यावे लागले असल्याची धक्कादायक स्थिती आहे. किरकोळ खरेदीदारांअभावी नाशिक बाजार समितीत येणाºया अनेक भाजीपाल्याचे लिलावच झाले नसल्याचे दिसून आले.नाशिक येथून वाशी (मुंबई) आणि गुजराथमध्ये भाजीपाला जात असतो. नाशिक बाजार समितीत खरेदी केलेला माल येथील व्यापारी या बाजारांमध्ये पाठवित असतात. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात असलेल्या संचारबंदीमुळे वाशी, गुजराथ येथील बाजारांमध्ये किरकोळ स्वरूपात माल खरेदी करणारे व्यापारीच पाहोचत नसल्याने या बाजारांमध्ये पाठविलेला माल पडून राहतो. पर्यायाने नाशिक येथील बाजार समितीमध्ये खरेदी मंदावली आहे. शुक्रवारी (दि.२७) नाशिक येथील बाजार समितीमध्ये सुमारे २५० वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली होती. त्या संपूर्ण वाहनांमधील मालाचा लिलाव होऊ शकला नाही. त्यातील काही वाहनं दुसºया दिवसांपर्यंत बाजार समितीत उभीच होती. लिलाव झालेच तर भाजीपाल्याला फारसा भाव मिळत नाही. कोबीची गाडी ५०० ते ७०० रुपयांना विकली जात असल्याची स्थिती आहे. यामुळे भाजीपाला विकून प्रत्यक्ष शेतकºयांच्या हाती काहीच पडत नसून मधल्या दलालांचा मात्र फायदा होत असल्याचे चित्र सध्या बाजार समितीमध्ये आहे. शेतकºयांनी पिकविलेल्या भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने त्यांचा उत्पादन खर्च तर सोडाच साधे गाडीभाडे निघणेही मुश्कील झाले आहे. यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, भाजीपाला वितरणासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.नाशिक बाजार समितीमध्ये सर्वच भाजीपाल्याची चांगली आवक आहे. मात्र येथून जाणाºया मालाला पुढे ग्राहक मिळत नसल्याने शेतकºयांच्या हाती फारसे काही पडत नाही. शनिवारी सकाळी भाजीपाल्याची आवक चांगली झाली, मात्र तो माल पडून होता. किरकोळ खरेदीदार व्यापाºयांना बाजार समितीपर्यंत येऊच दिले जात नसल्याने माल पडून राहतो आहे.- संपतराव सकाळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :NashikनाशिकMarket Yardमार्केट यार्ड