शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोबीचा लिलाव ७०० अन् गाडीभाडे १३०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 23:35 IST

नाशिक : शहरातील किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर चढे असले तरी त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसून त्यांना भाजीपाला मातीमोल दराने विकावा लागत आहे. शनिवारी नाशिक बाजार समितीत एका शेतकºयाने आणलेल्या एक गाडी कोबीचा लिलाव ७०० रुपयांना झाला अन् या शेतकºयाला त्या गाडीचे भाडे १३०० रुपये द्यावे लागले असल्याची धक्कादायक स्थिती आहे. किरकोळ खरेदीदारांअभावी नाशिक बाजार समितीत येणाºया अनेक भाजीपाल्याचे लिलावच झाले नसल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट । खरेदीदार व्यापारीच नसल्याने शेतकऱ्यांचा माल मातीमोल

नाशिक : शहरातील किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर चढे असले तरी त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसून त्यांना भाजीपाला मातीमोल दराने विकावा लागत आहे. शनिवारी नाशिक बाजार समितीत एका शेतकºयाने आणलेल्या एक गाडी कोबीचा लिलाव ७०० रुपयांना झाला अन् या शेतकºयाला त्या गाडीचे भाडे १३०० रुपये द्यावे लागले असल्याची धक्कादायक स्थिती आहे. किरकोळ खरेदीदारांअभावी नाशिक बाजार समितीत येणाºया अनेक भाजीपाल्याचे लिलावच झाले नसल्याचे दिसून आले.नाशिक येथून वाशी (मुंबई) आणि गुजराथमध्ये भाजीपाला जात असतो. नाशिक बाजार समितीत खरेदी केलेला माल येथील व्यापारी या बाजारांमध्ये पाठवित असतात. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात असलेल्या संचारबंदीमुळे वाशी, गुजराथ येथील बाजारांमध्ये किरकोळ स्वरूपात माल खरेदी करणारे व्यापारीच पाहोचत नसल्याने या बाजारांमध्ये पाठविलेला माल पडून राहतो. पर्यायाने नाशिक येथील बाजार समितीमध्ये खरेदी मंदावली आहे. शुक्रवारी (दि.२७) नाशिक येथील बाजार समितीमध्ये सुमारे २५० वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली होती. त्या संपूर्ण वाहनांमधील मालाचा लिलाव होऊ शकला नाही. त्यातील काही वाहनं दुसºया दिवसांपर्यंत बाजार समितीत उभीच होती. लिलाव झालेच तर भाजीपाल्याला फारसा भाव मिळत नाही. कोबीची गाडी ५०० ते ७०० रुपयांना विकली जात असल्याची स्थिती आहे. यामुळे भाजीपाला विकून प्रत्यक्ष शेतकºयांच्या हाती काहीच पडत नसून मधल्या दलालांचा मात्र फायदा होत असल्याचे चित्र सध्या बाजार समितीमध्ये आहे. शेतकºयांनी पिकविलेल्या भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने त्यांचा उत्पादन खर्च तर सोडाच साधे गाडीभाडे निघणेही मुश्कील झाले आहे. यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, भाजीपाला वितरणासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.नाशिक बाजार समितीमध्ये सर्वच भाजीपाल्याची चांगली आवक आहे. मात्र येथून जाणाºया मालाला पुढे ग्राहक मिळत नसल्याने शेतकºयांच्या हाती फारसे काही पडत नाही. शनिवारी सकाळी भाजीपाल्याची आवक चांगली झाली, मात्र तो माल पडून होता. किरकोळ खरेदीदार व्यापाºयांना बाजार समितीपर्यंत येऊच दिले जात नसल्याने माल पडून राहतो आहे.- संपतराव सकाळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :NashikनाशिकMarket Yardमार्केट यार्ड