शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

नोटा टंचाईमुळे व्यवसायांना फटका

By admin | Updated: November 16, 2016 00:56 IST

सर्वेक्षण : पन्नास-शंभराच्या नोटांची छपाई वाढविण्याची गरज

नाशिक : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे बाजारात सुट्या नोटांच्या वाढलेल्या टंचाईचा फटका विविध व्यावसायिकांना बसला असून, किराणा व्यवसायापासून मालवाहतुकीपर्यंत सुमारे तीस ते पस्तीस टक्के प्रतिकूल परिणाम झाल्याचा दावा व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या मंगळवारी (दि. ८) रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. रात्री बारा वाजेपासून या नोटा वैधानिकदृष्ट्या बाद ठरतील असे त्यांनी जाहीर केले असले तरी ३० डिसेंबरपर्यंत त्या बॅँकेत बदलता येतील, असे जाहीर केले. या निर्णयानंतर सर्वसामान्य नागरिकांची बुधवारपासून धावपळ उडाली. आपल्याकडील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाजारात खपविण्यासाठी खूपच गर्दी उडाली. त्यातच मंगळवारपासून किराणा दुकानापासून पेट्रोलपंपापर्यंत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. सरकारने पेट्रोल पंप आणि रुग्णालयांमध्ये या नोटा स्वीकारण्यात येतील, असे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात मात्र सर्वच ठिकाणी नकार मिळत आहे. अन्य व्यावसायिक तर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा म्हटल्या की नकारच देत आहेत. या नोटा घेऊन बॅँकेत जमा करण्यासाठी रांगेत कोण उभे राहणार, तसेच बॅँकांमध्ये नोटा बदलून देताना किंवा भरताना अर्ज भरून घेतला जात असल्याने आयकर खात्याची आफत नको म्हणूनही व्यावसायिकांनी टाळाटाळ सुरू केली आहे. व्यावसायिक विक्रेते सामान्य नागरिकांचे हाल करीत असल्याचे चित्र त्यामुळे उभे होत असले तरी प्रत्यक्षात पाचशे, हजार रुपयांच्या नोटा न स्वीकारण्याचा आणि सुट्या नोटांची बाजारात टंचाई असल्याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे. लोक अत्यंत निकडीच्या वस्तूंपलीकडेच खरेदी करीत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.  विविध क्षेत्रातील व्यावसायिकांशी केलेल्या चर्चेनुसार कापड व्यवसायावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. विशेषत: छोटे रेडीमेड आणि होजिअरीची दुकाने ओस पडली आहेत. कपडे तातडीने खरेदी करणे गरजेचे नसल्यानेही अशी अवस्था झाल्याचे व्यासायिकांचे म्हणणे आहे. सुमारे ४५ टक्के व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्याखालोखाल मालवाहतुकीवर परिणाम झाला असून, नेहमी रोखीत चालणाऱ्या या व्यवसायाला सुमारे ३५ टक्के इतका फटका बसला आहे. या व्यवसायासाठी तीन लाख रुपये रोखीत लागतात. बॅँकांमधून इतकी रोकड काढताच येत नसल्याने मालमोटारीच बाहेर पाठवता येत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. सध्या या व्यवसायावर तीस ते पस्तीस टक्के परिणाम झाला असून, निर्बंध असेच सुरू राहिले तर उर्वरित व्यवसाय मोडकळीस येण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारे किराणा व्यवसायाला तीस टक्के फटका बसला आहे. त्याचे आणखी एक कारण म्हणजे अनेक ठिकाणी कार्ड स्वाइप करून वस्तू खरेदी करता येत आहे. तसे मॉल आणि सुपर मार्केट वगळता अन्य किराणा दुकानात व्यवस्था नाही. औषधांच्या दुकानात आता औषधांव्यतिरिक्त अन्य कॉस्मेटिक व इतर वस्तूंची खरेदी मंदावली असल्याचे सांगण्यात येत आहे. चांगल्या हॉटेल्समध्ये पन्नास टक्के व्यावसायिकांकडे कार्ड पेमेंटची सोय असल्याने त्यांना अडचण येत नाही. मात्र, अशी व्यवस्था नाही तेथे अडचणी येतात. याशिवाय बहुतांशी रेस्तरॉँमध्ये ही व्यवस्था नसल्याने त्यांचे आणि गाडीवर व्यवसाय करणाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकूणच हॉटेल व्यवसायावर २० ते २५ टक्के इतका प्रतिकूल परिणाम झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.निर्णयाचे समर्थनच मात्रपंतप्रधानांनी काळापैसा नियंत्रित करण्यासाठी उचललेल्या पावलाचे सर्वच व्यावसायिक समर्थन करतात. मात्र, पुरेशा सुट्या नोटांची उपलब्धता झाल्यानंतर हा निर्णय जाहीर केला असता तर अधिक सोयीचे झाले असते असे व्यावसायिक मानतात. याशिवाय ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलणे शक्य असताना रात्री बारा वाजेपासून नोटा वैध राहणार नाहीत, असे जाहीर केल्याने अडचण झाली. पेट्रोल पंप आणि हॉस्पिटल्समध्ये हजार आणि पाचशेच्या नोटा चालतील असे जाहीर करण्यात आले त्याचप्रमाणे अन्य व्यावसायिकांनाही तसे लागू केले असते तर अडचण झाली नसती असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.